Wednesday, 30 June 2021

धम्मचर्चा : स्मृती-अनुस्मृती आणि धम्म-अनुधम्म यात काही फरक आहे की एकच आहेत

  उत्तर: 

अनु म्हणजे मुख्य विषयाचे उप-विषय, उपविभाग किंवा कप्पे  !!  




 उदाहरण : ईमाय धम्मा-नुधम्म(धम्म-अनुधम्म) पटिपत्तिया बुद्धं पुजेमि!!

 धम्म‌ आणि अनुधम्म:
 धम्म‌: शील, समाधि, प्रज्ञा
 अनुधम्म : ३६ बोधिपक्षिय उप-धम्म


 स्मृतीचे दोन अर्थ आहेत.
१. उजळणी/आठवण/memory
२. जागरुकता... awareness/mindfullness  

स्मृती म्हणजे एखाद्या विषयाची उजळणी/आठवण किंवा जागरुकता... awareness !

अनुस्मृती म्हणजे एखाद्या 
(विषयाच्या) स्मृतीच्या(इथे सजगता- सर्व उप-विषयांची विषयाची उजळणी/आठवण किंवा त्या उप-विषयांची जागरुकता... awareness!!!


धम्म अनुस्मृती म्हणजे, धम्माच्या sub-topic ची उजळणी!(अर्थ पहिला)

बुद्धानुस्मृती म्हणजे, बुद्धाच्या sub-topic ची उजळणी!(अर्थ पहिला)

नुसती "अनुस्मृती" (अर्थ दुसरा) म्हणजे स्मृती(विपश्यनेसाठी लागणारी स्मृती व संप्रज्ञान मधील *स्मृती* ) ‌च्या sub-topic (कायानुस्मृती, धम्मानुस्मृती, चित्तानुस्मृती, वेदनानुस्मृती) ची उजळणी!(अर्थ दुसरा)

भले होवो.
संबोधन धम्मपथी
9773100886
👍🙏

Saturday, 19 June 2021

दान करताना समज व गैरसमज

 प्रश्न १: साधारणतः मनुष्य दान का करतो ?


उत्तर : जेव्हा माणुस दान देतो, तेव्हा वरवर पाहताना असे दिसते पाहा किती परोपकारी व माणुसकीची जाण ठेवणारा माणुस आहे. पण अंतर्मनात स्वतःने पहिले तर कितीतरी वेळा माणसाचा स्वार्थ व भीती असल्याने मनुष्य दाणे देत असतो. आसपासच्या अनपेक्षित व नको असलेल्या खूप दुर्दैवी घटना नकळत घटत असतात. वाईट वाटते, भीती वाटते पण कारण कळत नाही. त्यामुळे मी बैचेन होतो. मी व माझे (आरोग्य, पैसे, ऐश्वर्य, बायको -मुले, परिवार व समाज) ठीक/सलामत  राहावा यासाठी माझ्या संप्रदायातील पूजापाठ करणारे व वाईट काम न करणारे माणसे असतात. 


त्यांना दान दिले तर माझी पापे कदाचित धुतली जातील व माझे (आरोग्य, पैसे, ऐश्वर्य, बायको -मुले, परिवार व समाज) सलामत राहतील अशी कल्पना व आशा करतो. एकूणच फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी दान केल्याने ते दान परोपकारी ठरत नाही त्यामुळे त्याचे ते पुण्य मिळत नाही जे परहितबुद्धीने किंवा कल्याणकारी भावनेने मिळते. कारण दान देताना मनात बैचेनी आणि  स्वतःचा व स्वतःच्या संप्रदायाचा (हिंदु, मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रीश्चन) स्वार्थाची भावना प्रबळ होती. 

प्रश्न २: म्हणजे मनुष्य दान देताना निस्वार्थ भावना असली कि पुण्य मिळते. बरोबर ना?

उत्तर :जरुरी नाही. जसे एका शेतकऱ्याने नापीक जमिनीत खूप मेहनत-मशागत करत बीज पेरली तर त्याला अपेक्षित यश येणार नाही. कारण त्याने जमिनीच्या दर्जावरती अजिबात लक्ष दिलेले नाही किंवा त्याची त्याला पुरेशी माहिती नाही. 


तसेच जर दान स्वीकारणारा (हिंदु, मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रीश्चन इतर कोणीही असेना) जर शील पाळणारा सदाचारी नसेन, संयमी, मन विशुद्ध करणारा व लोकांना (हिंदु, मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रीश्चन इतर कोणीही असेना) मदत करणारा नसेल तर अशा अनाडी, आळशी किंवा ढोंगी माणसाला दिलेले दान जरी निस्वार्थ भावनेतुन असले तरी त्याच्या अपेक्षित तेवढा लाभ होत नाही. कारण दान स्वीकारणाऱ्याच्या नैतिक दर्जाबाबत (स्वशुद्धी व सामाजिक जबाबदारीबद्दल) दान देणारा सजग नसतो

प्रश्न ३: मग  बुद्धाने 'सब्ब दानं धम्मदानं जिनाती' असे स्वतःच्या संप्रदायालाच दान करायला का बरे सांगितले असावे?

उत्तर : बुद्धाने 'सब्ब दानं धम्मदानं जिनाती' (धम्मपद २४, ३५४) सांगितले जरूर आहे पण त्या अर्थाचा सध्या अर्थच बदलला आहे. 

पहिली महत्वाची गोष्ट अशी कि बुद्धाने  "तुम्ही एखाद्या शीलवान, कर्तव्यबुद्धी असलेला व इतरांना निस्वार्थपणे मदत करणाऱ्याचा संपूर्ण खात्री  केल्यावर आदर करावा भले तो कुठल्याही जात-संप्रदायाचा असो!" असे सांगितले आहे हे कायम लक्षात ठेवावे कारण बुद्ध वाणी हि सार्वजनिन आहे. सर्वाना लागू पडते व सर्वासाठी मंगलमय आहे. 

☸️ सध्याचा 'सब्ब दानं धम्मदानं जिनाती' प्रचलित चुकीचा अर्थ:

फक्त एका बौद्ध संप्रदायाचा प्रचार-प्रसारासाठी बौद्ध माणसांनाच(भिक्षु -भिक्षुणी, उपासक-उपासिका) दान‌ करत जा. त्यासाठी केलेली इतर वस्तुंचे दान‌( मुर्ती/पैसा/चीवर/भोजन/औषधे), अशा भौतिक वस्तुंचे दान बौद्ध संप्रदायातील लोंकासाठीच केलेले असते,ते जगातील इतर सर्व दाना‌पेक्षा‌ श्रेष्ठ आहे. ह्या दानाचा बुद्ध वाणी लोकांना सांगण्याशी स्पष्ट संबंध कोणाला ठेवण्याची गरजच‌ वाटत नाही.

हा समज व धोरण चुकीचे व सर्वस्वी अयोग्य आहे!! कारण दान करणारा हा दान स्वीकारणाऱ्या(भिक्षु-भिक्षुणीं-तज्ञ उपासक व तज्ञ उपसिकांकडुन) कडुन माझ्या, माझ्या परिवाराच्या किंवा सर्व  समाजाच्या मन विशुद्धीला आवश्यक असणाऱ्या बुद्धवाणीसाठी कुठल्याच प्रकारची योजना, परोपकाराची अपेक्षा ठेवताना दिसत नाही. 

तशी स्पष्ट अपेक्षा कोणाला ठेवण्याची गरजच‌ बरे वाटत नाही यांचे उत्तर वर प्रश्न #१ मध्ये दिलेलं आहे.

असे दान अंधश्रद्धा बनते कारण त्याने कोणाचे‌ व कुठल्या समाजाचे भले असे होईल असे दानकर्त्याला व दान स्वीकारणाराला सांगता यत नाही. 


तसेच दान स्वीकारणाराची पात्रता एवढीच कि तो बौद्ध संप्रदायाचा आहे!!! हि बुद्धाला अपेक्षित सार्वजनिनता व महाकारुणिकता दिसतच नाही.   


तो किती‌ शीलवान, विशुद्ध मनाचा, परहितबुद्धि जपणारा(धुतांगधारी)  व‌ अधिकृत बुद्धवाणी वाचुन ती सुयोग्य पद्धतीने मानव जातीला  (हिंदु, मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रीश्चन) देण्याचं कर्तव्ये करणारा असावा‌ अशी‌ कुठलीच अपेक्षा नसते. त्यामुळे बुद्धाच्या शिकवणुकीबाबत इथे गैरसमज झाल्याने सार्वजनिक बुद्धवाणीला इथे एका बौद्ध समाजापुरते ठेवण्याची मोठी चूक झाली आहे.  

