Saturday, 4 November 2023

सामाजिक सलोखा व बंधुत्व राखुन प्रबोधन


सामाजिक सलोखा व बंधुत्व राखुन प्रबोधन  

दिनांक : ५ नोव्हेंबर २०२३


आदरणीय अध्यक्ष, 

प्रज्ञासुर्य मित्र मंडळ 

मुलुंड पुर्व 

विषय : तुमच्या कार्यक्रमांसाठी धन्यवाद व अभिप्राय 

आदरणीय महोदय,

मी आयु संबोधन अशोक धम्मपथी, एक उत्सुक व सजग बुद्ध अनुयायी आहे. या पत्राद्वारे प्रज्ञासुर्य मित्र मंडळाच्या कार्यक्राचे मी अभिनंदन व धन्यवाद देत आहे. 

तुमच्या गेल्या दोन कार्यक्रमांना (भीम जयंती व अशोक विजयादशमी) मी उपस्थित होतो. त्यातुन अपेक्षित लाभ न होता, मन अप्रसन्न झाले. हे व्यक्तिगत मत तुमच्यापर्यंत पोहोचवणे मी माझे कर्तव्य समजतो.म्हणुन  मी विनम्र विनंती करतो कि, माझा अभिप्राय तुम्ही कृपा करून ऐकून घ्यावा. 

ह्या पत्राच्या पहिल्या भागात उद्भवलेले कटु प्रसंग व दुसऱ्या भागात त्यावरील उपायही सुचवत आहे. 

भाग पहिला : कटु प्रसंग 

१.१ पहिला प्रसंग- भीम जयंती : ह्या कार्यक्रमाला मी हजर होतो. संगीत, निवेदन व डेकोरेशन छान होते.  पण जो  वक्ता बोलायला आले होते, तो महत्वाचा मुद्दा आहे. कारण भीम-स्मृतीचे कार्यक्रम हे मुख्यत्वे प्रबोधनाचे व ज्ञान प्रसाराचे असावेत म्हणुन सर्वात महत्वाचे वक्ता आणि त्याचे प्रबोधन!! 

नियोजित वक्त्यांनी बासाहेबांच्याबद्दल (अगोदरच माहिती असलेले) मुद्दे  जसे हिंदु कोड बिल व स्त्रियांसाठी शिक्षण /वारसा हक्क असे काही मुद्दे मांडले होते. ते बाबासाहेबांचा भक्तिभावाने गुणगौरव करीत होते. पण सांगताना त्यांनी हिंदु धर्मात (संप्रदायात) अशी तजवीज नव्हती, हिंदु धर्मात अमुक नव्हते-तमुक नव्हते बोलत होते.. समाजात रूढी परंपरा व जातीआधारित व्यवस्था होती अशी वाक्ये हिंदु संप्रदायाची नवे घेऊन असे खुल्या मैदानात सारखे बोलत होते. असे बोलण्याने बाबासाहेबांचे गुणगान होत होते, पण इतरांच्या दोषांवर बोट दाखविल्याने त्यांचा आणि त्यांच्या संप्रदायाचा खुला अपमान होतो हे भान कोणी ठेवावे ? अशाने दोन समाजात दरी निर्माण होते, हे कोणी कळवावे? 

सार्वजनिक जाहीर प्रवचन करताना सत्य जरी बोलत असाल तर, ते इतरांच्या सांघिक/धार्मिक भावना दुखावणार नाहीत हि जबाबदारी वक्त्याने घेणे हे त्याचे आद्य कर्तव्य आहे असे मला वाटते. इतिहासात महामानव काय बोलले, ते पुन्हा पुन्हा बोलण्यापेक्षा त्याच्या मार्गदर्शनाने आजच्या कुठल्या समस्या सुटणार आहेत ते आदरपूर्वक व हितकर पद्धतीने सांगणे हे महत्वाचे आहे. बाबासाहेबांनीही तेच केले होते. महात्मा फुल्यांच्या कामाचा पाढा नेहमीच सांगत  बसण्यापेक्षा, त्यांनी त्या काळच्या समस्या सोडवण्यावर भर दिलेला होता . त्यामुळे घटनेने दिलेल्या "विचार स्वातंत्र्याचा'" उपभोग घेताना  इतरांचा अपमान करीत "बंधुता" ह्या शब्दाचा अर्थ व जबाबदारी जो विसरतो तो, व्यक्ती भीमानुयायी असणे शक्य नाही. इथे प्रत्येक बौद्ध बांधवांचे अनेक हिंदु बांधव मित्र, शिक्षक, मॅनेजर व शेजारी आहेत. अशी वाक्ये बोलण्याने, हिंदु बांधवांच्या समोर बौद्ध कुठल्या तोंडाने जातील? त्यामुळे खालील प्रश्न माझ्या मनात सारखे येवु लागले :
  1. हिंदु बांधवांच्या भावना कटू शब्दाने दुखावल्या गेल्याने, सध्याचे बौद्ध लोकलज्जेसाठी स्वतःला जर अबौद्ध मानु लागले तर त्याची जबाबदारी कोणी घ्यावी ?
  2. इतिहासातील बाबासाहेबांची कर्तबगारी पुन्हा सांगण्याने आज  समाजाच्या /देशाच्या कुठल्या समस्या सुटतील हे त्या वक्त्याने सांगितले का ?
  3. बाबासाहेबांसारखा नेता कसा तयार होतो, बाबासाहेबांसारखे सद्गुण  कसे मिळवायचे  किंवा चांगले नेते आज कशामुळे भ्रष्ट होतात? हे सांगणे भीमजयंतीच्या दिवशी महत्वाचे नाही का?
  4. काही भावना  दुखावल्या गेल्याने काहींनी अप्रसन्न होऊन जर गावातल्या गरीब-दुर्बल बौद्धांवर हल्ला झाल्यास तर त्याची जबाबदारी कोणी घ्यावी ?
  5. काही भावना  दुखावल्या गेल्याने काहींनी अप्रसन्न होऊन जर नोकरीत,व्यवसायात, गावात, सोसायटीत बौद्धांना टाळु/हिणवु  लागले तर त्याची जबाबदारी कोणी घ्यावी ?

हे प्रश्न गंभीर व अनुत्तरीत असल्याने, अशा अबोध, दिशाहीन व बेजबाबदार वक्तव्याची जबाबदारी वक्त्या सोबत आयोजन कर्त्यांवर व त्या-त्या समाजावरही असते. कारण हाच समाज अशा कार्यक्रमांना पैसे देतो व कार्यक्रमाला उपस्थित राहतो. तसे आपल्याकडून नकळतही  होऊ नये हीच बौद्ध जनतेची भावना त्या कार्यक्रमातील ८०-९०% रिकाम्या खुर्च्यांची आपल्यापर्यंत स्पष्टपणे पोहोचवली आहे. 

१.२ दुसरा प्रसंग - अशोका विजयदशमी  : ह्या दिवशी कार्यक्रमाची रूपरेषा अनियंत्रित झाली, मी स्वतः प्रमुख वक्ता होतो. आणि दिलेल्या वेळेच्या ३० मिनिटे अगोदरआलो होतो. ऑफिसला सुट्टी नसल्याने आणि कार्यक्रम वेळेत सुरु न होता लांबल्याने मी निघून आलो. त्याबद्दल क्षमस्व!!

ह्या कार्यक्रमासाठी माझाकडे दोन-अडीच तासाचाच वेळ होता व हि  अडचण अगोदरच आयु अमित केदारेना वेळेत कळवली होती. एक तास थांबूनही कार्यक्रमाची रूपरेषा बिघडली आणि तरीही मला धर्मसेवेची नियोजित संधी मिळाली नाही, तेव्हा मी निषेध करीत, प्रज्ञासुर्य मंडळाचा निरोप घेतला. 

जेव्हा  मी ४५ मिनिटांनी ऑफिसच्या कामाची तजवीज करुन जबाबदारी व शब्द पूर्ण करण्यासाठी कार्यक्रमात पुन्हा आलो, तेव्हा हिंदु समाजाचे प्रमुख चे स्थानिक नेते उपस्थित होते. त्यांच्या उपस्थित सर्व बौद्ध जनतेसमोर एक उच्च सुशिक्षित व प्रतिष्ठित स्त्री प्रवचन देत होती. दुर्भाग्यवश ती स्त्री (कदाचित अनियोजित वक्ता असल्यामुळेही )  बौद्ध लोक हिंदु सणांची व संताची आश्रय घेतात म्हणुन बौद्धांची व हिंदु सणांची व संताची निंदा करू लागली.  हि निंदा एवढी दुर्दैवी व कटु होती कि, हिंदु नसूनही मला खूप खूप वाईट वाटले!  

मी माझ्या अनेक हिंदु बांधवांचा खुप खुप ऋणी आहे. हे आपल्याला माहिती आहे कि, स्वतःच्या आईवर स्नेह व प्रेम करणारा मुलगा,  इतरांच्या आईची निंदा करत नाही. तसेच स्वतःच्या श्रद्धास्थानाला मानणारा, दुसऱ्याच्या श्रद्धास्थानाची निंदा करू शकत नाही.त्या स्त्रीला थांबवण्याची प्रबळ इच्छा झाली, पण मी स्वतः ला थांबवले. त्यानंतर प्रवचन चालु असताना १२:४५ वाजता खीरदानाचा सुरु झालेला कार्यक्रम हाच्या कार्यक्रमात व्यत्यय आणीत  होता. 

कार्यक्रमात आलेले हिंदु समाजाचे प्रमुख चे स्थानिक नेते १००% अप्रसन्न झालेले असणार यात मला तिळमात्र शंका नाही. पण त्यांनी सामंजस्याने घेतले, पण तिचे भाषण आवरल्यावर विनम्रपणे सभात्याग केला व निरोप घेतला. 
 खालील प्रश्न माझ्या मनात सारखे येवु लागले :
  1. हिंदु बांधवाना सन्मानपूर्वक बोलाऊन त्यांचा अपमान करणे हे बौद्धांचे कर्तव्य व हक्क आहेत का?
  2. त्यांचा अपमानावर  त्या वक्त्या, आयोजक व बौद्ध समाज  मलम/उपचार कसे लावणार आहेत?
  3. त्या वक्त्यांनी बौद्धांचे बुध्दवाणी लोकांपर्यंत पोहोचत नाही, ती कशी पोहोचवावी व काय धोरणे ठरवावीत हे सांगितले का ?
  4. काही भावना  दुखावल्या गेल्याने काहींनी अप्रसन्न होऊन जर गावातल्या गरीब-दुर्बल बौद्धांवर हल्ला झाल्यास तर त्याची जबाबदारी कोणी घ्यावी ?
  5. काही भावना  दुखावल्या गेल्याने काहींनी अप्रसन्न होऊन जर नोकरीत,व्यवसायात, गावात, सोसायटीत बौद्धांना टाळु/हिणवु  लागले तर त्याची जबाबदारी कोणी घ्यावी ?
  6. गरीब, दुबळा व अल्पसंख्याक बौद्ध समाज सबळ  समाजाची निंदा करताना त्याच्याकडे काही सुपरपॉवर आहे का ? आणि जरी ती असली तर, असा दुरुपयोग भीम-बुद्धाला अपेक्षित आहे का?

