Sunday, 15 September 2019


प्रश्न: ब्रम्हलोकातून म्हणजे कोठुन?🤔🤔🤔

उत्तर:चांगला प्रश्न आहे . 

🌞ब्रह्मलोकाबद्दल माहिती घेण्याअगोदर पहिल्यांदा नियमकता व कर्म-परिणाम समजून घेऊया. तेव्हा ब्रह्मलोकाबद्दल माहिती देणे-घेणे सोपे जाईल.  बुद्ध वाणी (त्रिपिटकानुसार) नुसार, हा संपूर्ण संसार पाच नियामतांनी (सिस्टिम ने ) पुर्ण चालला आहे. कारण ईश्वर नाही, तो जर असता तर अन्याय, शोषण, गुन्हेगारी व अकाली मृत्यू , हे बाह्य संकटे व भीती, दोर्मनुष्यता (नफरत) , राग (जुना शब्द, त्याचा समानार्थी म्हणजे 'आसक्ती'), धुंदी,जीवनात बेहोशी, बेजाबदारी, खोटारडेपणा असे मानवी अवगुण/आंतरिक संकटे  आलीच नसती.  नाही का?

असो, महाकारुणिक तथागतांनी सर्वोच्च ज्ञान प्राप्त करून, शरीर-मनाच्या व बाह्य जगातील जवळपास सर्व मानवकल्याणाच्या गोष्टी शोधून काढल्या. त्यांनी सृष्टीतील पाच नियमता हि शोधून काढल्या. त्या खालील प्रमाणे :

१: ऋतु नियामता: हे सांगते कि, कसे सगळे ऋतू विशेष काळानंतरच व ठराविक महिन्यांचेच असतात. त्याचे विशेष परिणाम परिसरावर व प्राण्यावर होतात. अशा प्रश्नांची  ऊत्तरे कर्म नियमात स्पष्ट होतात.

२. धम्म नियामता:  हे सांगते कि, कसे विशेष व्यक्तीचा स्वभाव व त्यातील बदल, पुर्नजन्माचे नियम , निसर्गाचे ईतर नियम, शील-समाधि-प्रज्ञेचे नियम, निर्वाणाचे प्रक्रिया व टप्पे , चांगुलपणाचे फायदे व परिणाम, मनुष्य/राजा/संन्यासी/भिक्षु/पती-पत्नी/माता-पिता यांची यांची कर्तव्ये,  धम्म नियामतेत  स्पष्ट होते. 

३. कर्म नियामता: हे सांगते कि, किती प्रकारचे कर्म असतात, त्यांचे परिणाम कसे व केव्हा येतात, मन-वाचा-शरीराद्वारे कसे कर्म बनते, व  मागच्या अनेक जन्माचे कर्म ह्या जन्मात कसे परिणाम देते, साधारण बुद्धिमत्तेच्या पालकांकडे अत्यंत बुद्धिमान मुलं कशी जन्माला येतात, अकाली मृत्यु /शारीरिक-मानसिक अपंगता/गरिबी/ संपन्नता-विपन्नता/ पूर्ण-अपूर्ण नाती / आसपासचे वातावरण अशा प्रश्नांची  ऊत्तरे कर्म नियामतेत स्पष्ट होतात.

४. चित्त नियामता: चित्त-मन कसे काम करते, त्याचे किती विभाग आहेत, अंतर्मन व मन यातील संबंध व देवाणघेवाण, मनाचे विविध वेळेला विविध पण तात्पुरते स्वभाव कसे बनतात, मन किती प्रकारचे असते, येणाऱ्या घटनांचे पूर्वसंकेत, दुसऱ्याच्या मनातील पूर्ण बोध सिद्धी, दुरबोधी(भविष्यबोधी), मागील जन्माचे ज्ञान, सध्या इतर ठिकाणी काय चालू आहे याचे ज्ञान याचे स्पष्टीकरण होते. 