☸️ प्रचलितचुकीच्या अर्थामुळे उद्भवलेली मोठी समस्या :

तुम्ही दान स्विकारुन खालील गोष्टी प्रामुख्याने कराव्यात असे दान देणारा सांगताना दिसत नाही :

१. त्रिपिटकात बुद्धाने केलेले मार्गदर्शन (कुटुंबाला, नेत्याला, कामगारांना, मालकाला, नोकरांना, पती -पत्नींना, मुलांना) वाचुन आम्हास शिकवावे. (म्हणजे परियत्ती)

२.  विपश्यना: ध्यान साधना विधी  समाजाला शिकवण्यासाठी स्वतः विपश्यना साधनेत प्रवीण/एक्सपर्ट होऊन. सद्गुण जीवनात आणण्यासाठी समाजाला जागे करावे. (म्हणजे पटीपत्ती )

जर दान कर्त्याने अशी अपेक्षाच नाहो ठेवली तर दान स्वीकारणारा सुस्तावतो, आळसावतो व जीवनाला बुद्धाने सांगितलेला उद्देश्य नसल्याने (अधिकाधीक लोंकाच्या हित व सुखासाठी दिवस रात्र मेहनत करा - बहुजन हिताय बहुजन सुखाय ) खालील गोष्टी वाया घालवतो :

१. दान देणाऱ्याचा पैसे वाया जातात (कारण पैसे घेऊन कल्याणकारी काम करत  नाही) आणि त्यामुळे त्याला पुण्यही मिळत नाही.  

२. स्वतःचे जीवन निरर्थक किंवा थोतांड बनते

३. बुद्धाच्या महान धम्माची व संघाची अवनती (वाट लावतो)

☸️ 'सब्ब दानं धम्मदानं जिनाती' चा खरा अर्थ:

धम्म (बुद्धवाणी-म्हणजे शील समाधि प्रज्ञेला अनुसरुन असलेले ३७ बोधिपक्षिय धर्माविषयी निस्वार्थ व परहितबुद्धीने  बुद्धी ने केलेले लेखन/मार्गदर्शन/सेवा/शंकेचे निरसन/ध्यान शिबीराचे आयोजन) दान (मग ते कोणत्याही जाती-संप्रदाय-देशाच्या माणसाच्या विशुद्धीसाठी (मनाला निर्मळ बनवण्यासाठी) असो. हे‌ कुठल्याही प्रकारच्या दानात सर्व‌श्रेष्ठ दान‌ असते.


रण सहस्त्र योद्धा लडे, जीते युद्ध हजार ।

पर जो जीते स्वयं को, वही शुर सरदार ।।


क्षण-क्षण क्षण-क्षण बी ता, जीवन बीता जाय ।

इस क्षण का उपयोग करे बीता क्षण नहीं आय।।  


अशा प्रकारे स्वतःच्या जीवनाचा व इतरांनी दिलेल्या दानाचा सर्व समाजाच्या हितासाठी अहोरात्र मेहनत करीत असतो. 

भले‌ होवो!!

- संबोधन धम्मपथी.

९७७३१००८८६

Sunday, 25 April 2021

सब्ब दानं धम्मदानं जिनाती

दानाबद्दलचे काही  गैरसमज दूर झाले कि खूप  फायदा होतो. 

☸️ धम्मदानच‌ सर्व‌श्रेष्ठ दान‌ का असते? :

एखाद्या ला पैसा द्या,‌पण मग काही दिवसांनी परत गरज लागेल. पैसा कायम कुठे टिकतो? एखाद्या ला जेवण द्या, काही तासांनी परत भुक लागेल. भुक कायम कुठे मिटते?एखाद्या ला रक्त/अवयव दान द्या, काही दिवसांनी परत आजारी पडेल. आजार कायम कुठे मिटतो? तसेच एखाद्या ला औषध द्या, काही दिवसांनी परत आजारी पडेल. आजार कायम कुठे मिटतो? ह्या दानाचा परिणाम कायम नसतो. 



☸️ गरज पुन्हा लागतेच!! म्हणुन ही सर्व प्रकारचे दान साधारण दान झालीत. त्यांना‌ कोणालाच‌ हलके/कमी लेखत‌ नाही, तुम्हीही लेखु नका. पण त्यांची मर्यादाही ओळखा!!


पण प्रकृती/निसर्ग नियम दान लक्षात ठेवते.‌जे‌ पेराल ते कालांतराने उगवते. भरभरून निसर्गाचा प्रतिसाद मिळतो.


☸️ जसे एक आंब्याची कोण लावली‌तर हा निसर्ग/प्रकृती/कुदरत का कानुन त्या कर्माचं व त्यासारखेच मोठं मोठं फळ देतो. अनेक फळ व फळातुन पुन्हा मोठी झाडं येतात. 


☸️ तसेच एखाद्याने अन्नदान दिले, तर‌ निसर्ग त्यांच्या कर्माची फळं देतो...ह्या जन्मात किंवा पुढील जन्मात एकुण (ह्या जन्माचे व मागील जन्मी च्या कर्मफळानुसार) तसेच काळानुरुप व दर्जानुरूप   (जसे केळ्याचे फळ दर महिन्याला येते, पण आंब्याचे फळ उन्हाळ्यातच येते) तसे फळ मिळते.


 तो उपाशी पोटी झोपत नाही, खुप संपन्नता लाभते. तसेच औषधाचे , कपड्याचे, पैशाचे व इतर मदतीचे दान निसर्ग/धम्म अनेक पटीने देतो.


☸️ पण ह्या कुठल्याच दानाने जो‌ लाभार्थी असतो त्याच्या मनाची विशुद्धी व निर्मळता साध्य होत‌ नाही. दुर्गुण दुर होऊन मंगल शांती मिळत नाही. जसे आपल्याला दिसते कि अनेक पैसेवाले माणसे बैचेन व अशांत असतात. पैशाचा  होत नाही , कारण लोभ कमी होण्यासाठी, धर्म (धम्म : निसर्गाचे नियम ) व धर्मवान (सद्गुणी -सदाचारी-शुद्ध -संत) लोंकाची संगत व मार्गदर्शनही नाही. तु(मचे कर्म पैशाचे दान देण्याचे होते, तर पैसे मिळाला. धर्म(सुख-शांती) मिळवुन जर ती दान केली असती तर सुख-शांती मिळाली असती. 

धरम ना हिंदु बौद्ध है, सिख ना मुस्लिम जैन ।

धरम चित्त की  शुद्धता, धरम शांती सुख चैन ।।


☸️ पण जर जो कोणी करुण चित्ताने व निस्वार्थ भावनेने धम्माचे ( बुद्धवाणी: जी विशुद्ध मन व  कर्म निर्दोष बनवुन एकुणच  जीवन निर्दोष बनवते ) दान देतो किंवा धम्माचे दान मिळेल यासाठी मदत करतो, त्याला ह्या व पुढील अनेक जन्मातही निसर्ग/प्रकृती अनेक पटीने जास्त धम्मदान (बुद्ध वाणी जी सद्गुण व सुखशांती वाढवते) मिळवुन देते. अनेक धम्मविहारी व धम्मप्रवीण कल्याणमित्र मार्गदर्शक व मित्र भेटतात. ज्यामुळे निर्वाण/मोक्ष मिळुन लाखो-करोडो वेळा पुन्हा पुन्हा जन्म-मृत्युच्या फेर्यातुन मुक्त (भवमुक्त) होतो. 


☸️ पुन्हा जर जन्मच नाही तर भुख, आजार, दुःख, प्रिय व्यक्तीचा वियोग किंवा अप्रि व्यक्तीचा संयोग, दारिद्रय, दुर्भावना व मृत्यु पासुन कायमची सुटका होते. मग ज्यामुळे सर्व प्रकारच्या दु:खातुन कायमची सुटका होते, ते दान अर्थातच महान व सर्वोत्तम आहे ना?


☸️ संधी नुसार (कालिक) दान व संधी नसताना (अकालिक‌) दान: विवेकशील व्यक्ती हे चांगलं जाणते कि संधी असल्यावर (कालिक) दिलेले‌ दान खुप कल्याणकारी असते. जसे महापुर, महारोग, अग्निकांड, जागतिक साथ, बेरोजगारी, निवारा अशी संकटकालीन संधी मिळाल्यास केलेले संधीयुक्त /कालिक दान(जेवण, औषधं, पैसा, कपडे, सुव्यवस्थेची‌ तजवीज) हे संधी नुसार(कालिक) दान फलदायी असते.


☸️पण त्याहीपेक्षा श्रेष्ठ असते संधी नसताना ही केलेलं असं सार्वकालिक दान!! जे करताना मनुष्य वाईट वेळ जरी नसली तरीही स्वताची‌ सामाजिक जबाबदारी समजुन क्षमतेनुसार दान करीत जातो. आणि तेही धम्मदान (कर्म व जीवन निर्दोष बनवणारी बुद्ध वाणी चे दान)  ज्याने इतरांचे दुःख दुर होऊन, सुखशांती व सद्गुण वाढतील.


☸️असे जात-संप्रदाय न पाहता केलेलं धम्मदान  हे सदा-सर्वदा सर्वहितकारी दान असतं. कारण एकदा का मनुष्याचे मन निर्मळ, शोकविरहित व खंबीर झाले कि तो स्वताची रक्षा स्व:ताच करू शकतो. स्वतः सुखी राहतो व स्वतःची जबाबदारी ओळखुन वेळेनुसार समाजकार्यही करतो. 


