प्रश्न: उपासकाने भिक्षु चे पाय धुवावेत का? ह्या फोटो प्रमाणे ?
Monday, 18 October 2021
धम्म चर्चा : उपासकाने भिक्षु चे पाय धुवावेत का?
Wednesday, 30 June 2021
धम्मचर्चा : स्मृती-अनुस्मृती आणि धम्म-अनुधम्म यात काही फरक आहे की एकच आहेत
उत्तर:
अनु म्हणजे मुख्य विषयाचे उप-विषय, उपविभाग किंवा कप्पे !!
Saturday, 19 June 2021
दान करताना समज व गैरसमज
प्रश्न १: साधारणतः मनुष्य दान का करतो ?
उत्तर : जेव्हा माणुस दान देतो, तेव्हा वरवर पाहताना असे दिसते पाहा किती परोपकारी व माणुसकीची जाण ठेवणारा माणुस आहे. पण अंतर्मनात स्वतःने पहिले तर कितीतरी वेळा माणसाचा स्वार्थ व भीती असल्याने मनुष्य दाणे देत असतो. आसपासच्या अनपेक्षित व नको असलेल्या खूप दुर्दैवी घटना नकळत घटत असतात. वाईट वाटते, भीती वाटते पण कारण कळत नाही. त्यामुळे मी बैचेन होतो. मी व माझे (आरोग्य, पैसे, ऐश्वर्य, बायको -मुले, परिवार व समाज) ठीक/सलामत राहावा यासाठी माझ्या संप्रदायातील पूजापाठ करणारे व वाईट काम न करणारे माणसे असतात.
त्यांना दान दिले तर माझी पापे कदाचित धुतली जातील व माझे (आरोग्य, पैसे, ऐश्वर्य, बायको -मुले, परिवार व समाज) सलामत राहतील अशी कल्पना व आशा करतो. एकूणच फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी दान केल्याने ते दान परोपकारी ठरत नाही त्यामुळे त्याचे ते पुण्य मिळत नाही जे परहितबुद्धीने किंवा कल्याणकारी भावनेने मिळते. कारण दान देताना मनात बैचेनी आणि स्वतःचा व स्वतःच्या संप्रदायाचा (हिंदु, मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रीश्चन) स्वार्थाची भावना प्रबळ होती.
प्रश्न २: म्हणजे मनुष्य दान देताना निस्वार्थ भावना असली कि पुण्य मिळते. बरोबर ना?
उत्तर :जरुरी नाही. जसे एका शेतकऱ्याने नापीक जमिनीत खूप मेहनत-मशागत करत बीज पेरली तर त्याला अपेक्षित यश येणार नाही. कारण त्याने जमिनीच्या दर्जावरती अजिबात लक्ष दिलेले नाही किंवा त्याची त्याला पुरेशी माहिती नाही.
तसेच जर दान स्वीकारणारा (हिंदु, मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रीश्चन इतर कोणीही असेना) जर शील पाळणारा सदाचारी नसेन, संयमी, मन विशुद्ध करणारा व लोकांना (हिंदु, मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रीश्चन इतर कोणीही असेना) मदत करणारा नसेल तर अशा अनाडी, आळशी किंवा ढोंगी माणसाला दिलेले दान जरी निस्वार्थ भावनेतुन असले तरी त्याच्या अपेक्षित तेवढा लाभ होत नाही. कारण दान स्वीकारणाऱ्याच्या नैतिक दर्जाबाबत (स्वशुद्धी व सामाजिक जबाबदारीबद्दल) दान देणारा सजग नसतो.
प्रश्न ३: मग बुद्धाने 'सब्ब दानं धम्मदानं जिनाती' असे स्वतःच्या संप्रदायालाच दान करायला का बरे सांगितले असावे?
उत्तर : बुद्धाने 'सब्ब दानं धम्मदानं जिनाती' (धम्मपद २४, ३५४) सांगितले जरूर आहे पण त्या अर्थाचा सध्या अर्थच बदलला आहे.
