पग पग बढता ही रहे, प्रबल रहे पुरुषार्थ ।
धरम पंथ दोनों सधे, स्वार्थ और परमार्थ।।
धरम पंथ दोनों सधे, स्वार्थ और परमार्थ।।
- सत्य नारायण गोयंकाजी
स्पष्टीकरण:
सहसा चांगले कर्म करीत राहण्याचा मनुष्याचा प्रयत्न असतो। पण परिस्थिती समोर मनुष्य कच खातो।
सहसा चांगले कर्म करीत राहण्याचा मनुष्याचा प्रयत्न असतो। पण परिस्थिती समोर मनुष्य कच खातो।
चांगले वागायची आशावादी सुरुवात करताना, प्रयत्नांना अमुक एका वेळे नंतर यश येईल अशी अपेक्षा असते। पण यश / सुख काही यायची चिन्ह दिसत नाही ।स्वतःच्या स्वप्नांना, इज्जतीला, सुखांना जपण्याच्या प्रयत्नात चांगली कामे करायचे थांबवुन, वाईट कर्मे करायला सुरुवात करतो।
अशा निराशेच्या वेळी पुर्वी केलेल्या सत्कर्मावर / प्रयत्नांवर पाणी सोडले जाते।
एवढी काळजी घेत असताना ही हळुच नकळत प्रत्येक क्षणाला घाण - धुळ घरात येत असते। दारे - खिडक्या नेहमी बंद नाही ठेवु शकत। आणि जरी कधी बंद ठेवली तर आतली (न निघालेली) जुनी घाण व घरातील कामे नवीन घाणेची निर्मिती करतात। त्यामुळे नियमित सफाई गरजेचीच असते।
मग आशा, जिद्द व एकुणच पुरुषार्थ कमी पडतो। सद्धर्म धारण करताना कळते कि अविचार / मानसिक कचरा कसा, कुठे, कधी व किती आला व किती अगोदर तपासुन होता।
धर्म विपश्यनेद्वारे कचरा बाहेर काढायला व नवा कचरा न बनवायला शिकवतो। त्यामुळे आध्यात्मिक (स्वार्थ) व सांसारीक (परमार्थ) प्रगती होते।पण तसे न झाल्यास धर्म (शील + समाधि+ प्रज्ञा) न रुजल्याचे स्पष्ट होते ।
भवतु सब्ब मंगलं।
- संबोधन धम्मपथी 
No comments:
Post a Comment