Friday, 19 June 2015

भले न मन मैला करे, तन के सारे रोग। 
पर तन रोगी हो उठे, जब मन जागे रोग॥

- आचार्य सत्य नारायण गोयंका 


स्पष्टीकरण:

व्यक्ती कितीही निरोगी असली किंवा वाटली तरी शारीरिक रोगांचा सामना करावा लागतो. नेहमीच निरोगी व मजबूत वाटणारे शरीर कमकुवत व रोगी होऊन बसते. अपेक्षित हालचाली व कामे करता येत नाहीत मग वाईट वाटुन चीडचीड ( मनाची व्याकुळता) जाणवते. पण मनुष्य लवकर हार मानीत नसतो; अमुक खाल्या-पिल्याने मला आजार झाला आहे असा शोध चालु होऊन डाक्टरांच्या सल्याने उपचार सुरु चालु होतात. आज ना उद्या मी बरा होणारसा विश्वास व आशा  वाटू लागते. कारण मन सांगत असते, कि अजून मला खुप जग बघायचे आहे व खुप काही करून दाखवायचे आहे. अशा अपेक्षा शरीरातल्या रोगाला शरीरातून जाण्यासाठी धक्के मारीत असतात. शारीरिक रोगाला दूर करण्यासाठी सकारात्मक, उत्साहवर्धक व महत्वाकांक्षी विचार सैनिकासारखे लढू लागतात.इथे मन प्रगत जरी नसले तरी लोभी मात्र असते.  अशा प्रकारे "शारिरीक" रोगावर मात करण्यासाठी "मन" (…क़ारण मनातुनच वाईट तसेच सकारात्मक, प्रेरणादायी, उत्साहवर्धक व महत्वाकांक्षी  विचार जन्म घेतात.) मदत करते. आणि शारिरीक रोगांमुळे होणारी चीडचीड ही मनावर तितकासा भयानक परिणाम करीत नाही. म्हणजे एकुणच शरीराकडून येणारे रोग/विकार मनावर हे कमी हानिकारक असतात. 

एक उदाहरण घेवू: एखादी व्यक्ती नजरचुकी मुळे पडते तेव्हा जर न ओशाळता/वैतागता शांत मनाने पाहिले तर असे दिसते कि: आपण पडलो आहोत पाचव्या पायरीवर पण घसरण्याचे किंवा पडण्याचे कारण तर पहिल्याच पायरीवर होते. पाचव्या पायरीवर तर फ्क्त सध्याची पडण्याची प्रक्रिया पुर्ण झाली; वास्तवात पडायची सुरुवात तर पहिल्या पायरीवरच असताना घसरल्यामुळेच झाली होती. अशा प्रकारचे नियमीत आत्मपरीक्षण आपल्याला सांत्वन व पुन्हा न पडण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. 

आता आपण पाहिले कि शरीर रोगी असताना मनामध्ये असलेल्या सकारात्मक उर्जेमुळे, मनावर नकारात्मक परिणाम होत नाही. पण जेव्हा मन रोगी होते तेव्हा शरीरावर नकारात्मक परिणाम व्हायला सुरुवात होते. सभोवतालच्या जगाचे वागणे-बोलणे (आठ लोकधर्म: सुख-दुख, मान-अपमान, यश-अपयश, निंदा-स्तुती/कौतुक ) आपण नेहमीच अनुभवीत असतो. त्यात आणखिन भर म्हणजे आपल्या मनातूनही आपण आपलया मनातील काल्पनिक जगातील वागणे-बोलणे आठ लोकधर्मे ("त्याने असे केले किंवा नाही केले तर? माझा अपमान केला आहे." असे वाटणे ) अशा प्रकारे आपल्या मनातील घटना व बाह्य जगातील घटना आपल्या मनाला नाराज (अपेक्षाभंग झाल्यावर) न प्रसन्न (अपेक्षापुर्ती झाल्यावर) करीत असतात. पण मनोजगात  नाराज घटनांची रेख ही प्रसन्न घटनांच्या रेखेपेक्षा खुप गहरी व क्लेषकारक असते. आणि त्यात नाराजीच्या घटना प्रसन्नतेच्या घटनांपेक्षा वारंवार घटत असतात. 

