माझे बरेच मित्र व ईतर ही अनेक तरुण-तरुणी मद्यपी बनतात, खास करुन 31 डिसेंबर च्याच रात्री.
आणि जीवनात जेव्हा कधी बैचेनी, व्याकुळता, आनंद व अस्वस्थता मनात थैमान घालते तेव्हा मग दारुचा विटाळ वाटत नाही। उलट ती सहज मुक्तीदायिनी / विश्रांती दायिनी / आराम दायिनी वाटते। 

पण बेहोषीतल्या आरामात समस्या तीळभरही सुटत नाही, वेळ / लढण्याची सवय निसटते व ढळणारे आरोग्य परिस्थिती आणखीन कठीण करुन टाकतात ।
याबद्दल सर्वांनी जागरूक राहावे । शील- सदाचार व संयम ढळु देवु नये। आनंदी राहावे। नव्या वर्षात शुद्ध धर्मात ( शील + समाधि + प्रज्ञा ) प्रगती होवो व क्षांती लाभो ही सदिच्छा ।
भवतु सब्ब मंगलं।
- संबोधन धम्मपथी
No comments:
Post a Comment