ह्या प्रश्नांची उत्तरे वक्ता, आयोजक  व बौद्ध समाज यांना द्यावी लागतात, आणि ती कोणी देऊ शकत नाही. त्यामुळे नोकरीत,व्यवसायात, गावात, सोसायटीत बौद्धांना स्पष्ट/अस्पष्ट   टाळु/हिणवु  लागले आहेत. याची दखल उच्च सुशिक्षित व प्रतिष्ठित घ्यावीच लागेल. 


 धर्मांतराच्या ६७ वर्षांनंत सर्व बौद्धांना, आता तरी हे समजायला  हवे कि द्वेष-दुर्भावना दिल्याने अशांती वाढते. आणि जिथे बैचेनी व अशांती असते, तिथे शहाणी माणसे जात नाहीत. आणि तिथे काही काळासाठी गेल्यास थांबत नाही. 

जोपर्यंत बुद्ध वाणी सर्व जाती-धर्मापर्यंत पोहोचवण्याठी, कुठली धोरणे, कुठली पद्धत, कुठले वक्ते आपण ठरवायचे  व ते कसे सुधारायचे जो पर्यंत आपल्याला कळत नाही तो पर्यंत आपल्याकडुन देशसेवा व मानवसेवा होणार नाही. अपयश निश्चित आहे.  

भाग पहिला : कटु प्रसंग समाप्त 

भाग दुसरा  : कटु प्रसंगावर उपाय-योजना 

२.१ पहिला प्रसंग- २०२३ भीम जयंतीच्या दिवसासारखे   दुर्दैवी भाषण टाळण्यासाठी उपाय-योजना :
  1. कोणत्याही कार्यक्रमाला वक्त्यांची निवड करण्यापूर्वी त्याचे भाषण, व्यक्तिमत्व, शब्द प्रभुत्व, मुद्द्यांची मांडणी, सामाजिक सलोख्याची जबाबदारी व विचार   ऐकूनच व तपासूनच घ्यावे.
  2. पाली भाषा माणसांना व निर्जीव मूर्तीला समाजात नसल्याने ३०-५० मिनिटे घेतल्याने कोणी प्रसन्न होईल अशी अंधश्रद्धा पसरवण्यापेक्षा हि औपचारिकता ५-१० मिनिटांत संपवावी. 
  3. वक्त्यांना अगोदरच कळवावे कि दोन संप्रदायात वाद-भांडणे होतील असे मुद्दे न मांडलेले बरे. विष पेरुन कोणाच्या भावना दुखवु नये. कारण आगीने आग विझत नाही, ती पाण्यानेच विझते ! हा सनातन(पर्मनंट) धर्म/नियम  आहे. 
  4. प्रबोधन करताना इतर जाती-धर्माचा आदर पुर्वक उल्लेख करावा अन्यथा अबौद्धच नाही तर बौद्ध हि खुप  नाराज होतात. याची कल्पना द्यावी.
  5. शक्य झाल्यास वक्त्यांकडुन त्याच्या प्रवचनाची लेखी प्रत मागवावी. आणि अनुचित मुद्दे काढण्याची मागणीच करावी. 
  6. उदाहरणासाठी लक्षात ठेवावे एक खरा ख्रिश्चन आचार्य, इतरांची निंदा करण्याच्या ऐवजी प्रभू येशुची मैत्री, प्रेम व सद्भावना लोकांपर्यंत पोहोचवतो. ज्याने लोकांचे (ख्रिश्चन व अ-ख्रिश्चन )  प्रभू येशु वरती प्रेम व सद्भावना वाढते.  हे तर बौद्धांनाही जमायला पाहिजे!!

२.१ दुसरा प्रसंग- २०२३ अशोका विजयादशमी च्या दिवशी दुर्दैवी भाषण आणि कार्यक्रमाचे अनियोजन टाळण्यासाठी उपाय-योजना :
  1.  सर्वाना मोबाईल बंद/सायलेंट ठेवायला सांगावा. व `बोलण्यासाठी फोन घेऊन बाहेर जाण्यास सांगावे. 
  2.  पालीतुन होणारा बौद्ध पुजा पाठ हा बुध्द मूर्तीला व माणसांनाही समजत नसल्याने त्याचा अपेक्षित परिणाम होत नाही. म्हणुन तुम्हाला हे दिसले असेल, कि  अधिकांश  बौद्ध समाज सकाळी ११ ची वेळ दिली असताना १२.३० वाजता आला होता. याला अपवाद होते आयोजक व नोकरीतुन निवृत्त झालेली माणसे!
  3. बौद्ध पुजा पाठ घेणारे भंतेजी/बौद्धाचार्य यांना कितीही इच्छा असली तरी, जर ते मुख्य प्रवचनकार नसतील तर, त्यांना ५-१० मिनिटापेक्षा अधिक वेळ घेऊन कार्यक्रमाची रूपरेषा संकटात आणू नये. अशा वेळेस नियोजित अध्यक्षाने जबाबदारीपूर्वक इशाऱ्याने/बेल वाजवुन अनियोजित भाषण थांबवावे. कारण मानसशास्त्रानुसार ५० मिनिटानंतर माणसे कंटाळतात, ६०+ वयाच्या लोकाना लघवीला जावे लागते. तरुण वर्ग कंटाळुन निघुन जातो. आयोजकांना हे अपयश खुप जिव्हारी लागते. 
  4. कार्यक्रमाच्या मुख्य वक्त्याला १०-१५ मिनिटानंतर लगेच संधी द्यावी, कारण स्वतःचे भाषण लक्षात ठेवणे, मुद्देसूद मांडणे व भाषणाचा उत्साह कायम राखणे हे खुप कठीण काम आहे. १-२ तासाने तो वक्ता स्वतःच कंटाळतो व कसे बसे भाषण आवरून निघुन जातो. प्रत्येकाने स्वतःच्या दिवसाचे नियोजन नियोजित वेळ ठरवुन केलेले असते. श्रोते बैचेन  झाले कि वक्ता हि भाषण संपवुन टाकतो. आयोजकांना व जनतेसाठी हे अपयश खुप दुर्दैवी असते. कारण वर्षाच्या  ३६५ दिवसांपैकी बौद्धांकडे २-३ कार्यक्रम असतात.
  5. जर कार्यक्रम ३-४ तासांचा ठेवायचा असेल, तर ६०-७० मिनिटांनी ब्रेक/विश्रांती घ्यावी. अशाने लोकांची मने पुन्हा टवटवीत होतील. 
  6. "फक्त दोनच शब्द बोलतो" असे बोलून माईकचा  ३०-५० ताबा मिनिटे घेणाऱ्या अनियोजित वक्त्यांना थांबवण्याची जबाबदारी हि अध्यक्ष व सूत्रसंचालकांची असते.  ती त्यांनी हिंमत ठेवुन, ठामपणे व प्रेमपूर्वक पार पाडावी. 
  7. प्रवचन जर वेळेत सुरु केले तर, प्रवचन चालु असताना खीरदानाच्या कामाने व्यत्यय येणार नाही. 

मला विश्वास आहे ह्या समस्या व त्यावरील उपाययोजना लक्षात घेऊन नियोजन केले कि, मेहनत घेऊन आयोजन करणाऱ्यांना उच्चतम समाधान, यश, प्रतिष्ठा व सामाजिक कामांना गती मिळेल. तसेच इतर अबौद्ध  समाजासोबत सामाजिक सलोखा व बंधुत्व टिकविण्यास मदत होईल. कार्यक्रम थोडक्यात पण प्रभावी झाल्यावर लोक (खास करून तरुण मंडळी) कार्यक्रमाला येतील. 

माझे विचार व मत सांगताना मी लहान तोंडी मोठा घास घेतल्याचे जाणवत असेल, किंवा'कोणी नाराज झाले असल्यास मी तुमची दोन्ही हात जोडुन माफी मागत आहे. 

आपल्यातला स्नेह व जिव्हाळा वृद्धिंगत व्हावा ह्या अपेक्षेने पात्र पूर्ण करतो. खुप खूप धन्यवाद व जयभीम!!

संबोधन धम्मपथी 
मुलुंड पूर्व , मुंबई ८१. 

https://sambodhandr.blogspot.com/2023/11/blog-post.html





















Monday, 12 December 2022

क्षांति पारमिता

 क्षांति पारमिता 

शांति प्रिय सज्जनो सन्नारियों,

आओ, आज क्षान्ति पारमिता के बारे में विमर्श करें। भगवान गौतम बुद्ध ने अपने जीवन में सनातन-शाश्वत धर्म का स्वयं साक्षात्कार किया एवं उसको जनता में निस्वार्थ रूपसे मुक्त हस्त बांटा। उन्होंने निर्वाण प्राप्ति के मार्ग को भी सहज-सुलभ पद्धति से सुआख्यात किया।  उस लोकोत्तरीय अवस्था को प्राप्त करने की लिए मनुष्य को दस परम अवस्थाओंको परिपुर्ण रुप प्राप्त करना होता है।इन्हे  बुद्ध वाणी में पारमिताएँ कहते है. ये दस पारमिताएँ  निम्न प्रकार की होती है: १: दान , २:शील, ३: निष्क्रमण, ४:प्रज्ञा, ५: वीर्य, ६:क्षान्ति, ७:सत्य, ८:अधिष्ठान, ९: मैत्री, १०: उपेक्षा (सन्दर्भ :१ )। एक महत्वपूर्ण यह बात है, की इन दसों में कहीं 'श्रद्धा' नहीं है। जब की श्रद्धा पांच बलों मैं प्रथम है (सन्दर्भ :१ )। लेकिन श्रद्धा धर्म के विविध रूप में अंतर्निहित है और दिखाई दे रही है।  उदाहरणार्थ बिना श्रद्धा के कोई दान और शील पालन नहीं कर सकता ।  