पण मनाला जेव्हा वारंवार नाराजी/अपेक्षाभंगांना सामोरे जावे लागते, तेव्हा श्वास फुलणे, हृदयाची स्पंदने वाढणे, बद्धकोश्ठता, विनाकारण थकवा, पाचन ठीक न होणे, तसेच बैचेनी मुळे झोप न येणे असे अनेको रोग वाढत जातात. हे रोग जास्त काळ राहिले कि, शरीराला इतर भयानक रोगही जडतात, हे विपश्यना ध्यानात पारंगत असणारर्या लाखो साधकांच्या स्वानुभावातुन तसेच सध्याचा मेडिकल संशोधनातूनही अनेकोवेळा सिद्ध झाले आहे. शरीरावर होणारा हा परिणाम हा खुप घटक व बहुधा कायम स्वरुपी असतो. अशा नाराज मनामुळे जीवनाच्या प्रवासात आपण पाचव्या पायरीवर पडतो (पहिले आर्य सत्य: जगात दुःख आहे) पण ध्यान करून पाहिले असता असे दिसते कि, मी पडलो आहे खरा, पण पडण्याचे कारण आठ लोकधर्मांच्या बाबतीत अविद्येमुळे मनावर झालेला परीणामक आहे. मन जागरुक, मेहनती व प्रगत नसल्यामुळे त्या  पहिल्या पायरीलाच पडण्याची प्रक्रिया सुरु झाली होती (दुसरे आर्य सत्य: दुःखाला कारण आहे.) मन एकदा का जागरुक, मेहनती व प्रगत झाले कि कारण नष्ट करता येते (तिसरे आर्य सत्य: दुःख निरोध शक्य आहे) . आणि मन सजग, मेहनती व प्रगत बनण्याचा आर्य(महान)मार्ग विपश्यनेद्वारेच प्राप्त होतो/आचरिता येतो (चौथे आर्य सत्य: दुःख मुक्तीचा मार्ग).

त्यामुळे जीवनाच्या प्रवासात आपण मन व शरीर दोन्ही जरी महत्वाचे असले तरी मन हे प्रमुख आहे, प्रधान आहे, अध्यक्ष आहे. त्यामेळे मोक्ष /निर्वाण (कायम निर्दोष जीवन) साठी शरीराला उपवास, व्रत, राख लावणे, अर्धनग्न किंवा नागडे फिरणे, अंगारे-धुपारे, कर्म-कांडांत  अडकवून (शरीराला अतिमहत्व देवून) समस्या सुटलेल्या नाहीत. कारण महत्वाचा व गंभीर परीणाम मनाचा शरीरावर होतो। शरीराच्या रोगांचा मनावर तितकासा परिणाम होत नाही. 

