
धर्म के दोहे:
धरम हमारा ईश्वर, धरम हमारा नाथ।
सदा सुरक्षित रहे हम, धरम हमारे साथ।।
- सत्य नारायण गोयंकाजी
स्पष्टीकरण:

साधारण मनुष्याचे मन आठ लोकधर्मां मुळे सदैव बैचेन/व्याकुळ/अस्वस्थ असते । जशी एखादी नौका वादळी वारा व अंधारामुळे हेलकावे खात असते । अशा वेळेस तिला मजबुत आसरा(जसे बेट/द्वीप) हवा असतो । पण आसपासचे लोकही कमीजास्त प्रमाणात व्याकुळ असतात।

मग भगवान म्हणतात ईतर ठिकाणी शोधण्यापेक्षा मनुष्याने मनुष्याने सद्धर्माचाच शरण/आसरा घ्यावा । सद्धर्मात(शील+समाधि+प्रज्ञा) स्थिर मन आपले मार्गदर्शक बनेल ।

अत्त दीप(द्वीप) भव।

आठ लोकधधर्म : सुख-दुख/ निंदा-स्तुति/मान-अपमान/यश-अपयश
भवतु सब्ब मंगलं।
-संबोधन धम्मपथी
No comments:
Post a Comment