श्रद्धावान साधक इनकी परिपुर्ण प्राप्ति से दस संयोजनों से स्थायी रूप से मुक्त हो जाता है, अर्थात अपनी दुःखोंसे मुक्ति पाता है। उस अनुपम  लोकोत्तर और इन्द्रियों से परे कि  नितांत मुक्त अवस्था को प्राप्त करता है जो शाश्वत है, ध्रुव है। इसिलिये धर्म की इन विविध  विषयों/पारमितांको को (एक ही कालखंड में अनेक विषयों का अभ्यास जैसे की दसवीं की कक्षा) या फिर एक कालखंड में एक ही विषय/पारमिता का अभ्यास अनेक जन्मों में करता है !! इन दस विषयों की अर्जित पद्धति दोनों में से चाहे जो भी हो, इन सभी विषयों में  १००% गुण प्राप्ति होने पर ही नितांत मुक्त, अर्हन्त अवस्था प्राप्त की जाती है. तो वह साधक श्रावक बुद्ध याने अर्हन्त बन पाता  है। इन १००%  गुणों की लक्ष प्राप्ति करते करते न जाने कितने जन्मों का अवधि लग सकता है। लेकिन निर्वाणिक अवस्था का पहला स्टेशन (स्रोतापन्न) पा  लेने के बाद साधक अधिक से अधिक सातवें जन्म में निर्वाण प्राप्त कर लेता है।   (सन्दर्भ :२  )


बुद्ध तीन प्रकार के होते है।  सम्यक संबुद्ध , प्रत्येक बुद्ध और श्रावक बुद्ध। संबुद्ध वह  होते है जो धर्म की शिक्षा और दुःखमुक्तिदायिनी विद्या का स्वयं अनुसन्धान करते है और स्वयं नितांत मुक्त अवस्था प्राप्त करते है।  इसदृष्टि से वें आत्मनिर्भर होते  है। संबुद्ध दो प्रकार के होते है: सम्यक संबुद्ध और प्रत्येक बुद्ध ! सम्यक संबुद्ध होने के लिए अनेक जन्मों में  ( दसों परमिताओंकी पुर्ति की यात्रा), हर दस पारमिताओं का सर्वोच्च अभ्यास करना होता है।  और हर  जन्म में वो अपने साथ औरों की मुक्ति का भी यथोचित प्रयास करते है।  इसीलिए परहितकारी होने के कारन सम्यक(परिपुर्ण ) रूप से संबुद्ध होते है। 

जब की प्रत्येक बुद्ध, दस पारमिताओं की पुर्ति की यात्रा में किन्ही कारणोंसे औरों की मुक्ति में सहायक नहीं होते।  अर्थात उन्होंने स्वतः सम्बोधि भले ही प्राप्त की हो, परंतु किसी अन्य मनुष्य को धर्म नहीं सिखा सकता।  इसीलिए प्रत्येक यानि एकाकी संबुद्ध बनते है। इस संबोधि (स्वयं प्राप्त की हुयी बोधि ) प्राप्ति की यात्रा में उनकों (सम्यक बुद्ध और प्रत्येक बुध्द)  अनगिनत जन्मों में भव संसरण करना होता है। पारमिताओं की पुर्णता करते हुए उन्हे जितने   जन्म लेने पड़ते है, उन-उन जन्मों में उसको बोधिसत्व (जो आगे जाकर संबुद्ध बनेगा) कहते है। सम्यक संबुद्ध बनने के लिए , दस पारमिताओं का अभ्यास व उपलब्धि श्रावक या प्रत्येक  बुद्ध  की तुलना से गंभीर एवं त्रिस्तरीय होती है।

श्रावक बुद्ध वह है जिसने सम्यक संबुद्ध से धर्म और धर्म प्राप्ति की विधि (विपश्यना) सीखी/सुनी और दस पारमिताओंसे दस संयोजनों से मुक्ति पायी ।  श्रावक बुद्ध सम्यक संबुद्ध पर निर्भर होते है, क्योंकि सम्यक संबुद्ध से उन्हें धर्मज्ञान/मुक्तिमार्ग की प्राप्ती होती है  . 



सम्यक संबुद्ध  बनने की अनगिनत जन्मों की यात्रा में दस पारमिताओं की पुर्णता या सघनता  (१०० गुण ) के लिए अपने सांसारिक धन-संपदा, वैभव-ऐश्वर्य, प्रभुत्व-सत्ता है  नहीं बल्कि अपने किन्ही किन्ही अंगो का भी परित्याग करना पड़ता है।  इस ऐहिक (भौतिक व अल्प शारीरिक) परित्याग से दस मुल पारमिताएं के साथ दस उप-पारमिताएं जुड़ जाती है। 

इस से भी आगे सम्यक संबुद्ध  बनने के लिए, किसी और की मुक्ति में सहायता करते हुए दस परमिताओं को पुरा करने के लिए जब बोधिसत्व अपने पुरे जीवन का भी त्याग करते है, तब नयी और दस परमार्थ पारमिताओं को अर्जित करते है।  इससे बोधिसत्व अपने सम्यक संबोधि की दिशा में १०० गुण पाता है।  फिर उनका अगला जन्म सम्यक संबुद्ध के साथ अंतिम जन्म सिद्ध होता है।  

दस परमार्थ  पारमिताओंके को समझाने के लिए एक उदहारण देता हुँ।  सन १९६३ में व्हिएतनाम मे उस समय की सरकार बड़ी अन्यायी, क्रुर और पक्षपाती थी। अन्य बुद्ध शिष्य और बुद्धवाणी की सुरक्षा उस समय की सरकार से सहकार्य की अपेक्षा में जब सारे उपाय निरर्थक साबित हुए तब वरिष्ठ बुद्ध भिक्षु थिच कुआन डक  ने वीर्य पारमिता से उद्योग कर के  अपने जीवन का दान दिया।  उन्होंने यह अधिष्ठान लिया के, "जब तक में में जीवित हुँ तब तक इस अग्नि के दाह से ना तो मैं अपना आसन छोड़ुंगा, ना हीं चिल्लाऊंगा और न ही थोड़ी सी भी हलन-चलन करूँगा" ।  मृत्युपुर्व उन्होंने अपने अंतिम पत्र में देश के उस समय के अन्यायी अध्यक्ष को मैत्री-करुणा पूर्वक सभी देशवासियों और सम्प्रदायों के प्रति स्नेह-सद्भावना रखने का विनम्रतापुर्वक आवाहन किया।  जीवन त्यागने के पुर्व उन्होंने अनेक वर्ष, सभी अन्यायों का धीरज और साहस के साथ (क्षांति पारमिता से )सामना किया और सरकारी   अधिकारीयों से धर्मपुर्वक संघर्ष किया। उनके बलिदान के बाद भी अनेक भिक्षुओंने भी सरकार को मनाने के लिए जीवनदान दिया ।  इस महान त्यागों के परिणाम स्वरुप ही देश में समता और भाईचारे की शुरुआत हुयी।  (सन्दर्भ :३   )। 


आत्मदहन करते हुए भिक्षु थिच कुआन डक की अंतिम तस्वीर 

किसी बोधिसत्व का एसा पारमिता पुर्वक परमार्थ कल्याणकारी त्याग बड़ा ही दुर्लभ होता है।  इसिलए कहा जाता सम्यक संबुद्ध का उत्पन्न होना एक अत्यंत दुर्लभ और महामंगलदायी घटना है।  कोई भी व्यक्ति इन तिस पारमिताओंको प्राप्त करके ही सम्यक संबुद्ध बनता है।  श्रावक बुद्ध बनने  के लिए केवल पहले की दस पारमिताएं ही पर्याप्त है।  (सन्दर्भ :१ )


दानादि धम्म विधिना जितवा मुनिन्दो ..,

हम देखते है की सिद्धार्थ गौतम ने जब मार को अकेले ही पराजित किया, तो कहा गया कि दान और अन्य पारमिताओं के बल से ही उन्होंने यह विजय प्राप्त की (सन्दर्भ :४  )। 


मेरे विचार से, अर्हंत/संबोधि फल के लिए निश्चित रुप से ही सभी दस पारमिताएं अनिवार्य हो लेकिन, जब बात आती है आसपास के धर्मप्रेमी मनुष्यों को प्रेरणा, धैर्य और ध्येय देने की लिए कल्याणमित्र /गुरुबंधु को सत्य, शील, क्षांति एवं मैत्री ये चार बहोत ही महत्वपुर्ण पारमिताएं  है। आटानाटिय सुत्त में इस का उद्घोष इस प्रकार से है(सन्दर्भ :५ )।  :

तेसं सच्चेन सीलेन, खन्ति  मेत्ता बलेनच, 

तेपि त्वं अनुरक्खन्तु, अरोगेन सुखेनच || 


विपश्यना सीखने कि बाद जैसा की पुज्य गुरुदेवजी ने कहा, हमें स्मृती और संप्रज्ञान को दिनरात अभ्यास करना होता है। सैंतीस बोधिपक्षीय धर्मों (सन्दर्भ :६ ) में 'स्मृति' पारमिता स्पष्ट-अस्पष्ट रूप से ११ बार कही गई है।  तो में उसी का अभ्यास ज्यादा करता था।  लेकिन अपने आप की चित्त वृत्तियों को समझने के बाद मैंने हाल ही में 'क्षांति' पारमिता पर अधिक जोर दे रहा हुँ। ये ठीक उसी तरह है की जैसे, घर का एक कमरा रोज  साफ करते करते, अन्य कमरे के ऊपर उचित ध्यान न गया हो, तो अब उस कमरे की सफाई शुरु कर दी है ।  

इसीलिए इस लेख मे मेंने क्षांति पारमिता पर विचार संदर्भसहित सामने रखता हुँ। क्षांति पारमिता का सही अर्थ किसी एक हिंदी शब्द के आधार पर नहीं कहा जा सकता। आचार्य गोयन्काजीने बुद्ध जीवनी जे अनेक प्रसंगो को उजागर किया है।  गुरूजी के अनुसार क्षांति का सही अर्थ: अमर्याद और मंगलमयी धैर्य,  चित्त की दृढ़ता, संयम (जिसमें उद्यमता हो) और सहिष्णुता बताया है। ये चारों गुणों का संगम हो जाये तो क्षांति पारमिता की सही संज्ञा बन सकती है। क्षांति पारमिता से मैं यह समझ सकता हुँ के मनचाही न होने और अनचाही होने पर, धीरज रखना चाहिए, आनेवाले समय में स्थिति में सुधर होगा (सकरात्मता-आशावाद) । और यदि किसी हालत में सुधर न भी हुआ , तो भी मन में सारे प्राणियों के प्रति सद्भावना बनी रहनी चाहिए, शील नहीं छुटना चाहिए और नहीं मन में अकुशल भावनाउत्पन्न होनी चाहिए।  तो ही क्षांति पारमिता पुरी होगी। तो आओ उन प्रसंगो को देखे और उनसे क्षांति-धर्म सीखें जो मुझे प्रेरणा देते है। 