-संबोधन धम्मपथी 

























Saturday, 13 June 2015

धम्मिको बौद्धिक स्पर्धा : 2015

साप्ताहिक निळा प्रहार द्वारे "धम्मिको बौद्धिक स्पर्धा" आयोजित करण्यात येत आहे। विषय: "धर्म प्रसार व धर्म प्रचार यात फरक कोणता? आणि प्रभाव कोणाचा जास्त असतो धर्म प्रसाराचा कि धर्म प्रचाराचा? उदाहरणे देवुन स्पष्ट करणे आवश्यक आहे।"
पहिल्या प्रथम जाणुन घ्या धर्म म्हणजे काय? बौद्ध, हिंदु, मुस्लिम  व ईतर हे तर संप्रदाय आहेत। धर्म ह्या शब्दाला प्राचीन भारतात स्वभाव, निसर्ग व गुणधर्म म्हणायचे। धर्माचे तीनच प्रमुख अंग आहेत: शील (सदाचारी व नैतिक जीवन), समाधि ( कुशल मनाची एकाग्रता) व प्रज्ञा (शरीर व मनाच्या सवयींचे प्रत्यक्ष ज्ञान ज्याच्या अभ्यासाने प्रत्येक मनुष्याला मोक्ष/निर्वाण मिळु शकते। जसे सिद्धार्थाला मिळाला ।) ही बौद्धिक स्पर्धा ह्याच शुद्ध धर्माच्या अर्थावर अवलंबुन आहे हे कृपया ध्यानात ठेवावे।
आता शुद्ध धर्माची गरज नक्की काय व कोणाला हे ही तथागतांनी सांगितले आहे। ते म्हणतात: गृहस्था तु अमुक देव-देवतेला पुजणारा असलास, ईश्वर एक किंवा अनेक आहेत असे मानणारा असलास, आत्मा व परमात्मा एकच किंवा अनेक मानणारा असलास, ईश्वर मानणारा किंवा न मानणारा असलास तरी तुझ्या कळत-नकळत तुझ्याच मनात ईर्षा, भीती, वासना, बैचेनी, क्रोध, कुशंका, अयोग्य अविश्वास, असंयम, असहनशीलता व व्याकुळता हे अकुशल मनोविकार जागतात ना? आणि हे च विकार मग मनातुनच वाणी न शरीरावर बाहेर पडतात। ईच्छा असुनही अकुशल कर्मांवर तुमचे नियंत्रण राहत नाही।  आम्ही त्याच चंचल मनाचे डॉक्टर आहोत। तुला ज्याला पुजायचे आहे त्याचे तु पुजा-अर्चा चालु ठेव। कायम सुख किंवा दुखमुक्ती हवी असल्यास मात्र आम्ही तुला मनाला शांत व निर्दोष बनण्यास शिकवु। पण ह्या मार्गावर तुलाच चालायचे आहे। जसे व्यायाम शाळेत गेल्यावर शिक्षक तर आपल्याला फक्त शिकवतात सुर्यनमस्कार तर आपल्यालाच मारावे लागतात। धर्माचीही गोष्ट तशीच आहे।
याचा दुसरा अर्थ असा कि बुद्धाची शिकवण/धम्म हा काही फक्त बौद्धांपुरता मर्यादीत नसुन भुत,वर्तमान व भविष्याकाळातील सर्व मानवासाठी आहे। त्यामुळ बौद्धांसह इतर संप्रदायातील लोकापर्यंतही धर्म पोचायला हवा। तर मग ईतर संप्रदायांची कर्मकांडे व संस्कृतीला नावे ठेवुन कल्याणकारी बुद्धवाणीचा बौद्धजन स्वताच अपमान करतात व तिला सीमा लावतात। ह्या  बौद्धिक स्पर्धेत मात्र असे चालणार नाही। बुद्धविचार यशस्वी रीत्या कसा पोहोचेल ते पाहायचे आहे: धर्म प्रसार व धर्म प्रचाराच्या माध्यमातुन।
काही जण असेही सुचवतील कि दर रविवारी विहारात जावे, पौर्णिमा व इतर सण साजरे करावेत। पण प्रश्न  असा आहे कि हा  धर्म प्रसार आहे का धर्म प्रचारआहे। दोन्हीही असणे शक्य नाही कारण फक्त तसे केल्याने का मन पुर्णता शांत, सजग व निर्मळ होत नाही असा माझ्यासह अनेकांचा अनुभव आहे। त्यामुळे अशी उदाहरणे देताना धर्म प्रसार व धर्म प्रचाराच्या दृष्टीनेच परिपुर्ण विचार करावा।
समजा कुणी विचारले कि शिकवणे म्हणजे काय तर असे सांगावे कि: एखादी गोष्ट/ज्ञान/माहिती आपण लेखाने/वाणीने/स्वत: आचरणात आणुन/प्रसंगानुरुप(जसे बुद्धांनी किसा गौतमीला सांगितले)  समोरच्या माणसाचे वय/स्थिती/बुद्धिमत्ता पाहुन सोप्या पद्धतीत समजावुन सांगणे याला शिकवणे म्हणतात। अशा पद्धतीने धर्म प्रसार व धर्म प्रचाराची दोन्हींची व्याख्या द्यावी। तसेच बुद्धाच्या शिकवणीचा किस्सा किंवा  स्वताच्या जीवनातील एखादा शिकवणीचा किस्सा उदाहरण स्वरुपात देवुन शिकवण ह्या शब्दाचा अर्थ समजावता येईल। त्याच प्रमाणे धर्म प्रसार व धर्म प्रचारा यांचा अर्थ ह्या धम्मिको बौद्धिक स्पर्धेत तुमचे उत्तर साधारण २०० शब्दांत द्यावे ही विनंती।
आपल्या धर्म प्रसार व धर्म प्रचारात आपण कमी पडतो आहोत। जर धर्म प्रसार व धर्म प्रचाराचा बुद्ध व बाबासाहेबांना काय अर्थ सांगायचा होता हे परिपुर्ण रीत्या समजणे व समाजात धर्म प्रसार व धर्म प्रचाराबाबत तर्कसंगत व युक्तिसंगत अशी उपयुक्त माहिती देणे हे ह्या स्पर्धेचे मंगल उद्देश्य आहे। त्यामुळे सर्वांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी यथायोग्य सहकार्य करावे, विचार मांडावेत व ईतरांनाही प्रोत्साहित करावे ही नम्र विनंती।