पहिली महत्वाची गोष्ट अशी कि बुद्धाने "तुम्ही एखाद्या शीलवान, कर्तव्यबुद्धी असलेला व इतरांना निस्वार्थपणे मदत करणाऱ्याचा संपूर्ण खात्री केल्यावर आदर करावा भले तो कुठल्याही जात-संप्रदायाचा असो!" असे सांगितले आहे हे कायम लक्षात ठेवावे कारण बुद्ध वाणी हि सार्वजनिन आहे. सर्वाना लागू पडते व सर्वासाठी मंगलमय आहे.
☸️ सध्याचा 'सब्ब दानं धम्मदानं जिनाती' प्रचलित चुकीचा अर्थ:
फक्त एका बौद्ध संप्रदायाचा प्रचार-प्रसारासाठी बौद्ध माणसांनाच(भिक्षु -भिक्षुणी, उपासक-उपासिका) दान करत जा. त्यासाठी केलेली इतर वस्तुंचे दान( मुर्ती/पैसा/चीवर/भोजन/औषधे), अशा भौतिक वस्तुंचे दान बौद्ध संप्रदायातील लोंकासाठीच केलेले असते,ते जगातील इतर सर्व दानापेक्षा श्रेष्ठ आहे. ह्या दानाचा बुद्ध वाणी लोकांना सांगण्याशी स्पष्ट संबंध कोणाला ठेवण्याची गरजच वाटत नाही.
असे दान अंधश्रद्धा बनते कारण त्याने कोणाचे व कुठल्या समाजाचे भले असे होईल असे दानकर्त्याला व दान स्वीकारणाराला सांगता यत नाही.
तसेच दान स्वीकारणाराची पात्रता एवढीच कि तो बौद्ध संप्रदायाचा आहे!!! हि बुद्धाला अपेक्षित सार्वजनिनता व महाकारुणिकता दिसतच नाही.
तो किती शीलवान, विशुद्ध मनाचा, परहितबुद्धि जपणारा(धुतांगधारी) व अधिकृत बुद्धवाणी वाचुन ती सुयोग्य पद्धतीने मानव जातीला (हिंदु, मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रीश्चन) देण्याचं कर्तव्ये करणारा असावा अशी कुठलीच अपेक्षा नसते. त्यामुळे बुद्धाच्या शिकवणुकीबाबत इथे गैरसमज झाल्याने सार्वजनिक बुद्धवाणीला इथे एका बौद्ध समाजापुरते ठेवण्याची मोठी चूक झाली आहे.
☸️ प्रचलितचुकीच्या अर्थामुळे उद्भवलेली मोठी समस्या :
तुम्ही दान स्विकारुन खालील गोष्टी प्रामुख्याने कराव्यात असे दान देणारा सांगताना दिसत नाही :
१. त्रिपिटकात बुद्धाने केलेले मार्गदर्शन (कुटुंबाला, नेत्याला, कामगारांना, मालकाला, नोकरांना, पती -पत्नींना, मुलांना) वाचुन आम्हास शिकवावे. (म्हणजे परियत्ती)
२. विपश्यना: ध्यान साधना विधी समाजाला शिकवण्यासाठी स्वतः विपश्यना साधनेत प्रवीण/एक्सपर्ट होऊन. सद्गुण जीवनात आणण्यासाठी समाजाला जागे करावे. (म्हणजे पटीपत्ती )
जर दान कर्त्याने अशी अपेक्षाच नाहो ठेवली तर दान स्वीकारणारा सुस्तावतो, आळसावतो व जीवनाला बुद्धाने सांगितलेला उद्देश्य नसल्याने (अधिकाधीक लोंकाच्या हित व सुखासाठी दिवस रात्र मेहनत करा - बहुजन हिताय बहुजन सुखाय ) खालील गोष्टी वाया घालवतो :
१. दान देणाऱ्याचा पैसे वाया जातात (कारण पैसे घेऊन कल्याणकारी काम करत नाही) आणि त्यामुळे त्याला पुण्यही मिळत नाही.