म्हणुन भगवान बुद्ध म्हणतात कि, सब्ब दानं धम्मदानं जिनाती !!

भले‌ होवो!!

- संबोधन धम्मपथी.

९७७३१००८८६

 *साभार* : विपश्यना विशोधन विन्यास वरील आचार्य गोयंकाजींचे‌ हिंदी लेख.

 *नोंद:* जर लेखात काही चुक आढळल्यास भाषांतर मी केल्याने चुकीची जबाबदारी माझी आहे, आचार्यांची नाही.

Saturday, 16 January 2021

भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक वीरांचे मनोगत व प्रश्न

 माझ्या वारसांनो तुम्हाला काही सांगायचे आहे, काही विचारायचे आहे. शंभराहून अधिकवर्षे गेली बघा बघता बघता. कोरोना काळ चालू आहे आशा आहे की तुम्ही सुरक्षित असाल.

 जास्त वेळ नाही घेत तुमचा नाही, काही सांगायचं होते म्हणून आलोय तुमच्या स्वप्नात. आमच्या नंतर एक महान, कर्तबगार व थोर शुरवीर होऊन गेला आणि तुम्हाला बरेच सांगुनही गेला, बाबासाहेब नावाचा!! तरीही काहीतरी चुकतंय म्हणून आलो मन‌ मोकळ करायला. 

आमच्याकडे त्यावेळी जे होते त्याने, जसे होतो तसे आणि मानवी जीवनाचे हक्क मिळवण्यासाठी आम्ही जीव झोकून लढलो. त्याला विजयस्तंभाला तुम्ही आजही वंदन करत असता. चांगले आहे, पण हे अजिबात पुरेसे नाही. नक्कीच‌ नाही.

जरी आम्ही लढलो तरी युद्ध पुकारण्यापूर्वी पहिली सामाजिक परिस्थिती अनेक वर्षे अनुभवली होती. ती सामुदायिक रित्या समजुन योजना आखली होती. हे पहा जर आम्ही आमच्या पूर्वजांचाच इतिहासाच्या घटनांचा आणि जागेचा उत्सव साजरा करीत असतो नुसतीच मानवंदना देत राहिलो असतो; तर ना आम्हाला मानवी हक्क मिळाले असते ना ही आमची पुढची पिढी जगली असती.




 _त्यामुळे तुमची हि एक तारखेची वंदना आम्हाला पुरेशी नाही. आमची इच्छा आहे तुम्ही काही तरी आम्हाला साजेसे बौद्धिक व धोरणी पराक्रम करावेत. आम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरे देऊन तुमचाही पराक्रम सिद्ध करु शकता का?:_ 

⚡बाबासाहेब फक्त एकदाच का गेले भीमा कोरेगाव ला १९२७ साली, ते ही बौद्ध होण्याच्या २९ वर्षांपुर्वी?

⚡प्रगतिशील व दक्ष बौद्ध समाज म्हणुन तुम्ही आता कुठे व‌ कसे पडत आहात हे तुम्ही कसे, कधी व कुणाकडुन‌ शोधता ?

⚡तुम्ही बौद्ध व अस्पृष्य हा फरक कसा करता ? कि १९५६ सालाची धर्मांतर तुम्हाला कबूलच नाही ?


⚡बहुतेक शिकलेली व पैसेवाले बौद्ध आणि अस्पृश्य (जी समाजाची नवी शक्ती स्थाने आहेत) ते समाजापासून दूर का राहतात ? 

⚡तुम्ही विजयदिन साजरा करताना, एक समाज म्हणुन आपल्या समस्या कोणत्या व त्या कशामुळे निर्माण झाल्या याकडे कधी लक्ष देता का ?

⚡आमची लढाई एका विशेष जातीविरुद्ध/संप्रदायाविरुद्ध नसुन जातिव्यवस्थेच्या विरुद्ध आहे हे तुम्ही कसे विसरलात ?

⚡तुम्हाला विजयदिनी आत्मविश्वास व एकता वाढवायची असतो, कि ज्यांना आम्ही हरविले त्यांच्यावर हसायचे असते? अशाने दुश्मन तयार होतील कि दोस्त?

⚡१९५६ नंतर तुम्ही नक्की बौद्ध झालात कि एका संप्रदायाचे सात जन्माचे विरोधक झालात ?

⚡सध्याच्या घडीला समाजाकडे चांगला वैचारिक, सुज्ञ, धोरणी व विविध समाजमान्य नेता नाही(राज्यस्तरावरही नाही व राष्ट्रीय स्तरावरही नाही) याचे कारण काय हे तुम्हाला समजले का ?

⚡समाज म्हणून आपल्याला एक‌ प्रगल्भ नेता हवा आहे कि एक विदुषक ? तुमचे शेजारी व मित्र अशा नेत्यावर व समाजावर कितीही हसले तरी‌ नवीन प्रगल्भ नेत्याची गरजच वाटत नाही का तुम्हाला?




⚡बाबासाहेबांचे विचारांची पायमल्ली करीत विरोधी विचारधारा असणाऱ्या राजकीय पक्षाशी जवळीक करणार्या नेत्याला तुम्ही नेते पदावरून खाली का उतरविले नाही ? कसे उतरायचं हे तरी माहिती आहे का?




⚡एखाद्या नेत्याच्या फक्त २५ वर्षांपूर्वीच्या चांगल्या कामावर त्याला/तिला आज सन्मान का देता? त्यांचे/तिचे सध्याचे निकृष्ट काम, कामचलाऊ धोरण, फसवी/ स्वार्थी वृत्ती का लक्षात घेत नाही? नवा नेता कसा शोधावा हे तरी कळते का?

⚡प्रत्येक नवमुस्लिम/नवख्रिश्चन अस्पृश्याने ती अस्पृश्य आडनावे बदलुन परिपूर्ण धर्मांतर केले हे तुम्हाला का नाही समजले ? नामांतराविषयी तर बाबासाहेबांनी १९३७ साली "मुक्ती कोण पथे" पुस्तिकेतही सांगितलेले होते. 

⚡प्रत्येक नवमुस्लिम/नवख्रिश्चन अस्पृश्याने ती अस्पृश्य आडनावे बदलुन त्यांच्या समाजाची एकता वाढवली हे तुम्हाला का नाही दिसले ? जर आडनावावरुन जात कळते आणि बौद्ध होऊनही भेदाभेद होते (संधींपासुन डावललं जाते) तर तुम्ही तुम्हाला मिळालेली अस्पृष्यता दर्शविणारी नावे धर्मांतरानंतर तुम्ही का बदललेली नाहीत ?

⚡तुमच्या पुढच्या पिढीला तर सोडा आसपासच्या लोकांना बाबासाहेबांचं कर्तृत्व कळेल किंवा बाबासाहेबांचे सर्वांगीण विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होईल असे कुठले काम तुम्ही करता ? 

⚡वेगवेगळ्या सोसायटीत गेलेल्या बौद्ध माणसाला तुम्ही कुठे व कसे ओळखणार ? बौद्धांची व अस्पृश्यांची आडनावे सारखीच आहेत.अस्पृश्य आडनावे न बदलेल्याने पुढची पिढी बौद्धसंस्कृती टिकवणार नाही याची कल्पना तुम्हाला का नाही आली ?

⚡बौद्ध भिक्षुं ची काळजी‌(जेवण, औषधे व‌ धम्म चर्चा) कोण‌, कधी, कशी व किती‌ घेता? का त्यांना कोणी नेहमी लक्ष व स्नेह देतात का?

⚡गोरगरीब जनतेचा विकास कुठल्या धोरणांमुळे होतो व ती धोरणे कशी टिकवावीत व सुधारावीत हे तुम्हाला माहिती आहे का ?



⚡बाबासाहेबांनंतर तुम्ही एक समाज म्हणून किती शाळा-कॉलेज बांधली आहेत ?

⚡ज्या (समाजाच्या) विकास रोपट्याला रोज पाणी व खत लागते, त्या रोपट्याला फक्त भीम/बुद्ध जयंती उत्सवात सगळा पैसा खर्च करून विकास रोपटे मरून जाते, हे तुम्हाला कधी कळणार ?




⚡तुमच्याकडे शिक्षण असताना आणि पसे देऊन कुठलीही विद्या मिळत असताना तुम्ही अजून ८४,००० बुद्ध उपदेशांपैकी किती उपदेश शिकलात ?

⚡आज अनेक राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक गट आहेत पण ते एकमेकांचेच विरोधक आहेत, याचे कारण कोण शोधणार?

⚡अनेक गटांचे कारण नक्की समाजाच्या अहंकारात आहे कि दुश्मनांची विषारी चाल आहे, एवढे तरी तुम्हाला ठाऊक आहे का ?

⚡बाबासाहेबांच्या संविधानात आतापर्यंत साधारणतः १२० च्या हुन अधिक बदल झाले आहेत. ते का व कोणते हे तुमच्या सध्याच्या कुठल्या नेत्याने तुम्हाला सांगितले आहे? सुशिक्षित असून तुम्हाला ते का माहिती नाही ?  विघातक बदल थांबवायचे कसे माहिती आहे का?