१. पहला प्रसंग :  अनेक लोगों की जान बचाने के लिए जब तथागत ऐसे सुने घर गए जहा दुर्दम्य और विक्राल  यक्ष आळवक  रहता था। आळवक पर घर पर नहीं था तो भगवान ने  घर में उचित स्थान पर ध्यानस्थ हुए। आळवक क्रोध के मारे ने उन्हें अपमानित करके उन्हें घर से निकलने को कहा।  भगवान ने कहा ' आयुषमान , ठीक है। " और बाहर चल दिए। उनके जाने के बाद तुरंत कहा , "श्रमणा, अंदर आ जाओ" तो भगवान ने "ठीक है। " कहकर पुनः भीतर आये।  यही किस्सा ठीक  तीन बार हुआ, जैसे पुनः प्रसारित हुआ हो।  तब भगवान ने दृढ़ निश्चयसे से कहा, "मैं अब नहीं जाऊंगा तुम्हे जो ठीक लगे सो करो।" ऐसा कहने पर आळवकने। उन्हें  क्रूरतापुर्वक हत्या की धमकी देने पर भी अपने निश्चय से नहीं हटे।  उनका ध्येय कल्याणमित्रता हिमालय की भांति ऊँचा और  भाँति विशुद्ध था। फिर  क्षांतिपुर्वक उन्होंने क्रोधी लेकिन विद्वान आळवक के प्रश्नों के उत्तर अपनी समताभरे चित्त से दिए (सन्दर्भ :७  ) ।  यह प्रसंग उच्च दर्जे का धैर्य, चित्त की दृढ़ता, संयम और सहिष्णुता बताता है। 

२ .दुसरा  प्रसंग :  जन्म से सुखवस्तु घर में पला बड़े सिद्धार्थ गौतम का आदर तो हो ही रहा था।  पर उनके मैत्रीपुर्ण व्यवहार और प्रभावी व्यक्तिमत्व के कारण लोग उन्हें बहुत प्रेम-स्नेह भी बहुत देते थे। अगर ऐसा जीवन व्यतीत हुआ हो और थोड़ा भी उपमर्द या अनुचित व्यवहार हो तो व्यक्ति के उद्विग्नता का क्या कहना?  क्रोध और उद्विग्नता का  कारण  भी तो है, "अमुक ने मेरा अपमान  किया!" . इससे भी बड़ा घातक अपमान ऐसे व्यक्ति का हुआ जिसे राजा-प्रजा ही नहीं बल्कि समस्त देवलोक भी दिनरात पुजते है।  

ऐसे एक प्रसंग में , अग्गिक भारद्वाज ब्राह्मण ने तथागत को कहा , "आगे न बढ़...वहीं रुक जा ए बहिष्कृत, ए  मुण्डक! मेरा यज्ञ ख़राब मत कर!" ऐसे दुत्कारने पर भी क्षांति पारमिता के कारण भगवान ऐसे अपमान को सह सके. मंगल मैत्री देते हुए उन्होंने कहा (सारांश) की बहिष्कृत/वृषल  किसे कहते  है।  फिर कहा  , "हे ब्राह्मण, जन्म से ना कोई बहिष्कृत होता है न जन्म से कोई ब्राह्मण! कर्म से ही कोई बहिष्कृत होता है और कर्म से ही कोई ब्राह्मण।"

कुछ ऐसा ही प्रसंग अक्कोस भारद्वाज के साथ हुआ, क्षांतियुक्त सुदान्त चित्त से भगवान ने उसमें धर्म जगाया।  जो किसी व्यक्ति से भी और किसी प्रकार से भी क्रोधित नहीं किया जा सकता और जो दूसरोंको भी क्रोधित नहीं करता, उसी व्यक्ति लोग मुनी कहते है (सन्दर्भ :९  ) ।  


३ .तिसरा प्रसंग:  आचार्य उरुवेल कश्यप और उनके बंधुओंके अनेक अनुयायी भगवान से बहुत क्रुद्ध हुए थे, क्योंकि वे सब भगवान के अनुयायी बन चुके थें।  तो ऐसे अंध भक्तो से अनेको बार भिक्षुओंको गाली, दूषण या विविध लांछनो को भी दिनरात सामना करना पड़ता था ।  अगर ऐसे अप्रिय स्थिति कुछ घंटो या दिनों में निश्चित रूप से समाप्त होनेवाली है इसकी जानकारी हो, तो आदमी उसको दिन गिनते-गिनते सहन भी कर सकते है । लेकिन अगर मालुम ही न हो, की ये बहिष्कृतता कब समाप्त होगा तब सच्ची परीक्षा (अमर्याद धैर्य) होती  है।  जैसे अशुद्ध सोने को मालुम नहीं होता की सुनार कितने समय तक मुझे भयंकर भट्टी  में तपाने वाला है। तो धैर्य,साहस और संयम  के अभ्यास भी कोई निश्चित सीमा नहीं, क्योंकि सब अनिश्चित ही तो है।  ऐसा तप और क्षांति पारमिता का सामर्थ्य बुद्धपुत्र भिक्षु कोलित (मोग्गालन) और भिक्षु उपतिष्य (सारिपुत्त) ने दिखाया जो अभी तक अरहंत नहीं बने थे।  

४ .चौथा प्रसंग : तथागतने अनेक प्रेरणादायी और गंभीर प्रसंगोंमें क्षांति पारमिता का दर्शन अपने आचरण द्वारा दिया है।  अनुपम शास्ता है तो उनके शासन में प्रवीण अनेक गृहस्थ साधक-साधिकाओंए ने भी अनिच्छित, अवांछित अप्रिय प्रसंगों में क्षांति पारमिता दर्शित होती है।  

ऐसा ही विपश्यी शिष्य राजा बिंबिसार! जिसने अपने पुत्र को जो संपुर्ण सत्ताप्राप्ती के लिए अंध हो कर अपने ही सत्ता-निवृत्त हुए पिता बिंबिसार कि हत्या करने चला था।  उसी को बिंबिसार ने विकसित क्षांति पारमिता से वात्सल्यभाव दिखाकर केवल माफ़ ही नहीं किया बल्कि मन में किसी बात का द्वेष भी नहीं रखा। अंत में अपने पिता को कैदी बना कर तड़पा-तड़पा कर मरवा दिया।  अंत तक बिंबिसार ने क्षांति (अमर्याद धैर्य-धीरज) के आधार पर न उसके बार में क्रोध जगाया न अपने को व्याकुल बनाया।  इस स्वाभाविक नकारात्मक मनोस्थिति के विपरीत उसका ह्रदय अपने पुत्र के प्रति सदा करुणा से भरा रहा! चित्त से मंगल मैत्री ही निकलती रही!

फुट्ठस्स लोकधम्मेहि, चित्तं यस्स न कम्पति।
असोकं विरजं खेमं, एतं मङ्गलमुत्तमं॥11॥ (सन्दर्भ :१०   )

जिसका चित्त आठ लोकधर्मों ((लाभ-हानि, यश-अपयश, निंदा-प्रशंसा, सुख-दुख)  के संपर्क से प्रकंपित नहीं होता, जो अशोक, निर्मल एवं निर्भय रहता यह उत्तम मंगल है। 

मैंने जाने-अंजाने में अनेकोबर मेरे बच्चों और पत्नी को व्याकुल-क्रुद्ध हो कर डांटा है। ऑफिस/समाज में कुछ एक घटना  हुयी तो उसी चिंतन से और नकारात्मक स्थिती का चिंतन कर के मैं वो स्नेह व आदर नहीं दे सका जिसके वें हक़दार है।  इस सप्ताह की दो घटनाएं बताता हुँ जिन से मैंने अपने आप को क्षांति पारमिता से संभाल लिया।  

प्रसंग १ : मैंने बच्चों के लिए ऑफिस से आधे दिन का आवेदन चढ़ा कर छुट्टी लेली।  बॉस ने सन्देश भेजा, "कितनी छुट्टियां ले रहे हो?  पहले क्यों नहीं बताते? अभी जाओ,अगले दिन  को बात करेंगे। " मैंने हमेशां की तरह तर्क-वितर्क करना शुरु कर दिया।  अब क्या होगा? बॉस कितना डांटेगा? भला बुरा कहेगा? प्रायः ऐसी भय में अपना भय पत्नी को बताता हूँ जो मेरा सहस बढाती है।  इस बार उसे न बता कर, मैंने अनित्यबोध के साथ अमर्याद ध्येय और चित्त की दृढ़ता कायम रखने का काम शुरु कर दिया।  ५% धर्म विचारोंने ९५% अकुशल विचारोंको पराजित कर दिया।  क्षांति पारमिता से मैंने अपने पत्नी और बच्चों को न केवल डाँटा बल्कि स्नेहपुर्ण व्यवहार भी किया।  यह मेरे लिए अद्भुत और चमत्कारपुर्ण था।  