५. बीज नियामता: कसे विशेष काळातच झाड/माणूस/प्राण्याला विशेष प्रकारे फळ/फुल  येते, विशेष वेळेतच कसे पिकते, जसे पेरतो तसेच कसे येते? कसे त्या  एकच आंब्याच्या किती विशेष बियाणे कसे सगळी तीच विशेष लक्षणे घेऊन येते? कशी विविध फुल/फळ झाडे आसपासच्या माती,सूर्य, पर्यावरण,बीज, पाणी, ऊर्जा व कीटकांमुळे परिणाम भोगून जन्माला येतात  असे  बीज  नियमात स्पष्ट होते.  





🌞वरील सांगितल्याप्रमाणे, कर्म व चित्त नियामते नुसार। मनुष्य मृत्युच्यावेळी विशेष व प्रबळ ऊर्जेचा कर्म-संस्कार/बंधन त्याची पुढील जन्माची अधोगति किंवा उर्ध्वगति /प्रगती निश्चित होते। 

🌞बुद्ध वाणी (त्रिपिटकानुसार) नुसार, एकुण ३१ प्रकारचे विविध जगत /लोक/विश्व आहेत।  त्यातील फक्त मनुष्य जगतच आपण पाहु शकतो। इतर ३० लोक साधारण मनुष्य पाहू शकत नाही. ते पहाण्यासाठी अरिहंत (श्रावक बुद्ध / प्रत्येक बुद्ध /सम्यक संबुद्ध या तीनप्रकारांपैकी एक बनावे लागते). 


🌞कर्मानुसार जो पर्यंत निर्वाण मिळत नाही, तोपर्यंत आपल्याला ३१ पैकी कोणत्याही एका जगात/विश्वात/लोकात पुन्हा पुन्हा  जन्म घ्यावा लागतो (पहिले आर्य सत्य: जगात दुःख आहे. ) । कधी ह्या  जगात तर कधी त्या जगात..... हा नियम प्रतीत्यसमुत्पाद सिद्धांत म्हणुन  बुद्धवाणीत प्रसिद्ध आहे। 

🌞४ अरुप लोक,  १६ रुप  लोक,  ११ काम लोक।असे  एकुण ३१ जग/विश्व/लोक आहेत। 

🌞१६+११=२७ मध्ये एक मनुष्य लोक आहे। बाकीचे २६ देवलोक/ब्रह्म लोक आहेत। पण ते अमर नसतात। आयुष्य काही लाख वर्षे असते। पण त्यांना अल्प ज्ञानामुळे वाटते कि मी अमर / जीवनमुक्त झालो। 

🌞 संबोधी प्राप्त सिद्धार्थ गौतमांनी जेव्हा  असे ठरविले, कि धम्म हा अत्यंत वेगळा, फक्त ज्ञानी लोकांना समजणारा व सद्याच्या समाजाच्या मान्यतेनुसार भिन्न असल्याने मी धम्म  शिकविणार नाही; त्या वेळेस ह्या २६ लोकांतून एक देव 'बकब्रह्मा' त्यांना भेटण्यास आला, वाट्याने तथागतांना  केली कि , "आज पृथ्वीतलावर अनेक पुण्यवान माणसांनी जन्म घेतला असून, ते धम्म ग्रहण करण्यास पात्र आहेत. तरी तथागतांनी धम्म वाटण्यास सुरुवात करावी" अशी विनंती केली. त्यानंतर तथागतांनी बोधीदृष्टीने जगाकडे पाहत खात्री केली व धम्म वाटण्यास सुरुवात केली. तसेच अनेको मध्यरात्री अनेको देव तथागतांकडे धम्म शिकण्यास यायचे.

वरील दोन्ही किस्से, पूज्य बाबासाहेबांच्या 'बुद्ध व त्यांचा धम्म' या पवित्र ग्रंथात आलेले आहेत.


🌞 तरीही प्रयत्नांची पराकाष्ठा करणे सगळ्यांना जमत नाही.  सगळेच देव निर्वाणाच्या प्रक्रियेत नसल्याने,  हि देव जन्म घेतलेले प्राणी सुद्धा मनुष्यासारखे (काही लाख) वर्षे जगून पुन्हा कर्मानुसार ३१ लोकांपैकी कोणा एकात पुनर्जन्म निश्चितच घ्यावा लागतो। जरुरी नाही  त्यांना मनुष्य जन्मच मिळेल.