२. स्वतःचे जीवन निरर्थक किंवा थोतांड बनते
३. बुद्धाच्या महान धम्माची व संघाची अवनती (वाट लावतो)
☸️ 'सब्ब दानं धम्मदानं जिनाती' चा खरा अर्थ:
धम्म (बुद्धवाणी-म्हणजे शील समाधि प्रज्ञेला अनुसरुन असलेले ३७ बोधिपक्षिय धर्माविषयी निस्वार्थ व परहितबुद्धीने बुद्धी ने केलेले लेखन/मार्गदर्शन/सेवा/शंकेचे निरसन/ध्यान शिबीराचे आयोजन) दान (मग ते कोणत्याही जाती-संप्रदाय-देशाच्या माणसाच्या विशुद्धीसाठी (मनाला निर्मळ बनवण्यासाठी) असो. हे कुठल्याही प्रकारच्या दानात सर्वश्रेष्ठ दान असते.
रण सहस्त्र योद्धा लडे, जीते युद्ध हजार ।
पर जो जीते स्वयं को, वही शुर सरदार ।।
क्षण-क्षण क्षण-क्षण बी ता, जीवन बीता जाय ।
इस क्षण का उपयोग करे बीता क्षण नहीं आय।।
अशा प्रकारे स्वतःच्या जीवनाचा व इतरांनी दिलेल्या दानाचा सर्व समाजाच्या हितासाठी अहोरात्र मेहनत करीत असतो.
भले होवो!!
- संबोधन धम्मपथी.
९७७३१००८८६
Sunday, 25 April 2021
सब्ब दानं धम्मदानं जिनाती
दानाबद्दलचे काही गैरसमज दूर झाले कि खूप फायदा होतो.
☸️ धम्मदानच सर्वश्रेष्ठ दान का असते? :
एखाद्या ला पैसा द्या,पण मग काही दिवसांनी परत गरज लागेल. पैसा कायम कुठे टिकतो? एखाद्या ला जेवण द्या, काही तासांनी परत भुक लागेल. भुक कायम कुठे मिटते?एखाद्या ला रक्त/अवयव दान द्या, काही दिवसांनी परत आजारी पडेल. आजार कायम कुठे मिटतो? तसेच एखाद्या ला औषध द्या, काही दिवसांनी परत आजारी पडेल. आजार कायम कुठे मिटतो? ह्या दानाचा परिणाम कायम नसतो.
☸️ गरज पुन्हा लागतेच!! म्हणुन ही सर्व प्रकारचे दान साधारण दान झालीत. त्यांना कोणालाच हलके/कमी लेखत नाही, तुम्हीही लेखु नका. पण त्यांची मर्यादाही ओळखा!!
पण प्रकृती/निसर्ग नियम दान लक्षात ठेवते.जे पेराल ते कालांतराने उगवते. भरभरून निसर्गाचा प्रतिसाद मिळतो.
☸️ जसे एक आंब्याची कोण लावलीतर हा निसर्ग/प्रकृती/कुदरत का कानुन त्या कर्माचं व त्यासारखेच मोठं मोठं फळ देतो. अनेक फळ व फळातुन पुन्हा मोठी झाडं येतात.
☸️ तसेच एखाद्याने अन्नदान दिले, तर निसर्ग त्यांच्या कर्माची फळं देतो...ह्या जन्मात किंवा पुढील जन्मात एकुण (ह्या जन्माचे व मागील जन्मी च्या कर्मफळानुसार) तसेच काळानुरुप व दर्जानुरूप (जसे केळ्याचे फळ दर महिन्याला येते, पण आंब्याचे फळ उन्हाळ्यातच येते) तसे फळ मिळते.
तो उपाशी पोटी झोपत नाही, खुप संपन्नता लाभते. तसेच औषधाचे , कपड्याचे, पैशाचे व इतर मदतीचे दान निसर्ग/धम्म अनेक पटीने देतो.
☸️ पण ह्या कुठल्याच दानाने जो लाभार्थी असतो त्याच्या मनाची विशुद्धी व निर्मळता साध्य होत नाही. दुर्गुण दुर होऊन मंगल शांती मिळत नाही. जसे आपल्याला दिसते कि अनेक पैसेवाले माणसे बैचेन व अशांत असतात. पैशाचा होत नाही , कारण लोभ कमी होण्यासाठी, धर्म (धम्म : निसर्गाचे नियम ) व धर्मवान (सद्गुणी -सदाचारी-शुद्ध -संत) लोंकाची संगत व मार्गदर्शनही नाही. तु(मचे कर्म पैशाचे दान देण्याचे होते, तर पैसे मिळाला. धर्म(सुख-शांती) मिळवुन जर ती दान केली असती तर सुख-शांती मिळाली असती.