⚡ बाबासाहेबांचे विचार तुमच्या पर्यंत पोहोचवणाऱ्या विचारवंतांना तुम्ही नियमित मानधन देता कि, टीव्ही च्या केबलवाल्याला ? तुमच्या पिढीला कोण वाचवणार हे तुम्हाला का समजत नाही ?


⚡मानवी हक्कांसाठी बाबासाहेबांनी वेळेनुसार नवनवीन लढाई लढत राहिले कि बुध्द -फुले-कबीरांच्या उत्सवात व वर्गणीत गाफील राहिले?

⚡बाबासाहेबांनी भिमाकोरेगाव चे महत्व बौद्ध झाल्यावर कधी व कुठे सांगितले हे सांगू शकाल का ?


⚡विपश्यनेला विरोध करणाऱ्यांना समाजाची कीड (दारू) , धुंदी व व्यक्तिमत्वाची अनेक व्यसने दूर करुन सुसंस्कारी समाजाचे निर्माण कसे करावे असा प्रश्न विचारला का ?

⚡तुम्हाला आणि तुमच्या पुढची पिढीला बौद्ध म्हणून ओळख/लौकिक आवडेल कि अस्पृश्य म्हणून ?

⚡तेव्हाची लढाई मैदानात व्हायची आताच्या ऑनलाईन युगात लढाई कुठे व कशी होते हे तुम्हाला माहिती आहे का ?

हे तीस प्रश्न दर महिन्याच्या तीसही दिवस तुमच्या मनात ठेऊन उत्तर शोधल्याशिवाय उसंत घेऊ नका.

🔊लक्षात घ्या " *इमाय धम्मानु-धम्म पटीपत्तिया बुद्धं पुजेमी"* म्हणजे बुद्ध पुजा/वंदना मी त्यांच्या धम्मानुसार वागुन (आचरणात आणुन) पूर्ण करीत आहे, नुसत्या फुले-अगरबत्त्यांने नाही. 

त्याचप्रमाणे दरवर्षी आम्हाला औपचारिक वंदन करण्यापेक्षा, ह्या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधणे व त्या नुसार योजना आखून प्रगती करणे (आचरणात आणुन)हि तुमची खरी विजयस्तंभाला मानवंदना(खरा पराक्रम) ठरेल. ते तसे सोपे नाही, "बौद्धिक" पराक्रम सोपा नाही. नेहमी दक्षता व समजुतदारपणा दाखवावा लागतो.


तोच खरा पराक्रम ठरेल आणि तीच खरी वंदना‌ ठरेल. तेव्हाच तुमची पुढची पिढी तुम्हाला या "बौद्धिक" पराक्रमाबद्दल धन्यवाद/वंदन/अभिनंदन करीन .

 नाहीतर काही वर्षांनी समाज म्हणून आपण नक्की कोण हे विचारावे लागेल ?


आजच्या युगाला साजेसा असा पराक्रम करणार्यांना वारसांना भेटायला कोणाला आवडणार नाही . 
तुम्हाला जर एखादे महान काम जमत नसेल तर, नेहमीची छोटीशी कौटुंबिक व सामाजिक कामे महानतेने (कौशल्य, दक्षता,विनम्रता व सद्भावना  ...... म्हणजे एकुणच निर्मळ मनाने) करा. तुम्हाला देशाची व मानवतेची सेवा करण्यास यश लाभो हि सदिच्छा. 




Sunday, 15 November 2020

वादळी पावसातील दोन कळ्यांचे धैर्य

जुलै २०२० चा पावसाच्या महिना होता. जगभरात आणि महानगरी मुंबईतही करोना चा टाळेबंदी-लोकडाऊन असूनही करोनाचा कहर दर दिवशी नवनवी उंची गाठत होता. चांगली बातमी तशी दुर्मिळच होती. पण पर्यावरण स्नेहींना टाळेबंदी मुळे कारखाने बंद असल्याने वातावरणातील चांगला बदल दिसत होता. अशा परिस्थितीत सर्व जगातील सर्व प्रकारचे करोना योद्धे (डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, सरकार यंत्रणा, पोलीस दल, सफाई कर्मचारी व नियमांचे पालन करणारी जनता) यांना वंदन, अभिनंदन व धन्यवाद देत, मी दोन जुईच्या कळ्यांची गोष्ट मांडत आहे. मानवी मनाच्या विकासासाठी!!

मला फुलझाडे लावण्याची आवड असल्याने विविध  फुलझाडे घरात लावतो. काही महिन्यांपूर्वी जुईचे  आणले होते. त्याला हळू हळू छान फुलेही येऊ लागली होती. पण त्या रोपट्याला हळू हळू कीड लागली व टीकाही केल्या कमी होईना. फुले यायची हि कमी झाली, तरी माझे नियमित लक्ष होते. काही दिवसानंतर दोन छान नवीन छोट्या कळ्या   आल्या व त्यांच्या फांदीचे टोक उन्हासाठी खिडकीच्या ग्रीलच्या बाहेरही  जाऊ लागली, मी साहजिकच आनंदी होतो. 



पण पावसाने चांगलाच जोर धरला होता, तशी सरकार कडून अगोदर  घोषणाही झाली होती.  जरी मला पाऊस खूप आवडतो तरी मला आज काळजी वाटत होती ती, ग्रील बाहेर डोकावणाऱ्या माझ्या नाजुक छोट्या कळ्यांची. दिवसभर चांगल्याच पाऊस पडला, त्या कळ्या जबरदस्त पावसाचे तडाखे खात दिवसभर जीव संभाळून/धरून होत्या . पण रात्री पाऊस जोरदार वाढला, कळ्यांना खूप तडाखे बसत होते व मी ते कोणालाही न सांगता शांतपणे  पाहत होतो. मी त्यांना घरात नाही घेतले, कारण मला अपेक्षा होते कि निसर्ग-प्रकृती ने त्या कळयांना "बहुतेक" वादळी पावसापासुन जगण्याचे शिकवले असणार. मला त्या कळ्यांचे धैर्य किती आहे हे हि पाहायचे होते, आणि जोरदार रात्रीच्या पावसात मी अंदाज लावला कि, आज हि बहुतेक त्यांची शेवटची रात्र असणार. ताळेबंदीतील सुधारलेल्या पर्यावरणात पावसाचा तडाखा नेहमीपेक्षा जास्तच होता. मी दिवसभर पावसात राहून थकलेल्या त्या कळयांना अभिनंदन व शुभेच्छांसह शेवटचा निरोपही देऊन निराश होऊन झोपून गेलो. 



    सकाळी उठलो आणि पहिला कळयांना पाहायला गेलो, हलका पाऊसही पडत होता आणि कळयाही डोलत होत्या. मला खूप आनंद झाला, कारण माझा अंदाज चुकला होता. त्या कळयांना अजूनही धैर्य होते. मी कोणासही काहीच बोललो नाही दुसराही दिवस आणि रात्र तशीच वादळाची होती. साधारणतः तिसऱ्या दिवशी जुईच्या काळ्या फुलल्या, मी तर खुपच खुश होतो. माझा आनंद परिवाराला  सांगितला. 



नंतरचे दोन दिवस त्या कळ्या  सुंदर सुवासिक फुल झाल्या. समाधानाने हसत त्यांनी खूप सुगंध दिला व प्रसन्नता हि दिली. साधारण तिसऱ्या दिवशी, त्यांच्या पाकळ्यांतील गंध आणि सौन्दर्य कमी झाले. आणखीन २-३ दिवसांनी त्यांना धरणीने कुशीत घेतले, कळ्यांचे कठीण जीवन पुर्ण झाले. त्या कल्याणी माझ्या मनात घर केले होते, आणि त्या झाडाकडे पाहताना मला त्या कल्यानेहमी आठवायचा.  नवीन १- २ आठवडे काही नवीन कळ्या आल्या, त्यांचीच आठवण घेऊन तेव्हा मात्र वादळी पाऊस नव्हता. पण नंतर मात्र एकही कळी  नाही आली. त्या झाडाला खूपच कीड लागली होती, मी अनेक वेळा नवनवीन उपाय योजुनही लाभ नाही झाला. माझ्या मनात अजूनही त्या वादळी पावसातील त्या दोन कळ्यांचा गंध  होता. आणि त्या गंधापेक्षा जास्त त्यांचे परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि थोड्याश्या आयुष्यातही त्यांचे हसरे चित्र (ज्याने मला निर्वाणाचा नवा आयाम दाखविला) . 
 



नंतर कळत-नकळत तीन महिन्यानंतर माझ्या स्वतःच्या मनालाही खूप कीड लागली. मी  खूप उदास झालो, आसपासची आर्थिक  व सामाजिक परिस्थिती, कामगार-मजुरांचे हाल, खाजगी-सरकारी बंद होणाऱ्या नोकऱ्यांची बातमी; मी वास्तविक खूप व्यथित झालो. जणु काही उदासीन घटनांची मालिकाच समोर आली. माझा परीने  मी काही समाजाच्या घटकांना व सरकारला जरी अर्थसाहाय्य केले आणि जमेल तसे(अनियमित) ध्यान करत मंगल मैत्री हि दिली, तरी माझे मन खूप विषान्न व बैचेन झाले होते. वाटत होते कि मि  भारताचा  सुशिक्षित-सुस्थापित नागरिक म्हणून खूप कमी पडत आहे.  