- संबोधन धम्मपथी

आग से आग कैसे बुझेगी भाई, बैर से बैरागी कैसे मिटेगा भाई,
सीधी साधी बात क्यो तेरे समझती में ना आयी।।




जेव्हा एखाद्या गरीब/परावलंबी/लाचार समाजाच्या मुख्य वर्तमान पत्र त्या समाजापेक्षा मोठ्या/बलवान/श्रीमंत समाजाच्या श्रद्धा स्थळांना/देवतांची/कर्मकांडांची नेहमीच बेआबृ/ अपमान करतो त्यामुळे त्या गरीब समाजातील व्याकुळ तरूणांमध्ये व बलवान समाजातील व्याकुळ तरूणांमध्ये वादावादी होऊन गोष्ट अत्याचार व हत्येपर्यंत जाते ।

हया प्रकारच्या हत्येमागे आपल्या वृत्त पत्रांचा व वक्त्यांच्या अडाणीपणा आहे। आपले बांधव गरीब / कमजोर / कामगार असतानाही नेहमीच हिंदू देवी- देवतांची निंदा करतात. सुरक्षिततेच्या भीतीने  मग आपलेच बलवान बांधव मुग गिळून बसतात । कमजोर अजुन कमजोर होतो।

मग बलवान समाजाचा पुर्ण राग निघतो गरीब कमजोर मागासवर्गीयां वर।

निष्कर्ष:
 निंदा करू नये। ना बलवानाची ना कमजोराची।

जो आपल्या आई वडिलांचा आदर करतो तो दुसर् या च्या आई वडिलांचा ही मान राखतो। हा सद्गुण आहे।

वैराने वैरच वाढते, आपल्या वृत्तपत्रांना व वक्त्यांना जो पर्यंत नाही समजत तोपर्यंत अत्याचार कमी कसे होणार?

- संबोधन धम्मपथी


जब तक अंतर जगत में, जगत रहे विकार।
भव रोगी व्याकुल रहे, लिये दु:खों का भार।।
- आचार्य सत्य नारायण गोयन्का
💐।। धर्म के दोहे।।💐