धरम ना हिंदु बौद्ध है, सिख ना मुस्लिम जैन ।
धरम चित्त की शुद्धता, धरम शांती सुख चैन ।।
☸️ पण जर जो कोणी करुण चित्ताने व निस्वार्थ भावनेने धम्माचे ( बुद्धवाणी: जी विशुद्ध मन व कर्म निर्दोष बनवुन एकुणच जीवन निर्दोष बनवते ) दान देतो किंवा धम्माचे दान मिळेल यासाठी मदत करतो, त्याला ह्या व पुढील अनेक जन्मातही निसर्ग/प्रकृती अनेक पटीने जास्त धम्मदान (बुद्ध वाणी जी सद्गुण व सुखशांती वाढवते) मिळवुन देते. अनेक धम्मविहारी व धम्मप्रवीण कल्याणमित्र मार्गदर्शक व मित्र भेटतात. ज्यामुळे निर्वाण/मोक्ष मिळुन लाखो-करोडो वेळा पुन्हा पुन्हा जन्म-मृत्युच्या फेर्यातुन मुक्त (भवमुक्त) होतो.
☸️ पुन्हा जर जन्मच नाही तर भुख, आजार, दुःख, प्रिय व्यक्तीचा वियोग किंवा अप्रि व्यक्तीचा संयोग, दारिद्रय, दुर्भावना व मृत्यु पासुन कायमची सुटका होते. मग ज्यामुळे सर्व प्रकारच्या दु:खातुन कायमची सुटका होते, ते दान अर्थातच महान व सर्वोत्तम आहे ना?
☸️ संधी नुसार (कालिक) दान व संधी नसताना (अकालिक) दान: विवेकशील व्यक्ती हे चांगलं जाणते कि संधी असल्यावर (कालिक) दिलेले दान खुप कल्याणकारी असते. जसे महापुर, महारोग, अग्निकांड, जागतिक साथ, बेरोजगारी, निवारा अशी संकटकालीन संधी मिळाल्यास केलेले संधीयुक्त /कालिक दान(जेवण, औषधं, पैसा, कपडे, सुव्यवस्थेची तजवीज) हे संधी नुसार(कालिक) दान फलदायी असते.
☸️पण त्याहीपेक्षा श्रेष्ठ असते संधी नसताना ही केलेलं असं सार्वकालिक दान!! जे करताना मनुष्य वाईट वेळ जरी नसली तरीही स्वताची सामाजिक जबाबदारी समजुन क्षमतेनुसार दान करीत जातो. आणि तेही धम्मदान (कर्म व जीवन निर्दोष बनवणारी बुद्ध वाणी चे दान) ज्याने इतरांचे दुःख दुर होऊन, सुखशांती व सद्गुण वाढतील.
☸️असे जात-संप्रदाय न पाहता केलेलं धम्मदान हे सदा-सर्वदा सर्वहितकारी दान असतं. कारण एकदा का मनुष्याचे मन निर्मळ, शोकविरहित व खंबीर झाले कि तो स्वताची रक्षा स्व:ताच करू शकतो. स्वतः सुखी राहतो व स्वतःची जबाबदारी ओळखुन वेळेनुसार समाजकार्यही करतो.
म्हणुन भगवान बुद्ध म्हणतात कि, सब्ब दानं धम्मदानं जिनाती !!
भले होवो!!
- संबोधन धम्मपथी.
९७७३१००८८६
*साभार* : विपश्यना विशोधन विन्यास वरील आचार्य गोयंकाजींचे हिंदी लेख.
*नोंद:* जर लेखात काही चुक आढळल्यास भाषांतर मी केल्याने चुकीची जबाबदारी माझी आहे, आचार्यांची नाही.