मला एकुण भारतीय समाजाच्या विविध गरीब, दुर्लक्षित असहाय्य्य, असुक्षित व असंघटित वर्गाच्या भवितव्याने अस्वस्थ झालो. कुठेही काही अशी बातमी दिसत नव्हती कि ज्याने हा वर्ग स्वावलंबी बनेल किंवा त्यांची येणारी पिढीला किमान शिक्षण-आरोग्य-नोकरीच्या सेवा कशी मिळेल हे काही कळत नव्हतं. काही लोकां-मित्रांकडे मी बोलूनही दाखवले, पण ना उपाय मिळाला ना धैर्य  ना आशा!!  तिघांपैकी काहीतरी एक तरी मिळायला हवे होते. 


तेव्हा आदरणीय मेत्ताधम्मो भंतेजींशी बोलताना  मला स्वतःला आठवण आली ती ह्या  जुलै महिन्यातील दोन कळ्यांची!! मी त्यां कळ्यांची सगळी परिस्थिती आठवली. त्यातून मला धैर्य व आशा हि मिळाली जी ह्या समाजाच्या विविध गरीब, दुर्लक्षित असहाय्य्य, असुक्षित व असंघटित वर्गालाच नाही तर कुठल्याही  दुःखी -उदास मनाला प्रेरणा देईल; जशी मला मिळाली. 


काही कळालेली तत्वे आणि कळ्यांचे वास्तव (मानवाच्या समस्येवरील उपायांसाठी)  मी शब्दात मांडण्याचा प्रयत्न करीत आहे :
१. आता संकट जीवघेणे आहे आणि अपेक्षित काम होणार नाही असे जेव्हा वाटते, तेव्हा तसे  होईलच असे जरुरीचे नाही.त्या दोन जुईच्या कोमल कळ्यांनी वादळी पावसात मनाला नियंत्रित/प्रशांत करीत धैर्याचे व धाडसाचे दर्शन घडविले होते.  ( क्षांती   पारमिता ).  
२. जेव्हा असे वाटते कि, "हे मला शक्य होणार नाही, मीही कधी हि केलेले नाही. मला जमणारच नाही!", तेव्हा अपयशाशिवाय मला काही मिळुच शकत नाही असे म्हणणे चुकीचे आहे. त्या दोन नाजुक जुईच्या कळ्यांना  कसलाच  अनुभव नसतानाही वादळी पाऊस सहन केला होता, निसर्गाला/रोपट्याला अपेक्षित यश संपादन केले होते.  ( अधिष्ठान पारमिता )
३. आपल्यातील ताकत ही  तेवढीच असते जेवढी आपण ती आपल्या सत्कर्म व धैर्याद्वारे कमावतो. त्या दोन नाजुक जुईच्या कळ्यांनी आपल्या प्रगतीसाठी स्वतःची  क्षमता वाढवत(वीर्य पारमिता ) उन्हात राहून टाकत कमविली होती. तसेच रोपट्याचा उंच शेंड्याला जरी पोचले तरी, मातीतुन क्षार मिळवण्याचे कष्ट करणारी मुळे व स्वतःचे वजन पेलणाऱ्या स्वतःच्या पुर्वजांचे आभार व संलग्नता (नाते ) सोडले नाही (उपेक्षा पारमिता ). जरी त्या कळ्या खूप उंचीवर पोहोचल्या तरी, आपले समाजबांधव (पाने, खोड  व कधीही न दिसणारी मुळे) यांना आपल्या मिळकतीचा वाट (निष्क्रमण: बाहेर पडत उन्हात राहुन सूर्याकडून मिळालेली शक्ती) अखंडींतपणे पोहोचवली(मैत्री  व दान पारमिता ).   
४. नशिबाला न जुमानता आसपासच्या वाईट/विपरीत परिस्थितीतही तुम्ही दिव्य काम करू शकता. त्या दोन नाजुक जुईच्या कळ्यांनी हे दाखुवुन दिले कि जरी बहुतेक झाडाला जरी कीड लागली असली तरी, तुम्ही स्वतःला स्व-शुद्धी प्रक्रियेनुसार निरोगी ठेवून अशक्य असे काम करू शकता ( शील  पारमिता ).
५. परिस्थिती समोर हार मानण्यापुर्वी जो जो क्षण येईल, त्या त्या क्षणाला विचारपूर्वक व अनित्यबोध जागवत आहे तेवढे जीवन सुखी करू शकता. त्या दोन नाजुक जुईच्या कळ्यांना याची कल्पना नव्हती कि पाऊस त्यांना जगू देईल कि नाही, त्यांना फुलात येईल कि नाही, अजून किती वेळ कठीण काळ आहे कि नाही. त्यांनी याचे उदाहरण दिले कि, कुठलीही परिस्थिती कायम राहत नाही, बदलत असते. पाऊसही नेहमी(दर क्षणाला)  पडणार नाही. त्यांनी हे शिकले कि दर ५-१० सेकंदानंतरच पावसाच्या थेंबाचा तडाखा बसतो, तेवढ्यात मी आणखीन संयम व धैर्य कमविन. अनित्यबोध परिस्थितीद्वारे प्रत्येक क्षणी सजग राहत  समजुन घेईल( प्रज्ञा   पारमिता  तसेच आतापी - स्मृतिमान-संप्रज्ञानी  हा बुद्धांचा निर्वाणप्राप्तीचा  फॉर्मुला!!).
६. जर माझ्या कुटुंबाला/समाजाला कीड लागलेली असताना, मी माझ्याद्वारे माझ्या रोपट्याची/समाजाची उपयोगिता जसे सुवास/प्रसन्नता/चारित्र्य दाखवु शकलो  तरच माझे  रोपट्याचे/समाजाच्या प्रति कर्तव्य/ऋण  फेडु शकेन.  त्या दोन नाजुक जुईच्या कळ्यांना याची कल्पना होती कि, जर रोपट्याला कीड लागली व त्याला आता पूर्वीसारखी फुले येत नाही तर अशा रोपट्याचे जीवन संकटात येते. त्यामुळे त्याने रोपट्याची गुणवत्ता/उपयोगिता सिद्ध करण्यासाठी व आपल्या इतर समाजबांधवांवरील(पाने, खोड  व कधीही न दिसणारी मुळे)  संकट टाळण्यासाठी वादळाशी दोन हात करत  रोपट्याची गुणवत्ता/उपयोगिता सिद्ध करीत जमेल तेवढे करून दाखविले. रोपट्याची गुणवत्ता खरी ठरविली ( प्रज्ञा, दान, करुणा, वीर्य, अधिष्ठान, सत्य, निष्क्रमण  पारमिता )

७. जरी आज यश दिसले व सुबत्ता, सौन्दर्य व यौवन असले, तरी आपल्या यशातील वाटेकरी इतर समाजबांधव (पाने, खोड  व कधीही न दिसणारी मुळे)  यांना विसरून अभिमानाने आंधळे होऊ नये. कारण जसा पाऊस अनित्य होता, तसे सोंदर्य-यौवनही अनित्य/नश्वर/क्षणभंगुर आहे. विनम्रता व समाधानाच आनंद चेहऱ्यावर नेहमी ठेवावा.  त्या दोन नाजुक जुईच्या कळ्यांचे आयुष्य २-३ दिवसांचे मर्यादित होते. पण विनम्रता, कृतज्ञता, निरागसता (एकूणच मनाची शुद्धता)  व समाधानाच्या आनंदाचा गोडवा त्यांच्या  चेहऱ्यावर नेहमी आपोआप(प्रकृतीद्वारे) राहिला . फुल बनल्यावर तिसऱ्या दिवशी कोमलता, सौदर्य व सुवासिकता हळू -हळू सोडून गेली. पण ना हिरमोड झाला, ना वैषम्य आले आणि ना वैफल्यग्रस्तपणा  आला. मातीच्या कुशीत झोपताना, खूप सुख-खूप समाधान-खूप सफलता मिळाली. ती मृत्यु च्या वेळी त्यालाच मिळते ज्याला निर्वाण प्राप्त होते.  