प्रसंग २ : मेरा बेटा  दसवीं कक्षा में होने पर भी, बड़ा बीमार, आलसी और अनुत्साही होकर अनुशासनहीन और गैरजिम्मेदारीपुर्ण व्यवहार करता है।  मैं उसे प्रायः डांटता हुँ और बहुत बार कटुता का प्रभाव दिखता है। इससे कोई लाभ नहीं होता, उससे उसका आत्मविश्वास और कम हो जाता है।  मैं इसे भी खुब जानता हुँ की वो मुझसे बहुत ही प्यार-आदर करता है।  पर फिर भी बात सही दिशा में नहीं जा रही है।  पर मेरी व्याकुलता और उसके प्रति रुक्षता बढ़ रही है। आज उसको मैंने क्षांति पारमिता (हम नहीं जानते यश मिलेगा भी या नहीं, पर अमर्याद धैर्य रख कर अनित्यबोध जगाया)  से समझाया तो देखा, भले ही वो समझा हो या नहीं समझा वो बात अलग।  लेकिन मैंने उसे समझाते समय, मन में कटुता या कठोरता नहीं आने दी (या बहुत की कम थी) और ना ही उस के प्रति अनादर रखा। उसे क्षांति पूर्वक प्रेमभरे शब्दोंसे कुछ प्रश्न पुछे जिससे उसकी मनोभावों का मुझे अंदाजा हो। मैंने प्रयत्न तो किया, पर समताभाव था।  भाविष्य में पुत्र द्वारा आनेवाले भय से मैंने कुछ काल के लिए ही सही छुटाकारा पा लिया। उसका पता नहीं, पर मेरा तो कल्याण हुआ क्योंकि क्षांति पारमिता के कारन में मेरी व्याकुलतासे बच पाया ।  उसका भी भला हो ऐसी मंगल कामना बिना चिंता/भय के साथ जगी।  यह तो पहले कभी नहीं हुआ था। 

प्रसंग ३  : आज का ही किस्सा है।  ऑफिस में आसपास के लोगों की आलास, कुटनीति और छलकपट से बहुत ही व्याकुल रहता हूं।  कुछ दिनों पहले ऐसे ही लोगों को मैंने अपने बॉस के सामने खुब डांटा।  बॉसने मुझें पप्यार से समझाया फिर भी मुझसे सहन न हुआ।  अभी इन्ही लोगों ने मेरे विरुद्ध के शिकायत की के, मैं बहुत ही डांट रहा हुँ।  इस बात के लिए बॉस ने मुझे दोष दिया और कई बार सुनाया भी। अब किसी का फोन आता है कीतो भय जागता है की बॉस उस या किसी नए कारण से डांटेगा या न जाने मेरी अच्छी प्रतिमा/छवि अवश्य ही बहुत मलिन हो गयी होगी।  और न जाने मेरी छवि कब सुधरेगी।  तो क्षांति पारमिता (अमर्याद धैर्य-चित्त की दृढ़ता) का अभ्यास विपश्यना भावना (स्मृति-संप्रज्ञान) से अनित्यबोध जगाता हो तो विकार मानस के स्टार पर आते आते निरुद्ध हो जाते है।  

आशा है क्षांति और अन्य पारमिताओं से जैसे मेरा थोड़ा सा कल्याण हो रहा है, वैसा औरों का भी हो। 

 

सबका मंगल हो !

संबोधन धम्मपथी 



सन्दर्भ :

१. त्रिपिटक में सम्यक सम्बुद्ध, भाग १ , पृष्ठ ७०  : 

२. त्रिपिटक में सम्यक सम्बुद्ध, भाग १ , पृष्ठ ७५ : सत्काय दृष्टी , विचिक्त्सा , शीलव्रत परामर्श, काम-छंद, प्रतिघ (अप्रिय के प्रति द्वेष), रुप-राग, अरुप-राग, अस्मिताभाव(अहंभाव ), औद्धत्य(बैचेनी), अविद्या  

३ . https://en.wikipedia.org/wiki/Th%C3%ADch_Qu%E1%BA%A3ng_%C4%90%E1%BB%A9c

४. जयमंगल अट्ठगाथा 

५ . आटानाटिय सुत्त , ३२ दीघ निकाय 

६. सैंतीस बोधिपक्षीय धर्म, डॉ. भदंत सावंगी मेघंकरजी

७. आळवक सुत्त, संयुक्त निकाय १.१० 

७. विशुद्धिमग्ग, भाग-१ , ४:पृथ्वी कसिण निर्देश 

९. मुनि सुत्त, सुत्त निपात - २१८  

१० . महामंगल सत्त,  संयुक्त निकाय २.४ 


Monday, 18 October 2021

धम्म चर्चा : उपासकाने भिक्षु चे पाय धुवावेत का?

प्रश्न: उपासकाने भिक्षु चे पाय धुवावेत का? ह्या फोटो प्रमाणे ?



 उत्तर:
बुद्धांनी उपासकाला भिक्षुचे पाय धुवायला सांगणे ही तर खुप दुर ची गोष्ट, बुद्धाने त्या काळातही अनावश्यक आदर/थाट, अनावश्यक खर्च व अनावश्यक सत्कार ही थांबवलेला होता. 

पहिली घटना:
तथागतांनी बोधिराजकुमाराने केलेला अनावश्यक खर्च व अनावश्यक सत्कार मौन राहुन नाकारला  

 कौशांबीचा‌ राजकुमाराने राजमहालात भगवंताला भिक्षु संघासहित बोलावले असताना, महालाच्या पायऱ्यावर भगवंतांच्या स्वागताठी पांढ-या शुभ्र पायघड्या घातल्या होत्या. अनेक वेळा महालात यायची विनंती करूनही भगवान तिथेच पायघड्याच्या बाजुला शांत उभे राहिले.  भिक्षु आनंद भगवंताचा आर्य-विनय / धर्म-विनय ओळखून होते, त्यांना याचे कारण कळाले.

तेव्हा भिक्षु आनंद म्हणाले, भावी काळातील जनतेला जमणार /पटणार नाही अशा रुढी भगवंताला ठेवायच्या नाही. ही भावी जनतेवर अनुकंपा(दया बुद्धी) आहे. तुम्ही राजकुमार आहात, जो खर्च तुम्हाला शक्य होईल ते इतर सामान्य माणसाला /गोर-गरीबाला पेलवणार नाही. त्या पायघड्या हटवल्या नंतरच तथागतांनी महालात प्रवेश केला. अशा प्रकारे भगवंताने त्या पायघड्या "अनावश्यक आदर" आहे, असे भिक्षु आनंदाद्वारे सांगुन काढायला सांगितल्या होत्या.


दुसरी घटना:
भगवतांनी परिनिर्वाणाची घोषणा केल्यावर अनेक भिक्षु भावुक होत  भगवंताची पुजा करू लागले. यावर  तथागतांनी प्रेमाने समजावले कि, फुले-हारांनी  बुद्ध पुजा ही तथागताला अभिप्रेत अशी नाही. बुद्ध म्हणाले माझी पुजा तशी होत नाही.

 ईमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया बुद्धं पुजेमि!!

भाषांतर: ३६ बोधिपक्षिय अनुधम्म/उपधम्म यांचे उत्तम शिक्षण व पालन करीत, मी तथागतांना वंदन करीत आहे.. 

असेच मार्गदर्शन त्यांनी भिक्षू तिस्स च्या आचरणाकडे सुचना देत भिक्षूंना समजावले.
"जो माणुस धम्म-अनुधम्म/उपधम्म (म्हणजे पारमिता, बोध्यंग, स्मृती, सम्यक प्रधान इत्यादी ३६ बोधिपक्षिय अनुधम्म  यांचे उत्तम शिक्षण व पालन  करतो, तो‌ माझी पुजा करतो."
 संदर्भ: धम्मपद  अट्ठकथा २.१५५ तिस्सथेरवत्थु

तिसरी घटना: 




आरद्ध वीरिये पहितत्ते, निच्च मी दळ्हपरक्कमे।
समग्गे भालके पस्स, जतन बुद्धानवन्दनं।।

फुले हारांनी बुद्ध पुजा होत नसते. या श्रावकांना पाहा, जे समग्रपणे पराक्रम करीत (निरंतर विपश्यना ध्यान ) मनविशुद्ध करीत आहेत. तीच खरी वंदना.

 संदर्भ: थेरी अपदान २.२.१७१

चौथी घटना:



राजा प्रसेनजितला भगवंतांनी "धम्म काये"ला वंदन करण्यास सांगितले, "रूपकाये"ला नाही!!

वयाच्या ८०व्या वर्षी कोशलराजा भगवंतांना वंदन करताना त्यांच्या पायांचे चुंबन घेतले होते. त्यावर भगवतांनी त्यांना विचारले, "काय झाले महाराज? या शरीराविषयी एवढा आदर व असा विचित्र सन्मान का व्यक्त करीत आहात?" यावरून हे दिसते कि, भगवंताला असा आदर विचित्र व अनावश्यक वाटतो. महामानवाच्या गुणांना समजुन ते धारण करणे, हाच खरा आदर व सत्कार आहे; धर्म पालन करण्याबाबत बुद्धांची हि तीच अपेक्षा आहे. बाकीचे अवडंबर/कर्म-कांड  करण्यात काही लाभ नाही, उलट हानीच आहे.

धारण करें तो धरम हैं, वरना कोरी बात ।
सुरज उगे प्रभात है,  वरना काली रात ।।

(विपश्यना आचार्य गोयंकाजी ) 


बुद्धांनी अहंकार कमी करण्यासाठी अनेक नियम भिक्षु संघाला बुद्धाने आहेत. मागील लेखात धुतांगधारी महाकाश्यपपांबद्दल मी संगितलेलं आहे. 

उपासकांना पाय धुवायला सांगितल्याने भिक्षुंचा अहंकार वाढुन भिक्षुंची हानीच होईल. पाय धूवायला सांगणे हा तर भगवंताला अभिप्रेत असलेला बंधुभाव‌ही नाही आणि समाजसेवेची/कर्तव्याची भावना (........ बहुजन हिताय बहुजन सुखाय , लोकानुकंपाय) तर नाहीच नाही. खुपचं अशोभनीय व‌ दुर्दैवी आहे असे वर दिलेल्या ऐतेहासिक प्रसंगावरून स्पष्ट होते.

आजकाल आपल्याला त्रिपिटक आचार्य डॉ . धर्मरक्षित, महापंडित राहुल सांकृत्यायन, डॉ . जगदीश महाथेरो, महाथेरो आनंद कोशल्यायन अशा अभ्यासु, महापंडित व सेवाभावी भंतेची गरज असताना, असे पाय धुण्याची अपमानजनक किंवा अंधश्रद्धा वाढवणारी वागणुक देणारे भंतेजी दिसतात हे क्लेशदायक आहे. यावरून हे ही दिसते कि बुद्धवाणीचा पुरेसा अभ्यास नाही. मनोरंजनाचे साधने जरा कमी करत, समाजानेही बुद्ध वाणीचे वाचन केल्यास खूप फायदा होईल.

