Thursday, 15 January 2015

धर्म के दोहे

शील समाधी ध्यान कि, बही त्रिवेणी धार।
डुबकी मारे सो तिरे, हो भवसागर पार।।

- कल्याणमित्र सत्य नारायण गोयंकाजी

स्पष्टीकरण:

ऐकदा एका गृहस्थाने शास्त्यांना ( बुद्धांना ) ऐक प्रश्न विचारला:
शील जास्त महत्वाचे कि प्रज्ञा?
पहिले प्रथम कोण महत्वाचे?

🌞तथागत म्हणतात:
शील हे प्रथम प्राथमिक अंग आहे। ते समाधी ला बलवान / निर्मळ बनवते। समाधी ही प्रज्ञेला बलवान / निर्मळ बनवते। प्रज्ञा ही निर्वाणा साठी उपयोगी आहे। जसे तीन पायांचे आसन।💺

गृहस्थ: एखादे उदाहरण देवून स्पष्ट करावे । 🙏

🌞तथागत म्हणतात: जेव्हा एखाद्या चे दोन्ही हात घाणीने खराब झालेले असतात । तेव्हा तो व्यक्ती सुरुवातीला एक हात (शील) साफ करते. नंतर त्या पहिल्या धुतलेल्या हातानेच दुसरा हात (प्रज्ञा) साफ करते ।
आता दोन्ही हात साफ झाल्यावर तो दोन्ही हात एकमेकांवर रगडून खुप व्यवस्थित पणे एक हात दुसर्या हाताचे व दुसरा हात पहिल्या हाताचे कानेकोपरे अगदी स्वच्छ / निर्मळ करतात। हे दोन्ही हात एकमेकांचे पुरक ठरतात।

अगदी याच प्रमाणे हे गृहस्था, सुरुवाताचे माफक  शील प्रज्ञेला स्वच्छ बनवते। समाधि इथेही एकाग्रते च्या स्वरुपात असते।
 प्रज्ञा मिळाली कि शील आणखीन सहज व मनापासून होते। शील आणखीन पुष्ट झाले कि (समाधि, व समाधि मुळे ) प्रज्ञा  आणखीन स्वच्छ, खोल व गंभीर बनत जाते ।

त्यामुळे 🌷शील - समाधि - प्रज्ञा 🌷 हे धर्माचे परिपूर्ण व परिशुद्ध अंगे एकमेकांना बल देतात व मदतच करतात । त्यामुळे त्यांच्या संगमा शिवाय धर्म व निर्वाण शक्य नाही।

तो गृहस्था प्रसन्न झाला। 😊


भवतु सब्ब मंगलं।

- संबोधन धम्मपथी

No comments:

Post a Comment