८. जरी जीवन संपले तरी, सद्गुणी, मेहेनती, परोपकारी जीवन अनेकांना सध्दर्माची व उंच्चतम गुणवत्तेची(मानवी मूल्यांची)  प्रेरणा देते. त्या दोन नाजुक जुईच्या कळ्यांचे आयुष्य संपले व ४-५ दिवसानंतर नवीन एकही कळी आलेली नाही. पण त्या दोन मुलींनी/कळ्यांनी मला आजही प्रेरणा दिली(करोना नंतरच्या आर्थिक/सामाजिक स्थितीशी झुंजण्याची  व त्या सुवासिक जुईच्या रोपंटच्या गुणवत्तेची हमी/खात्री दिली( करुणा  पारमिता  . ती खात्री/विश्वास एवढा आहे, कि आज ४ महिन्यानंतरही एकहि कळी आलेली नसतानाही मी त्या झाडाला वाऱ्यावर सोडले नाही. नेहमी काळजी घेत आहे. ही आशा व विश्वास आहे, कि त्या दोन नाजूक जुईच्या कळ्यांसारखी झुंजार, लढाऊ, परिवाराशी संलग्न राहून काळजी घेणारी, सद्गुणी, चारित्र्यवान व सुंदर फुले येतील. भले आज नाही तर उद्या अवश्य येतील. कारण ते रोपटे अजून जीवंत  आहे, त्याची हिरवी पाने, निब्बर/(जे दिसायला सुंदर नाही)  खोड  व जमिनीखालील मुळे (जी फुलांसारखी सुंदर नाहीत) अजून मेहनत करीत आहेत, व आशावादी आहेत. एक दिवस प्रकृती/निसर्ग साथ देईन. ती किंवा त्याच्यासारखी धैर्यवान, सुवासिक अशी गुणवत्ता असलेली फुले येतील. 
८. जमेल तेवढे, जमेल तसे आणि जमेल तेव्हा धैर्यपुर्वक, निस्वार्थ  आणि सुयोग्य कामे करीत राहा.  कोण जाणे तुमचे  आशावादी, निर्दोष  आणि  निरोगी जीवन इतरांना जगण्याची नवी दिशा देईन. त्या दोन नाजुक जुईच्या कळ्यांचे आयुष्य संपले जे आशावादी, निर्दोष  आणि  निरोगी जीवन होते. त्या जीवनाने इतर कळ्यांना नवी उमेद दिली. मलाही शिकविले कि , कण्हत /कुढत/नाराज होत जगण्यापेक्षा काय करता येईल तेवढे पहा आणि करा. आपण वादळ किंवा पाऊस रोखु शकत नाही, पण आपल्याकडे असणारी सुविद्या, जिद्द, आशावाद आणि निर्दोष जीवन जगुन जीवनात 

त्या दोन नाजूक पण "कल्याणी" कळ्यांनी मला प्रचुर प्रेरणा व आशा  दिली. त्या दोन कळ्यांची जीवनकहाणी पाहता आसपासची आर्थिक  व सामाजिक परिस्थिती, कामगार-मजुरांचे हाल, खाजगी-सरकारी बंद होणाऱ्या नोकऱ्यांची बातमी अशा अनेक समस्यांवर सध्दर्माच्या मार्गदर्शनाने ( दहा   पारमिता  किंवा एकूण ३७ बोधिपक्षीय धर्म ) गोरगरीब-शोषित-(पुढारी नसल्याने ) अनाथ समाजघटक पुन्हा आशा  व धैर्य वाढवीत त्यांचे व त्यांच्या पुढील पिढीचे जीवन सुखी-शांतीपूर्ण-समाधानी करू शकतील. 

अनेक वादळे-संकटे-कीड येवोत, जोपर्यंत अशी फुले/कळ्या छोट्याश्या जीवनातही सहजता व सफलता दाखवतील, ते बळ देतील इतर कळ्यांना (सुस्थापित वर्ग ) समाजबांधवांना (  (पाने, खोड  व कधीही न दिसणारी मुळे म्हणजे  अप्रगत/विस्थापित  सामाजिक वर्ग ) !! )  विजय होवो त्या धैर्याचा, संयमाचा, समाजाच्या प्रति कृतज्ञतेचा, परहितबुद्धीचा व आंतरिक शुद्धीचा !! हाच आहे आशेचा किरण, कठीण दिवसात. 

भले होवो  त्या कळ्यांचे व त्याच्या स्वहीतबुद्धीचे तसेच परहितबुद्धीचे !!

संबोधन धम्मपथी 
मोबाईल: ९७७३१००८८६





 






Sunday, 30 August 2020

बुद्ध प्रमुख संघातील धुतांगधारी मध्ये अग्र महाकाश्यप



महाश्रावक अग्र धुतांगधारी (नितांत परिशुद्धी साठी सन्याशाचे व निर्वाणाचे तंतोतंत व कडक नियम पाळणारे) महाकाश्यप 

धुतांग : आपल्या प्रतिपक्षातील/दुष्मनातील सर्वाना धुणे/आघात करणे तसेच प्रतिपत्ति चे अंग असल्याने धुत + अंग  = धुतांग 


महाकाश्यपांना का स्मरावे :
१. एकमेव भिक्षु ज्यांचे चीवर तथागतांनी घेतले व त्याला आपले चीवर दिले 
२. भगवंतानी ज्यांना ध्यान-अभिज्ञा साठी स्वतःच्या क्षमतेचे घोषित केले 
३. ज्यांनी दूरदर्शिता ठेवत पहिली संगायन भरावयाची ठरविली, व सद्धम्म आपल्यापर्यंत सुरक्षित ठेवण्याची पद्धत (संगायन) राबविली
४. ज्यांच्या आल्यानंतरच भगवंताची चिता आपोआप पेटली 
५. सर्व विनयपिटकातील नियमांचे तंतोतंत आणि गंभीरतेने पालन करणारे 
६. भोजनदानाचे निमंत्रण कधीही न स्वीकारणारे (फक्त भिक्षे साठी याचना करत जगणारे)


७. जंगलात, डोंगरदरीत  व स्मशानात राहणारे 
८. अशा सात व्यक्तींपैकी एक ज्यांच्यासाठी भगवंतांनी ३-३. किलोमीटर ची तुरित चारिका (त्वरित ऋद्धी वापरून दर्शन दिले )
९. असा एकमेव भिक्षु ज्याने कुष्ठरोग्याने दान देताना सडलेले बोट भिक्षापात्रात पडले तर ते, दिलेले दान सन्मानाने स्वीकारावे अशा नियमाचे तंतोतंत पालन करत खाल्ले



(फोटो फक्त मेहनतीची कल्पना यावीम्हणून आहे )



जे भिक्षु खालील नियमांचे नियमित पालन करतात ते धुतांगधारी (परिशुद्ध स्थिती ) बनतात (संदर्भ: विशुद्धीमग्ग ४४३)

१. फाटक्या कपड्यांचे चीवरओढतात. 
२. फक्त तिचं चीवर धारण करतात 
३. फक्त भिक्षान्नच घेतात, (घरी जेवायला जात नाही )
४. एका घरातून दुसऱ्याघराकडे भिक्षा घेतात. कोणत्याही घराला वगळत नाही. 
५. दिवसातून एकदाच जेवतात 
६. जेवढे जेवण भिक्षापात्रात येते तेवढेच जेवतात, पुन्हा घेत नाहीत किंवा मागत हि नाही. 
७. एकदा का भिजणं झाले कि पुन्हा भोजन घेत नाही 
८. निर्मनुष्य जंगलात (एकांतवासात) राहतात . 
९. झाडाखाली राहतात, एखाद्या झोपडी किंवा विहारात नाही. 
१०. मोकळ्या आकाशाखाली राहतात. 
११. श्मशानात राहतात 
१२. जे जसे भेटेल त्या विना तक्रार करता समाधानाने जागी राहतात. 
१३. शय्येला त्यागून फक्त बसून राहतात. 



हे सर्व सद्गुण व त्याग कशासाठी आहेत ?
हे आहेत अल्प ईच्छा, संतुष्ठी ठेवत तसेच जे काही दान मिळाले ते देणाऱ्याबाबत कृतज्ञतेची भावना ठेवत माणूस परमसुख व अंतिम सत्यपर्यंत पोहोचू शकतो हे त्यावेळच्या व भविष्यातील संघाला (भिक्षु-भिक्षुणी व उपासक-उपासिका) यांच्यापर्यंत बुद्धाचे नियम व शिक्षा पोहोचवावी यासाठी महाकाश्यप खुप सतर्क व प्रयत्नशील होते.



निर्वाणासाठी महत्वाचे मार्गदर्शन (थोडक्यात):
१. भिक्षु ने (साधकाने) एकांतवासी असावे. नाहीतर मन भटकण्यासाठी चारी बाजूने आलंबने मिळतील. मग एकाग्रता, समाधी दुर्लभ होईल, नंतर खूप दुःख होईल. 
२. संग्रह करण्याची प्रवृत्ती दुःख, व्याकुळता आणि विकारांचे संवर्धन करील. भोग-विकासाच्या ठिकाणी (मॉल्स, सिनेमा, नाटकगृहे, हॉटेलं, बाजारहाट)  हि जाऊ नका. परम सुख निर्वाणाला असे करणे बाधक होईल. 
३. स्वतःचा सत्कार-पूजन करवून घेण्याच्या वृत्तीपासून दूर राहा. ते केल्याने मी-माझे असा प्रपंच वाढत जातो. 
४. चीवर, जेवण व निवासाबाबत कुठलीही निवड किंवा  ईच्छा दाखवू नका.
५.सर्व प्रकारच्या वाद्य-संगीताच्या आकर्षणापासुन अलिप्त राहत स्वतःला सम्यक विपश्यनेत प्रतिष्ठापित करा.
६.भिक्षु(साधक) सदा अडोल(सुखू-दुःख, यश-अपयश, फायदा-तोटा, निंदा-स्तुती ने न विचलित होता) मनाने समतावान व प्रज्ञावान आणून राहावे.
७. काही प्रश्न अव्याकृत आहेत व ते तसेच ठेवावे. कारण ते परमार्थासाठी नाहीत, ब्रह्मचर्या(सद्धर्म धारण)साठी नाहीत, निर्वेदासाठी नाहीत, विरागासाठी नाहीत, निराधासाठी नाहीत, शांतीसाठी नाहीत, ज्ञानासाठी नाहीत, संबोधीसाठी नाहीत, आणि निर्वाणासाठी हि नाहीत. (अव्याकृत प्रश्न जसे: का जीव मृत्यु नंतर राहतो का? व्याकृत प्रश्न जसे : दुःख म्हणजे काय, ते कसे होते व कसे दूर करावे?)