जो भिक्षू (सध्दर्मात) स्वतःला प्रेरित  करतो, आत्मपरीक्षण करतो, 
तो स्वतःची रक्षा स्वतःच करीत, स्मृतिमान भिक्षू (साधक) सुखपूर्वक विहार करील !!
संदर्भ : धम्मपद ३७९

भगवान बुद्ध आणि त्यांचा ऐतिहासिक संघ (भिक्षु-भिक्षुणी, उपासक-उपासिका) यांचे गुण आणि सामाजिक कर्तव्याचे भान  हे खुप प्रेरित करणारे व जीवनाला उभारी देणारे आहे. त्रिपिटकातील ऐतिहासिक सत्यकथांचा अभ्यास केला तर ते स्पष्ट होते. अशा कथा/गाथा हिंदीतही उपलब्ध आहेत. इथे क्लिक करा मज्झिम  निकाय   धम्मपद 

अभ्यासु व‌ समाजसेवी बुद्धांच्या संघाला वंदन करतो व अशी अशोभनीय वागणुक दिसणार नाही याची आशा करतो. 

संबोधन धम्मपथी
९७७३१००८८७

Wednesday, 30 June 2021

धम्मचर्चा : स्मृती-अनुस्मृती आणि धम्म-अनुधम्म यात काही फरक आहे की एकच आहेत

  उत्तर: 

अनु म्हणजे मुख्य विषयाचे उप-विषय, उपविभाग किंवा कप्पे  !!  




 उदाहरण : ईमाय धम्मा-नुधम्म(धम्म-अनुधम्म) पटिपत्तिया बुद्धं पुजेमि!!

 धम्म‌ आणि अनुधम्म:
 धम्म‌: शील, समाधि, प्रज्ञा
 अनुधम्म : ३६ बोधिपक्षिय उप-धम्म


 स्मृतीचे दोन अर्थ आहेत.
१. उजळणी/आठवण/memory
२. जागरुकता... awareness/mindfullness  

स्मृती म्हणजे एखाद्या विषयाची उजळणी/आठवण किंवा जागरुकता... awareness !

अनुस्मृती म्हणजे एखाद्या 
(विषयाच्या) स्मृतीच्या(इथे सजगता- सर्व उप-विषयांची विषयाची उजळणी/आठवण किंवा त्या उप-विषयांची जागरुकता... awareness!!!


धम्म अनुस्मृती म्हणजे, धम्माच्या sub-topic ची उजळणी!(अर्थ पहिला)

बुद्धानुस्मृती म्हणजे, बुद्धाच्या sub-topic ची उजळणी!(अर्थ पहिला)

नुसती "अनुस्मृती" (अर्थ दुसरा) म्हणजे स्मृती(विपश्यनेसाठी लागणारी स्मृती व संप्रज्ञान मधील *स्मृती* ) ‌च्या sub-topic (कायानुस्मृती, धम्मानुस्मृती, चित्तानुस्मृती, वेदनानुस्मृती) ची उजळणी!(अर्थ दुसरा)

भले होवो.
संबोधन धम्मपथी
9773100886
👍🙏

Saturday, 19 June 2021

दान करताना समज व गैरसमज

 प्रश्न १: साधारणतः मनुष्य दान का करतो ?


उत्तर : जेव्हा माणुस दान देतो, तेव्हा वरवर पाहताना असे दिसते पाहा किती परोपकारी व माणुसकीची जाण ठेवणारा माणुस आहे. पण अंतर्मनात स्वतःने पहिले तर कितीतरी वेळा माणसाचा स्वार्थ व भीती असल्याने मनुष्य दाणे देत असतो. आसपासच्या अनपेक्षित व नको असलेल्या खूप दुर्दैवी घटना नकळत घटत असतात. वाईट वाटते, भीती वाटते पण कारण कळत नाही. त्यामुळे मी बैचेन होतो. मी व माझे (आरोग्य, पैसे, ऐश्वर्य, बायको -मुले, परिवार व समाज) ठीक/सलामत  राहावा यासाठी माझ्या संप्रदायातील पूजापाठ करणारे व वाईट काम न करणारे माणसे असतात. 


त्यांना दान दिले तर माझी पापे कदाचित धुतली जातील व माझे (आरोग्य, पैसे, ऐश्वर्य, बायको -मुले, परिवार व समाज) सलामत राहतील अशी कल्पना व आशा करतो. एकूणच फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी दान केल्याने ते दान परोपकारी ठरत नाही त्यामुळे त्याचे ते पुण्य मिळत नाही जे परहितबुद्धीने किंवा कल्याणकारी भावनेने मिळते. कारण दान देताना मनात बैचेनी आणि  स्वतःचा व स्वतःच्या संप्रदायाचा (हिंदु, मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रीश्चन) स्वार्थाची भावना प्रबळ होती. 

प्रश्न २: म्हणजे मनुष्य दान देताना निस्वार्थ भावना असली कि पुण्य मिळते. बरोबर ना?

उत्तर :जरुरी नाही. जसे एका शेतकऱ्याने नापीक जमिनीत खूप मेहनत-मशागत करत बीज पेरली तर त्याला अपेक्षित यश येणार नाही. कारण त्याने जमिनीच्या दर्जावरती अजिबात लक्ष दिलेले नाही किंवा त्याची त्याला पुरेशी माहिती नाही. 


तसेच जर दान स्वीकारणारा (हिंदु, मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रीश्चन इतर कोणीही असेना) जर शील पाळणारा सदाचारी नसेन, संयमी, मन विशुद्ध करणारा व लोकांना (हिंदु, मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रीश्चन इतर कोणीही असेना) मदत करणारा नसेल तर अशा अनाडी, आळशी किंवा ढोंगी माणसाला दिलेले दान जरी निस्वार्थ भावनेतुन असले तरी त्याच्या अपेक्षित तेवढा लाभ होत नाही. कारण दान स्वीकारणाऱ्याच्या नैतिक दर्जाबाबत (स्वशुद्धी व सामाजिक जबाबदारीबद्दल) दान देणारा सजग नसतो

प्रश्न ३: मग  बुद्धाने 'सब्ब दानं धम्मदानं जिनाती' असे स्वतःच्या संप्रदायालाच दान करायला का बरे सांगितले असावे?

उत्तर : बुद्धाने 'सब्ब दानं धम्मदानं जिनाती' (धम्मपद २४, ३५४) सांगितले जरूर आहे पण त्या अर्थाचा सध्या अर्थच बदलला आहे. 

पहिली महत्वाची गोष्ट अशी कि बुद्धाने  "तुम्ही एखाद्या शीलवान, कर्तव्यबुद्धी असलेला व इतरांना निस्वार्थपणे मदत करणाऱ्याचा संपूर्ण खात्री  केल्यावर आदर करावा भले तो कुठल्याही जात-संप्रदायाचा असो!" असे सांगितले आहे हे कायम लक्षात ठेवावे कारण बुद्ध वाणी हि सार्वजनिन आहे. सर्वाना लागू पडते व सर्वासाठी मंगलमय आहे. 

☸️ सध्याचा 'सब्ब दानं धम्मदानं जिनाती' प्रचलित चुकीचा अर्थ:

फक्त एका बौद्ध संप्रदायाचा प्रचार-प्रसारासाठी बौद्ध माणसांनाच(भिक्षु -भिक्षुणी, उपासक-उपासिका) दान‌ करत जा. त्यासाठी केलेली इतर वस्तुंचे दान‌( मुर्ती/पैसा/चीवर/भोजन/औषधे), अशा भौतिक वस्तुंचे दान बौद्ध संप्रदायातील लोंकासाठीच केलेले असते,ते जगातील इतर सर्व दाना‌पेक्षा‌ श्रेष्ठ आहे. ह्या दानाचा बुद्ध वाणी लोकांना सांगण्याशी स्पष्ट संबंध कोणाला ठेवण्याची गरजच‌ वाटत नाही.

हा समज व धोरण चुकीचे व सर्वस्वी अयोग्य आहे!! कारण दान करणारा हा दान स्वीकारणाऱ्या(भिक्षु-भिक्षुणीं-तज्ञ उपासक व तज्ञ उपसिकांकडुन) कडुन माझ्या, माझ्या परिवाराच्या किंवा सर्व  समाजाच्या मन विशुद्धीला आवश्यक असणाऱ्या बुद्धवाणीसाठी कुठल्याच प्रकारची योजना, परोपकाराची अपेक्षा ठेवताना दिसत नाही. 

तशी स्पष्ट अपेक्षा कोणाला ठेवण्याची गरजच‌ बरे वाटत नाही यांचे उत्तर वर प्रश्न #१ मध्ये दिलेलं आहे.

असे दान अंधश्रद्धा बनते कारण त्याने कोणाचे‌ व कुठल्या समाजाचे भले असे होईल असे दानकर्त्याला व दान स्वीकारणाराला सांगता यत नाही. 


तसेच दान स्वीकारणाराची पात्रता एवढीच कि तो बौद्ध संप्रदायाचा आहे!!! हि बुद्धाला अपेक्षित सार्वजनिनता व महाकारुणिकता दिसतच नाही.   


तो किती‌ शीलवान, विशुद्ध मनाचा, परहितबुद्धि जपणारा(धुतांगधारी)  व‌ अधिकृत बुद्धवाणी वाचुन ती सुयोग्य पद्धतीने मानव जातीला  (हिंदु, मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रीश्चन) देण्याचं कर्तव्ये करणारा असावा‌ अशी‌ कुठलीच अपेक्षा नसते. त्यामुळे बुद्धाच्या शिकवणुकीबाबत इथे गैरसमज झाल्याने सार्वजनिक बुद्धवाणीला इथे एका बौद्ध समाजापुरते ठेवण्याची मोठी चूक झाली आहे.  

☸️ प्रचलितचुकीच्या अर्थामुळे उद्भवलेली मोठी समस्या :

तुम्ही दान स्विकारुन खालील गोष्टी प्रामुख्याने कराव्यात असे दान देणारा सांगताना दिसत नाही :

१. त्रिपिटकात बुद्धाने केलेले मार्गदर्शन (कुटुंबाला, नेत्याला, कामगारांना, मालकाला, नोकरांना, पती -पत्नींना, मुलांना) वाचुन आम्हास शिकवावे. (म्हणजे परियत्ती)

२.  विपश्यना: ध्यान साधना विधी  समाजाला शिकवण्यासाठी स्वतः विपश्यना साधनेत प्रवीण/एक्सपर्ट होऊन. सद्गुण जीवनात आणण्यासाठी समाजाला जागे करावे. (म्हणजे पटीपत्ती )

जर दान कर्त्याने अशी अपेक्षाच नाहो ठेवली तर दान स्वीकारणारा सुस्तावतो, आळसावतो व जीवनाला बुद्धाने सांगितलेला उद्देश्य नसल्याने (अधिकाधीक लोंकाच्या हित व सुखासाठी दिवस रात्र मेहनत करा - बहुजन हिताय बहुजन सुखाय ) खालील गोष्टी वाया घालवतो :

१. दान देणाऱ्याचा पैसे वाया जातात (कारण पैसे घेऊन कल्याणकारी काम करत  नाही) आणि त्यामुळे त्याला पुण्यही मिळत नाही.  