स्पष्टीकरण:
साधारण मनुष्य हे समजतो कि जोपर्यंत मी (शरीराने ) कोणाला छळत नाही, जीव हत्या करीत नाही, लबाडी- चोरी व्यभिचार करीत नाही तर मी एक गुणी न संयमी व्यक्ती झालो आहे। आणि त्यातही जेव्हा मी चुगली, खोटेपणा, वाढवुन सांगणे, सत्य अर्धवट किंवा फिरवुन सांगणे हे ही करीत नाही तेव्हा तर मी अधिकच गुणी व संयमी झालो आहे असा भ्रम तयार करतो। तसेच अशा भ्रमात स्वताला ईतरांपेक्षा मोठा समजु लागतो। आणि नकळत सज्जन बनण्याच्या प्रयत्नात अहंकारी बनतो व असे समजतो कि आता अध्यात्मात / धर्मात  शिकण्यासाठी काही शिल्लक नाही। पण हा दिखावा किंवा भ्रम अंर्तमनातील व्याकुळता व बैचेनी वाढवत असतो। जसे डोक्यावर कर्जाचे बोजे वाढते, तसे बैचेनीचे व्याज तर दर अकुशल विचारासोबत वाढत जाते। आणि विचार हे काही ठरवुन किंवा नियमाप्रमाणे येत नाही। विचार तर मनातच येतात आणि स्वता मनाचीच शांती बिघडवतात। मनुष्याने जरी शारीरिक व वाचिक कर्मांवर नियंत्रण मिळवले कि लोक एखाद वेळेस चांगले म्हणतील ही, पण अर्तंमनातील ज्वालामुखीचे व्याज/कर्ज तर वाढतच असते। त्यामळे शांती ही कोसो दुर असते।
असे का होते? जाणुन घ्या असे का होते। आपल्या मनात खोलवर कुठेतरी, आपण पाहिलेली प्रत्येक घटना,कल्पना, रंग, माणुस/स्त्री, देव याबद्दल काही प्रिय-अप्रिय भाव ह चांगल्या-वाईट आठवणींच्या  स्वरुपात घट्ट बसुन असतात। अशी मनातली प्रिय स्त्री/पुरुष समोर आला कि आवडती गोष्ट आल्याप्रमाणे मनाला गुदगुल्या (सुखद संवेदना) होउ लागतात व मनात कामवासनांच्या (मला अमुक पाहिजे किंवा मला मिळाल्यावर अमुक सुख मिळेल अशी आसक्ती) विचारांचे वादळ सुरु होते।जसे 'तो/ती म्हणजे माझे पहिले प्रेम आहे' किंवा 'त्याच्या शिवाय जगणे अशक्य' हे ही एक प्रकारचे वादळच आहे।  तसेच नावडती स्त्री/पुरुष/घटना समोर आल्यावर तीव्र स्वरुपात बैचेनी/क्रोध उफाळुन येतो। हा मनातील आठवणींचा/विचारांचा भार व्यक्ती शरीर व वाणीने जरी संयमी राहिला तरी मनाच्या जगात भोगत राहतो। आपल्या मनाचे नहमीचेे/सततचे विचार ह्या आपल्या सवयी बनतात, मनातील सवयी कालांतराने शरीर व वाचेद्वारे बाह्यजगात प्रकटतात।  आणि हा आपला स्वभाव बनतो। हया बनण्याच्या क्रियेला भव (भवतु सब्ब मंगल मधला 'भव') म्हणतात। आणि ह्या भवातुनच 'मी', 'माझा  स्वभाव', 'माझी जात', 'माझा मुलगा', 'माझा देव' असा 'मी' चा संसार बनतो।
मग आणखीन मोठा भ्रम कि आता काहीमाझा स्वभाव बदलणार नाही। कारण जीत्याची खोड काही मेल्याशिवाय जात नाही हा मोठा गैरसमज आपणच बनविला। जोपर्यंत विपश्यने द्वारे मनातील अकुशल विचारांची जागा स्थायी कुशल विचार घेत नाहीत तोपर्यंत मनुष्य जीवन अनेको गैरसमज, भ्रम व अनियंत्रित अकुशल/अशुद्ध विचारांच्या वादळात वाया जाते। अनेक जन्माप्रमाणे हा जन्म ही वाया जावु नये याची शहाण्या माणसाने खबरदारी घ्यावी।

स्पष्टीकरण: संबोधन धम्मपथी