महाकाश्यपांचा शेवटच्या जन्मातील इतर महत्वाच्या घटना :
१. महातीर्थ गाव (मगध राष्ट्र ) कपिल नावाच्या ब्राह्मणाच्या घरी जन्म
२. ८७ करोड संपत्ती, १४ गावे , यंत्र लावलेले ६० तलाव, ६०० किमी पसरलेल्या व्यापाराचा मालक 
३. लग्नासाठी अजिबात तयार नाही 
४. काल्पनिक पद्धतीने पण असंभव अशी सुंदर स्रीची सोन्याची मुर्ती बनवून, जर अशी स्त्री मिळाली  तरच विवाह 
५. भद्दा कपिलानी अशी स्री भेटली व मर्जी नसताना लग्न करावे लागले 
६. प्रासंगिक पुण्य स्मृती झाली व पती पत्नी ने गृहत्याग केला 
७. भगवंतानी चिवरचे आदान-प्रदान केले. 
८. चोर बनलेल्या शिष्याला जुने कर्मस्थान देऊन धैर्य दिले. तिथेच त्या शिष्याला  अर्हतपद मिळाले. 
९. सारीपुत्तांना दोन वेळा प्रश्नांना उत्तर दिले. 


संदर्भ: महाकस्सप, भगवान बुद्ध के महाश्रावक (विपश्यना विशोधन विन्यास)


Sunday, 5 July 2020

उपोसथ परंपरेचा इतिहास व महत्व

वाचकहो,  बुद्धानुयायी लोकांमध्ये उपोसथ या परंपरेचे खूप आहे. चला, आज उपोसथबद्दल काही माहिती पाहूया !!
खात्रीलायक माहितीसाठी संदर्भ हे लेखाखाली दिलेले आहेत.  

उपोसथाचा इतिहास : 
पोसथ या शब्दाशी मिळताजुळता अथवा जोडलेला शब्द आहे, उपोसथ . पोसथ या शब्दाचा अर्थ आहे, उपवास करणे -उपाशी राहणे!! पण बुद्धवाणीत  उपोसथ या शब्दाचा अर्थ आहे, 'मुळ/गर्भित  अर्थाचे स्पष्टीकरण करणे".  कोणाद्वारे?   स्थानीय भिक्षूंची निर्वाणप्राप्तीच्या नियमांविषयी छोटी परिषदे द्वारे !

ह्या प्रथेचे दोन प्रमुख उद्देश्य आहेत, 
१. बुद्धांच्या संघातील भिक्षुंचे संबंध स्नेहाचे व मजबूत व्हावे (संदर्भ १)
२. "दुषित मनाची विशुद्धी"(संदर्भ १,४)  !! बुद्धकालीन राजा बिंबिसार यांच्यामुळे ती प्रथा सुरु झाली (संदर्भ-१). तसेच मगरमाता विशाखेलाही भगवंतांनी उपोसथ चांगल्याप्रकारे समजावून सांगितलेला आहे. (संदर्भ-४).

साधारणतः दोन आठवड्यातून भिक्षुंच्या द्वारे भिक्षुंच्यासाठी सद्धर्माविषयी, विनय नियमांविषयी आणि प्रतिमोक्षाच्या (निर्वाणप्राप्तीच्या २२७ नियमांची संक्षिप्त आवृत्ती ) बाबतीत घेण्यात येणारी जाहीर स्थानीय सभा. जेणेकरून बुद्ध वाणी विषयी उजळणी तसेच शंकांचे निरसन करता येईल. (संदर्भ-१). उपोसथच्या अंमलबजावणीच्या परिषदेसाठी चार भिक्षु व परिशुद्धी(संदर्भ-३)च्या परिषदेसाठी किमान दोन भिक्षु वैयक्तिक रित्या उपस्थित राहणे आवश्यक होते. जर चार नसतील तर किमान दोन तरी असावेत. (संदर्भ-२)

त्यावेळी उपोसथ पूर्ण करण्यासाठी एक मर्यादित व ठराविक सीमा ठरवली जात असे. जसे जागेच्या सीमेसाठी एखादी टेकडी, लाकुडाची खूण-झाड, नदी अथवा वारुळ! अशा प्रतिकांद्वारे ओळखली जाणारी ठराविक जागा. जर तशी  प्रतीकानी ओळखता येणारी ठराविक जागा  नसेल तर त्याच गावात जिथे भिक्षु निवास करतात ती मर्यादित जागा ठरवली जायची. (संदर्भ-१)

भगवंतांनी उपोसथात काय सांगितलेले आहे :

त्रिपिटकातिल अंगुत्तर निकायात (०३.०७०) मुलोपोसथ (मुळ-उपोसथ) सुत्त आहे!! त्यात भगवंतांनी मिगारमाता  विशाखेला उपोसथ करण्याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले आहे. त्यात भगवंतांनी सांगितले कि उपोसथ किती प्रकारचे असतात व श्रेष्ठ उपोसथ त्यालाच  म्हणावे ज्याने, मनुष्याच्या मनातील अशुद्धता नष्ट होते व निर्वाणाच्या पथावर प्रगती होते.  त्यासाठी एक वेगळा लेख लिहिणार आहे. तोवर ह्या ठिकाणाचा इंग्लिश लेख वाचावा. 


आधुनिक काळातील उपोसथ :

योजना :
  • आजच्या काळात गृहस्थ व भिक्षु संघ दोघेही सद्धर्माबाबत जागरूक व सजग राहून मनातील विकार (आसक्ती-द्वेष-मोह जसे कामवासना, अहंकार, तिरस्कार, ईर्षा-मत्सर, भीती, चिंता पश्चाताप, बैचेनी ) दूर करण्यासाठी सामुहिक  ध्यान, वाचन व धम्म चर्चा करत मनःशुद्धी करतात. एकमेकांना धम्मात प्रवीण होण्यासाठी प्रेरणा देतात. 
  • उपोसथाचा दिवस हा  पौर्णिमा,अमावस्या, कृष्ण अष्टमी , शुक्ल अष्टमी या  दिवशी योग्य ठिकाणी भेटून धम्मात विकास करण्यासाठी साजरा करतात. कारण उपासक-उपासकांना कौटुंबिक कामामुळे धम्म व्यवस्थित व नियमित शिकण्यास कठीण जाते. कारण ते  भिक्षु -भिक्षुणी सारखे पूर्ण वेळ विपश्यना साधना किंवा धम्म अभ्यासात वेळ  देऊ शकत नाही.
  • त्यामळे आठवाड्यातील किमान एक तरी दिवस जो  पौर्णिमा,अमावस्या, कृष्ण अष्टमी , शुक्ल अष्टमी या  दिवशी येतो त्या दिवशी गंभीर साधना करावी,  भिक्षु -भिक्षुणी किंवा वरिष्ठ गुरु बंधू सोबत धम्म चर्चा करावी व एखाद्या  भिक्षु -भिक्षुणी सारखे आयुष्य जगावे अशी अपेक्षा आहे. 
  • काही जण तर अधिक काळ जवळच्या बुद्धविहारात धम्म ज्ञान/प्रवचन मिळवत व धम्म चर्चा करत पूर्ण करतात.  उपासक-उपासकां उपोसथाच्या दिवशी अधिक सजग व जागृत राहून पूर्ण दिवस धम्म अभ्यास करीत, धम्म प्रवचन ग्रहण करीत, धम्म चर्चा करत असतात, त्यांच्या क्षमतेनुसार. 
  • जर आसपास भिक्षु असल्यास, उपोसथाच्या दिवशी भिक्षुला भोजनदान दिल्याशिवाय उपासक /उपासिका भोजन करीत नाही . पूर्ण आठ शील त्या एका दिवस व रात्री साठी ग्रहण करण्याची शपथ घेतात
उपोसथाचे अपेक्षित परिणाम :
भिक्षु-भिक्षुणी सारखे  आयुष्य जगावे अशी अपेक्षा का आहे?
व्यक्ती आयुष्य  जगताना बऱ्याच वेळा आठ लोकधर्मांचा (सुख-दुःख, फायदा-तोटा, निंदा-स्तुती, यश-अपयश) विपरीत परिणाम होऊन दुखी होतो. ऐनवेळी परिस्थितीला सामोरे कसे जायचे याचे उत्तर नसल्याने स्वतः दुखी-बैचेन होतो व परिवारासह सर्व आप्त-स्वकीयांना दुःखी-बैचेन करून टाकतो. त्यामुळे मानवी मनाचा हा नित्य स्वभाव ओळखून त्यावर योग्य व स्थायी (पर्मनंट ) औषध शोधणे हे शहाण्या माणसाचे लक्षण आहे. 