२. स्वतःचे जीवन निरर्थक किंवा थोतांड बनते

३. बुद्धाच्या महान धम्माची व संघाची अवनती (वाट लावतो)

☸️ 'सब्ब दानं धम्मदानं जिनाती' चा खरा अर्थ:

धम्म (बुद्धवाणी-म्हणजे शील समाधि प्रज्ञेला अनुसरुन असलेले ३७ बोधिपक्षिय धर्माविषयी निस्वार्थ व परहितबुद्धीने  बुद्धी ने केलेले लेखन/मार्गदर्शन/सेवा/शंकेचे निरसन/ध्यान शिबीराचे आयोजन) दान (मग ते कोणत्याही जाती-संप्रदाय-देशाच्या माणसाच्या विशुद्धीसाठी (मनाला निर्मळ बनवण्यासाठी) असो. हे‌ कुठल्याही प्रकारच्या दानात सर्व‌श्रेष्ठ दान‌ असते.


रण सहस्त्र योद्धा लडे, जीते युद्ध हजार ।

पर जो जीते स्वयं को, वही शुर सरदार ।।


क्षण-क्षण क्षण-क्षण बी ता, जीवन बीता जाय ।

इस क्षण का उपयोग करे बीता क्षण नहीं आय।।  


अशा प्रकारे स्वतःच्या जीवनाचा व इतरांनी दिलेल्या दानाचा सर्व समाजाच्या हितासाठी अहोरात्र मेहनत करीत असतो. 

भले‌ होवो!!

- संबोधन धम्मपथी.

९७७३१००८८६

Sunday, 25 April 2021

सब्ब दानं धम्मदानं जिनाती

दानाबद्दलचे काही  गैरसमज दूर झाले कि खूप  फायदा होतो. 

☸️ धम्मदानच‌ सर्व‌श्रेष्ठ दान‌ का असते? :

एखाद्या ला पैसा द्या,‌पण मग काही दिवसांनी परत गरज लागेल. पैसा कायम कुठे टिकतो? एखाद्या ला जेवण द्या, काही तासांनी परत भुक लागेल. भुक कायम कुठे मिटते?एखाद्या ला रक्त/अवयव दान द्या, काही दिवसांनी परत आजारी पडेल. आजार कायम कुठे मिटतो? तसेच एखाद्या ला औषध द्या, काही दिवसांनी परत आजारी पडेल. आजार कायम कुठे मिटतो? ह्या दानाचा परिणाम कायम नसतो. 



☸️ गरज पुन्हा लागतेच!! म्हणुन ही सर्व प्रकारचे दान साधारण दान झालीत. त्यांना‌ कोणालाच‌ हलके/कमी लेखत‌ नाही, तुम्हीही लेखु नका. पण त्यांची मर्यादाही ओळखा!!


पण प्रकृती/निसर्ग नियम दान लक्षात ठेवते.‌जे‌ पेराल ते कालांतराने उगवते. भरभरून निसर्गाचा प्रतिसाद मिळतो.


☸️ जसे एक आंब्याची कोण लावली‌तर हा निसर्ग/प्रकृती/कुदरत का कानुन त्या कर्माचं व त्यासारखेच मोठं मोठं फळ देतो. अनेक फळ व फळातुन पुन्हा मोठी झाडं येतात. 


☸️ तसेच एखाद्याने अन्नदान दिले, तर‌ निसर्ग त्यांच्या कर्माची फळं देतो...ह्या जन्मात किंवा पुढील जन्मात एकुण (ह्या जन्माचे व मागील जन्मी च्या कर्मफळानुसार) तसेच काळानुरुप व दर्जानुरूप   (जसे केळ्याचे फळ दर महिन्याला येते, पण आंब्याचे फळ उन्हाळ्यातच येते) तसे फळ मिळते.


 तो उपाशी पोटी झोपत नाही, खुप संपन्नता लाभते. तसेच औषधाचे , कपड्याचे, पैशाचे व इतर मदतीचे दान निसर्ग/धम्म अनेक पटीने देतो.


☸️ पण ह्या कुठल्याच दानाने जो‌ लाभार्थी असतो त्याच्या मनाची विशुद्धी व निर्मळता साध्य होत‌ नाही. दुर्गुण दुर होऊन मंगल शांती मिळत नाही. जसे आपल्याला दिसते कि अनेक पैसेवाले माणसे बैचेन व अशांत असतात. पैशाचा  होत नाही , कारण लोभ कमी होण्यासाठी, धर्म (धम्म : निसर्गाचे नियम ) व धर्मवान (सद्गुणी -सदाचारी-शुद्ध -संत) लोंकाची संगत व मार्गदर्शनही नाही. तु(मचे कर्म पैशाचे दान देण्याचे होते, तर पैसे मिळाला. धर्म(सुख-शांती) मिळवुन जर ती दान केली असती तर सुख-शांती मिळाली असती. 

धरम ना हिंदु बौद्ध है, सिख ना मुस्लिम जैन ।

धरम चित्त की  शुद्धता, धरम शांती सुख चैन ।।


☸️ पण जर जो कोणी करुण चित्ताने व निस्वार्थ भावनेने धम्माचे ( बुद्धवाणी: जी विशुद्ध मन व  कर्म निर्दोष बनवुन एकुणच  जीवन निर्दोष बनवते ) दान देतो किंवा धम्माचे दान मिळेल यासाठी मदत करतो, त्याला ह्या व पुढील अनेक जन्मातही निसर्ग/प्रकृती अनेक पटीने जास्त धम्मदान (बुद्ध वाणी जी सद्गुण व सुखशांती वाढवते) मिळवुन देते. अनेक धम्मविहारी व धम्मप्रवीण कल्याणमित्र मार्गदर्शक व मित्र भेटतात. ज्यामुळे निर्वाण/मोक्ष मिळुन लाखो-करोडो वेळा पुन्हा पुन्हा जन्म-मृत्युच्या फेर्यातुन मुक्त (भवमुक्त) होतो. 


☸️ पुन्हा जर जन्मच नाही तर भुख, आजार, दुःख, प्रिय व्यक्तीचा वियोग किंवा अप्रि व्यक्तीचा संयोग, दारिद्रय, दुर्भावना व मृत्यु पासुन कायमची सुटका होते. मग ज्यामुळे सर्व प्रकारच्या दु:खातुन कायमची सुटका होते, ते दान अर्थातच महान व सर्वोत्तम आहे ना?


☸️ संधी नुसार (कालिक) दान व संधी नसताना (अकालिक‌) दान: विवेकशील व्यक्ती हे चांगलं जाणते कि संधी असल्यावर (कालिक) दिलेले‌ दान खुप कल्याणकारी असते. जसे महापुर, महारोग, अग्निकांड, जागतिक साथ, बेरोजगारी, निवारा अशी संकटकालीन संधी मिळाल्यास केलेले संधीयुक्त /कालिक दान(जेवण, औषधं, पैसा, कपडे, सुव्यवस्थेची‌ तजवीज) हे संधी नुसार(कालिक) दान फलदायी असते.


☸️पण त्याहीपेक्षा श्रेष्ठ असते संधी नसताना ही केलेलं असं सार्वकालिक दान!! जे करताना मनुष्य वाईट वेळ जरी नसली तरीही स्वताची‌ सामाजिक जबाबदारी समजुन क्षमतेनुसार दान करीत जातो. आणि तेही धम्मदान (कर्म व जीवन निर्दोष बनवणारी बुद्ध वाणी चे दान)  ज्याने इतरांचे दुःख दुर होऊन, सुखशांती व सद्गुण वाढतील.


☸️असे जात-संप्रदाय न पाहता केलेलं धम्मदान  हे सदा-सर्वदा सर्वहितकारी दान असतं. कारण एकदा का मनुष्याचे मन निर्मळ, शोकविरहित व खंबीर झाले कि तो स्वताची रक्षा स्व:ताच करू शकतो. स्वतः सुखी राहतो व स्वतःची जबाबदारी ओळखुन वेळेनुसार समाजकार्यही करतो. 


म्हणुन भगवान बुद्ध म्हणतात कि, सब्ब दानं धम्मदानं जिनाती !!

भले‌ होवो!!

- संबोधन धम्मपथी.

९७७३१००८८६

 *साभार* : विपश्यना विशोधन विन्यास वरील आचार्य गोयंकाजींचे‌ हिंदी लेख.

 *नोंद:* जर लेखात काही चुक आढळल्यास भाषांतर मी केल्याने चुकीची जबाबदारी माझी आहे, आचार्यांची नाही.

Saturday, 16 January 2021

भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक वीरांचे मनोगत व प्रश्न

 माझ्या वारसांनो तुम्हाला काही सांगायचे आहे, काही विचारायचे आहे. शंभराहून अधिकवर्षे गेली बघा बघता बघता. कोरोना काळ चालू आहे आशा आहे की तुम्ही सुरक्षित असाल.

 जास्त वेळ नाही घेत तुमचा नाही, काही सांगायचं होते म्हणून आलोय तुमच्या स्वप्नात. आमच्या नंतर एक महान, कर्तबगार व थोर शुरवीर होऊन गेला आणि तुम्हाला बरेच सांगुनही गेला, बाबासाहेब नावाचा!! तरीही काहीतरी चुकतंय म्हणून आलो मन‌ मोकळ करायला. 

आमच्याकडे त्यावेळी जे होते त्याने, जसे होतो तसे आणि मानवी जीवनाचे हक्क मिळवण्यासाठी आम्ही जीव झोकून लढलो. त्याला विजयस्तंभाला तुम्ही आजही वंदन करत असता. चांगले आहे, पण हे अजिबात पुरेसे नाही. नक्कीच‌ नाही.

जरी आम्ही लढलो तरी युद्ध पुकारण्यापूर्वी पहिली सामाजिक परिस्थिती अनेक वर्षे अनुभवली होती. ती सामुदायिक रित्या समजुन योजना आखली होती. हे पहा जर आम्ही आमच्या पूर्वजांचाच इतिहासाच्या घटनांचा आणि जागेचा उत्सव साजरा करीत असतो नुसतीच मानवंदना देत राहिलो असतो; तर ना आम्हाला मानवी हक्क मिळाले असते ना ही आमची पुढची पिढी जगली असती.




