Wednesday, 28 January 2015

धर्म के दोहे

क्षण-क्षण क्षण-क्षण बीतता, जीवन बीता जाय।
इस क्षण का उपयोग करे, बीता क्षण नही आय।।

- सत्य नारायण गोयंकाजी

स्पष्टीकरण:
साधारण मनुष्य स्वतः च्या बर्याच कर्तव्यांना पूर्ण करण्याची टाळा टाळ करतो ।
इतकी टाळा टाळ कि स्वतःच्या मनाची बैचेनी/अस्वस्थता ओळखायचं व दुर करायला  ही त्याच्या कडे वेळ नसतो।

मृत्यू समयी ही व्याकुळता व बैचेनी उफाळून वर येते, पण तेव्हा वेळ गेलेली असते ।

आई-वडिलांची सेवा, बायको-मुलांना यथोचित निस्वार्थ स्नेह-प्रेम, ज्यांना दुखावले त्यांची माफी मागायची, कुलपुरूषाचे(ऊदा: बाबासाहेब) ऋण फेडणे, क्रोध/ वासना / ईर्षा / भीती / आळस पश्चातापातुन मुक्ती अशा अनेक

बैचेनीची उकल / सुटका झालेली नसते । एक- एक करत तास, दिवस, महिने, वर्षे निघून जातात ।

 ह्या जन्मदिवशी मी जास्त मनोविकार/पापकर्मे कमविली कि जास्त मनोविकार/पापकर्मांपासून मुक्त झालो याचा

हिशोब साधारण माणसाला करता येत नाही । कारण आपण अजुन अंतर्मनाच्या स्वच्छते बद्दल अज्ञानी असतो। अंतर्मनात ह्या व अनेक जन्माची बैचेनी साठली आहे। ती फक्त मनुष्य जन्मात विपश्यना मिळाली कि काढता येते ।

ती काढण्यासाठी आचार्य प्रवृत्त करत आहेत, कारण वर्षामागून वर्षे जात आहेत। पण किती वर्षे बाकी आहेत आपल्याला माहित नाहीत 😥 । न जाणे पून्हा कधी मनुष्य जन्म मिळो न मिळो।

म्हणून साधना करीत विकारमुक्त होत जन्म व वेळ सार्थकी लावावा। गेलेला वेळ परत येत नाही ।

भवतु सब्ब मंगलं।

-संबोधन  धम्मपथी

No comments:

Post a Comment