जीवन हे तर १)अनित्य (नेहमी बदलते ), २) अनात्म (माझी मालकी असलेले (कर्म सोडून) काहीच नाही व ३)दुःख (जन्म- मृत्यू, प्रिय/ घटनेचा व्यक्तीचा वियोग , अप्रिय व्यक्ती/घटनेचा संयोग , आजारपण , गरिबी , अनिश्चितता, अनपेक्षित अपयश/तोटा/अपमान ) याने भरलेले असल्यमुळे धम्मा  शिवाय दुःखमुक्तीचा मार्ग नाही हे अनुभवाने शिकण्यासाठी भिक्षु-भिक्षुणी सारखे (म्हणजे सुखसोयींचा व नातलगांच्या अभाव असणारे पण मनाच्या  चंचलतेला/बेधुंदीला नियंत्रित करणारे) आयुष्य जगत असताना  मी पणा व इतर भ्रमातून मुक्ती मिळवणे अपेक्षित आहे. 


आदर्श व जबाबदार भिक्षु हे नेहमी अष्टशील पालन करणारे, ध्यानमार्गी  व एकासनी (दिवसातुन एक वेळच जेवणारे ) असे असतात. त्यामुळे साधारण उपासकाला नेहमीच्या पंचशीलांसोबत बाकीचे तीन शील (खाली दिल्याप्रमाणे)असे एकूण आठ शील धारण करावे लागतात. असे भिक्षु (अथवा धम्मप्रगत उपासक-उपसिका)   अध्यात्मिक/पारलौकिक शांतीचे उदाहरण बनून, अन्य उपासक-उपसिकांना धर्मात प्रवीण होऊन जीवनात सुखी होण्याची नवीन  ऊर्जा देतात


नवीन तीन शिलांचे फायदे :
१) एकदाच व दुपारी १२ च्या आत जेवींन (विकाल भोजना वेरमणी )  (एकाच वेळेला जेवल्याने आळस दूर होऊन उत्साही पद्धतीने ध्यान करता येते, व शरीर स्थूल होत नाही. जेवणात संयम बाळगणे शक्य होते. )
२) संगीत, नाच-गाणे, नाटक-कला (स्पर्धा-खेळ) पाहणे , सुगंधी द्रव्ये-पुष्पमाला, सौन्दर्य प्रसाधने, दागदागिने वापरणार नाही.  (जे शरीराचे अनित्यबोधी गुणधर्म लपवण्यासाठी व पैसा-पाणी-संपत्ती मिरवण्यासाठी वापरले जातात तसेच विषयवासना, अनैतिक संबंध व जीवनातील महत्वाच्या प्रश्नांपासून तात्पुरता विरंगुळा/मनोरंजन/कल्पनाविलास  मिळवण्यासाठी पाहिले जातात  )
३)  उंच शय्या/महाशय्या  (शयनासन ) वापरणार नाही. ( साधे जीवन जगण्याची प्रेरणा, ऐहिक सुखांच्या शिवाय पारलौकिक सुखाचा अनुभव, साधेपणातून मिळणारा अध्यात्मिक आनंद मिळवण्यासाठी उपयोग होतो)

तीन प्रकारचे उपोसथ:
उपोसथच्या ध्येयानुसार तथागतांनी तीन प्रकारचे उपोसथसांगितले आहेत. 
१) गोपालक उपोसथ: गोपालकाचे असे नियोजन असते आज गायी-गुरांनी अमुक चारा अमुक ठिकाणी खाल्ला आहे; उद्या तमुक ठिकाणी तमुक प्रकारचा चारा खायला देऊया . त्याच प्रकारे असे उपोसथ पाळणारे असतात आज माझा उपवास आहे व आज अमुक दिन आहे म्हणून, मी आज अमुक प्रकारचे भोजन करणार (व स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेणार )  

२) निर्ग्रंथ-जैन लोकांचा उपोसथ : (मी भाषांतर करणारा लेखक धम्मपथी,  जैन लोकांप्रती आदरासहित एका इंग्लिश वेबसाईट वरील मसुदा मांडत आहे) निर्ग्रंथ म्हणतात कि, "हे गृहस्थानो दंड देणे सोडा! चारही दिशेतील १०० वर्षे जगणाऱ्या व्यक्तींसाठी दयाबुद्धी व करुणा  दाखवा" पण त्यांची करुणा व दयाबुध्दी हि सर्वव्यापी/सर्वासाठी नसते. तसेच ते म्हणतात, "गृहस्थानो, अंगावरील  वस्त्रे सोडून द्या! आता बघा इथे असे काहीच नाही जे कोणाचे आहे व माझे असे काहीच नाही. (कारण मी सर्व  सोडलेले आहे, कपडे ही !)" तरीही मी  कोण, माझे पालक-नातेवाईक कोण, माझी पत्नी-मुले, माझे सेवक-दास अमुक असे सर्व ते लक्षात ठेवतात!! तसेच त्यांचे पालक, सेवक-दास  व नातेवाईकही असे त्यांच्याबद्दल लक्षात ठेवतात! अशा प्रकारे ते सत्याकडे  मन वळवण्याचा प्रयत्न करतात, पण ते भ्रमाकडे मन वळवितात. तसेच रात्री अशा वस्तूंचा उपभोग घेतात, जे त्यांना  दिलेले नसतात.  तथागत म्हणता, कि हा चोरीचा प्रकार आहे.

३) आर्य (महान) उपोसथ : जेव्हा लोक जीवन्मुक्त-अरिहंत संबुद्धाचे शब्द आठवून मन उल्हसित करतात व विकारांना ओळखतात तेव्हा ते मनाच्या शुद्धीबाबत प्रेरित होतात. पहिले अंग धर्माचे शील पालन करीत विविध  दुष्कर्माबाबत अधिक माहिती घेत दुष्कर्मांपासुन अलिप्त राहतात. दुसरे अंग धर्माचे, समाधि (कुशल चित्ताची एकाग्रता) ठेवीत मन शांत व सयंमी कारण्याची विद्या शिकतात. तिसरे अंग प्रज्ञा, जिच्यामध्ये अंतर्मनातील सर्व अकुशल विचारांना कारणीभूत असलेले संस्कार (म्हणजे दोन्ही दूषित विचारांचा शरीरावर परिणाम व दूषित विचार) टप्याटप्याने समूळ नष्ट करण्याची विपश्यना विद्या शिकतात. अशा प्रकारे धर्म चर्चा, धर्म नियमांची माहितीची उजळणी व सामूहिक विपश्यना साधना करीत चित्त निर्मळ करतात.  मनाच्या विशुद्धी बाबत योग्य, यशस्वी निष्कलंक  व अनेकांना लाभ देणारी टेक्नीक (आर्य अष्टांगिक मार्गा) चा वापर करून मन निरोगी ठेवतात, असा उपोसथ हा परिपूर्ण व कल्याणकारी असतो. त्याला आर्य उपोसथ अथवा ब्रह्म उपोसथ (ब्रह्म विहारी आचरणाचा) सुद्धा म्हणतात!!


भगवंतांनी तिसऱ्या प्रकारच्या उपोसथाला परिपूर्ण व सुयोग्य उपोसथ घोषित केले आहे. 

मंगल व्हावे!
- संबोधन धम्मपथी 

संदर्भ 
२. महावग्ग 
३. परिशुद्धी : गौतम बुद्धाच्या काळात शील पाळण्याबाबतच्या व कायदेशीर दंडप्रक्रियेबाबतची  परिशुद्धी हि एक अत्यंत महत्वाची सभा होती . प्रतिमोक्षाच्या नियमांचे उजळणी/पठाण करण्यापूर्वी प्रत्येक भिक्क्षुने जाहीर प्रतिज्ञा करणे गरजेचे होते कि, 'मी प्रतिमोक्षाच्या एकाची नियमाचे उल्लंघन केलेले नाही'. त्यानंतरच प्रतिमोक्षाच्या नियमांची उजळणी व्हायची. हे सर्व मात्र स्थानिक भिक्षूंच्या समोरच व्हायचे. 
४. मुलोपसथ सुत्त (मुळ-उपोसथ सुत्त, मिगारमता विशाखेला उपोसथाची पद्धत समजावून सांगितलेली आहे   ), अंगुत्तर निकाय (इंग्लिश आवृत्ती :  https://www.accesstoinsight.org/tipitaka/an/an03/an03.070.than.html)
५. उपोसथ सुत्त : इथे भिक्षूंना धम्म व विनयाची विशेषतः समजावून सांगितलेली आहे )  -https://www.accesstoinsight.org/tipitaka/kn/ud/ud.5.05.than.html
६. उपोसथवरील लेख व संदर्भ  https://www.accesstoinsight.org/ptf/dhamma/sila/uposatha.html