 _त्यामुळे तुमची हि एक तारखेची वंदना आम्हाला पुरेशी नाही. आमची इच्छा आहे तुम्ही काही तरी आम्हाला साजेसे बौद्धिक व धोरणी पराक्रम करावेत. आम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरे देऊन तुमचाही पराक्रम सिद्ध करु शकता का?:_ 

⚡बाबासाहेब फक्त एकदाच का गेले भीमा कोरेगाव ला १९२७ साली, ते ही बौद्ध होण्याच्या २९ वर्षांपुर्वी?

⚡प्रगतिशील व दक्ष बौद्ध समाज म्हणुन तुम्ही आता कुठे व‌ कसे पडत आहात हे तुम्ही कसे, कधी व कुणाकडुन‌ शोधता ?

⚡तुम्ही बौद्ध व अस्पृष्य हा फरक कसा करता ? कि १९५६ सालाची धर्मांतर तुम्हाला कबूलच नाही ?


⚡बहुतेक शिकलेली व पैसेवाले बौद्ध आणि अस्पृश्य (जी समाजाची नवी शक्ती स्थाने आहेत) ते समाजापासून दूर का राहतात ? 

⚡तुम्ही विजयदिन साजरा करताना, एक समाज म्हणुन आपल्या समस्या कोणत्या व त्या कशामुळे निर्माण झाल्या याकडे कधी लक्ष देता का ?

⚡आमची लढाई एका विशेष जातीविरुद्ध/संप्रदायाविरुद्ध नसुन जातिव्यवस्थेच्या विरुद्ध आहे हे तुम्ही कसे विसरलात ?

⚡तुम्हाला विजयदिनी आत्मविश्वास व एकता वाढवायची असतो, कि ज्यांना आम्ही हरविले त्यांच्यावर हसायचे असते? अशाने दुश्मन तयार होतील कि दोस्त?

⚡१९५६ नंतर तुम्ही नक्की बौद्ध झालात कि एका संप्रदायाचे सात जन्माचे विरोधक झालात ?

⚡सध्याच्या घडीला समाजाकडे चांगला वैचारिक, सुज्ञ, धोरणी व विविध समाजमान्य नेता नाही(राज्यस्तरावरही नाही व राष्ट्रीय स्तरावरही नाही) याचे कारण काय हे तुम्हाला समजले का ?

⚡समाज म्हणून आपल्याला एक‌ प्रगल्भ नेता हवा आहे कि एक विदुषक ? तुमचे शेजारी व मित्र अशा नेत्यावर व समाजावर कितीही हसले तरी‌ नवीन प्रगल्भ नेत्याची गरजच वाटत नाही का तुम्हाला?




⚡बाबासाहेबांचे विचारांची पायमल्ली करीत विरोधी विचारधारा असणाऱ्या राजकीय पक्षाशी जवळीक करणार्या नेत्याला तुम्ही नेते पदावरून खाली का उतरविले नाही ? कसे उतरायचं हे तरी माहिती आहे का?




⚡एखाद्या नेत्याच्या फक्त २५ वर्षांपूर्वीच्या चांगल्या कामावर त्याला/तिला आज सन्मान का देता? त्यांचे/तिचे सध्याचे निकृष्ट काम, कामचलाऊ धोरण, फसवी/ स्वार्थी वृत्ती का लक्षात घेत नाही? नवा नेता कसा शोधावा हे तरी कळते का?

⚡प्रत्येक नवमुस्लिम/नवख्रिश्चन अस्पृश्याने ती अस्पृश्य आडनावे बदलुन परिपूर्ण धर्मांतर केले हे तुम्हाला का नाही समजले ? नामांतराविषयी तर बाबासाहेबांनी १९३७ साली "मुक्ती कोण पथे" पुस्तिकेतही सांगितलेले होते. 

⚡प्रत्येक नवमुस्लिम/नवख्रिश्चन अस्पृश्याने ती अस्पृश्य आडनावे बदलुन त्यांच्या समाजाची एकता वाढवली हे तुम्हाला का नाही दिसले ? जर आडनावावरुन जात कळते आणि बौद्ध होऊनही भेदाभेद होते (संधींपासुन डावललं जाते) तर तुम्ही तुम्हाला मिळालेली अस्पृष्यता दर्शविणारी नावे धर्मांतरानंतर तुम्ही का बदललेली नाहीत ?

⚡तुमच्या पुढच्या पिढीला तर सोडा आसपासच्या लोकांना बाबासाहेबांचं कर्तृत्व कळेल किंवा बाबासाहेबांचे सर्वांगीण विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होईल असे कुठले काम तुम्ही करता ? 

⚡वेगवेगळ्या सोसायटीत गेलेल्या बौद्ध माणसाला तुम्ही कुठे व कसे ओळखणार ? बौद्धांची व अस्पृश्यांची आडनावे सारखीच आहेत.अस्पृश्य आडनावे न बदलेल्याने पुढची पिढी बौद्धसंस्कृती टिकवणार नाही याची कल्पना तुम्हाला का नाही आली ?

⚡बौद्ध भिक्षुं ची काळजी‌(जेवण, औषधे व‌ धम्म चर्चा) कोण‌, कधी, कशी व किती‌ घेता? का त्यांना कोणी नेहमी लक्ष व स्नेह देतात का?

⚡गोरगरीब जनतेचा विकास कुठल्या धोरणांमुळे होतो व ती धोरणे कशी टिकवावीत व सुधारावीत हे तुम्हाला माहिती आहे का ?



⚡बाबासाहेबांनंतर तुम्ही एक समाज म्हणून किती शाळा-कॉलेज बांधली आहेत ?

⚡ज्या (समाजाच्या) विकास रोपट्याला रोज पाणी व खत लागते, त्या रोपट्याला फक्त भीम/बुद्ध जयंती उत्सवात सगळा पैसा खर्च करून विकास रोपटे मरून जाते, हे तुम्हाला कधी कळणार ?




⚡तुमच्याकडे शिक्षण असताना आणि पसे देऊन कुठलीही विद्या मिळत असताना तुम्ही अजून ८४,००० बुद्ध उपदेशांपैकी किती उपदेश शिकलात ?

⚡आज अनेक राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक गट आहेत पण ते एकमेकांचेच विरोधक आहेत, याचे कारण कोण शोधणार?

⚡अनेक गटांचे कारण नक्की समाजाच्या अहंकारात आहे कि दुश्मनांची विषारी चाल आहे, एवढे तरी तुम्हाला ठाऊक आहे का ?

⚡बाबासाहेबांच्या संविधानात आतापर्यंत साधारणतः १२० च्या हुन अधिक बदल झाले आहेत. ते का व कोणते हे तुमच्या सध्याच्या कुठल्या नेत्याने तुम्हाला सांगितले आहे? सुशिक्षित असून तुम्हाला ते का माहिती नाही ?  विघातक बदल थांबवायचे कसे माहिती आहे का?

⚡ बाबासाहेबांचे विचार तुमच्या पर्यंत पोहोचवणाऱ्या विचारवंतांना तुम्ही नियमित मानधन देता कि, टीव्ही च्या केबलवाल्याला ? तुमच्या पिढीला कोण वाचवणार हे तुम्हाला का समजत नाही ?


⚡मानवी हक्कांसाठी बाबासाहेबांनी वेळेनुसार नवनवीन लढाई लढत राहिले कि बुध्द -फुले-कबीरांच्या उत्सवात व वर्गणीत गाफील राहिले?

⚡बाबासाहेबांनी भिमाकोरेगाव चे महत्व बौद्ध झाल्यावर कधी व कुठे सांगितले हे सांगू शकाल का ?


⚡विपश्यनेला विरोध करणाऱ्यांना समाजाची कीड (दारू) , धुंदी व व्यक्तिमत्वाची अनेक व्यसने दूर करुन सुसंस्कारी समाजाचे निर्माण कसे करावे असा प्रश्न विचारला का ?

⚡तुम्हाला आणि तुमच्या पुढची पिढीला बौद्ध म्हणून ओळख/लौकिक आवडेल कि अस्पृश्य म्हणून ?

⚡तेव्हाची लढाई मैदानात व्हायची आताच्या ऑनलाईन युगात लढाई कुठे व कशी होते हे तुम्हाला माहिती आहे का ?

हे तीस प्रश्न दर महिन्याच्या तीसही दिवस तुमच्या मनात ठेऊन उत्तर शोधल्याशिवाय उसंत घेऊ नका.

🔊लक्षात घ्या " *इमाय धम्मानु-धम्म पटीपत्तिया बुद्धं पुजेमी"* म्हणजे बुद्ध पुजा/वंदना मी त्यांच्या धम्मानुसार वागुन (आचरणात आणुन) पूर्ण करीत आहे, नुसत्या फुले-अगरबत्त्यांने नाही. 

त्याचप्रमाणे दरवर्षी आम्हाला औपचारिक वंदन करण्यापेक्षा, ह्या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधणे व त्या नुसार योजना आखून प्रगती करणे (आचरणात आणुन)हि तुमची खरी विजयस्तंभाला मानवंदना(खरा पराक्रम) ठरेल. ते तसे सोपे नाही, "बौद्धिक" पराक्रम सोपा नाही. नेहमी दक्षता व समजुतदारपणा दाखवावा लागतो.


तोच खरा पराक्रम ठरेल आणि तीच खरी वंदना‌ ठरेल. तेव्हाच तुमची पुढची पिढी तुम्हाला या "बौद्धिक" पराक्रमाबद्दल धन्यवाद/वंदन/अभिनंदन करीन .

 नाहीतर काही वर्षांनी समाज म्हणून आपण नक्की कोण हे विचारावे लागेल ?


आजच्या युगाला साजेसा असा पराक्रम करणार्यांना वारसांना भेटायला कोणाला आवडणार नाही . 
तुम्हाला जर एखादे महान काम जमत नसेल तर, नेहमीची छोटीशी कौटुंबिक व सामाजिक कामे महानतेने (कौशल्य, दक्षता,विनम्रता व सद्भावना  ...... म्हणजे एकुणच निर्मळ मनाने) करा. तुम्हाला देशाची व मानवतेची सेवा करण्यास यश लाभो हि सदिच्छा.