सम्यक बोधी प्राप्त झाल्यानंतर स्वतः भगवंतांनी मी अनेक वेळा विविध प्राण्यांचे जन्म घेतले होते, याचा दाखल तिपिटकातील 'उदान' ह्या ग्रंथात मिळतो. 


🌞अरहंत(बुद्धपद प्राप्त/तीनप्रकारांपैकी एक बुद्ध)  माणसे हे लोक देवलोक भ्रमण करत असतात। त्यां देवांना बुद्ध मार्गदर्शन करीत असतात। म्हणुन बुद्धवंदने मध्ये बुद्ध गुणांना स्मरताना 'लोकोत्तर' (सर्व लोक पार केलेला असा निर्वाणप्राप्त )शब्द येतो । निर्वाण मिळाल्याने ज्यांचा पुर्नजन्म कधीच होत नाही, असे जीवनमुक्त, अरिहंत !!

🌞पण जे देव, देवलोकात राहुन किंवा मनुष्य मनुष्यलोकात राहून धम्मप्रगती करीत नाही,  त्यांना काही लाख वर्षांनी साधारण मनुष्य, पक्षी, सरीसृप, जलचर किंवा प्रेतयोनी त्यांच्याच दुष्कर्ममानुसार  किंवा धुंदीत(प्रमाद)अधिकांश आयुष्य घालवल्यानंतर  पुर्नजन्म  घ्यावाच लागतो।

🌞असे देवांचे दिव्यलोकातुन/ब्रह्मलोकातुन व मनुष्य लोकांचे मनुष्यलोकातुन पतन /बाहेर पडणे होते। 😒

🌞म्हणुन मनुष्य जीवन अमोल व दुर्लभ मानतात।  कारण तिथे संवेदना द्वारे (विपश्यनेने)  निर्वाण शक्य आहे। 



🌞धर्मदोहे:
💐 मानव जीवन रतनसा,  किया व्यर्थ बरबाद। 
चर्चा कर ली धरम की,  चाख न पाया स्वाद।। 

💐शील-समाधि-ध्यान की, बही त्रिवेणी धार। 
डुबकी मारे सो तरे, हो भव सागर( दुखद पुर्नजन्म) पार।। 

आशा आहे प्रश्ना चे समाधान झाल असेल। 

मंगल हो।

🌞 संदर्भ :
1.The manuals of Dhammakaya,  VRI PUBLICATIONS 
2.The teachings of the Buddha, Author Mahasthavir Narada, Taiwan

संबोधन धम्मपथी
९७७३१००८८६

Saturday, 7 September 2019

पती-पत्नीतील दुराव्याची/घटस्फोटाची जबाबदारी व आत्मपरीक्षण


पती-पत्नीतील नात्यातील घटस्फोट एक महत्वाची पण अंतिम पायरी म्हणून पहिली जाते. तशी ती आहे सुद्धा. एकमेकांची जबाबदारी घेतलेली जोडपी एकमेकांपासून कायम स्वरूपी विभक्त होतात. विभक्त होताना बहुतेक वेळा नात्यातील अपयशाला, समाजातील अपमानाला व मुलांच्या अंधारमय भविष्याला  एकमेकांनाच जबाबदार ठरवतात. सर्व चूक तिची/त्याचीच आहे, मी मात्र चुकलो/चुकले नाही अशीच घोषणा दोन्ही पक्ष आत्मविश्वासाने किंवा अतिआत्मविश्वासाने करीत असतात.आणि त्याच्या/तिच्या पासून झालेली मुले हि मला नकोत अशीही अपप्रवृत्ती जोर धरते. 

आपल्या प्रिय मुलगा/मुलगी/ भाऊ/बहिणीच्या कुटुंबाची वाताहत होताना नातेवाईकांना हि बघवत नाही. लहान मुलांची काळजी वाटते. पण दोंघांमधील कुणाचे किती चुकले ? व कोणी कशी माघार घावी ? कोणाला काय समज द्यावी याची थोडीसेही यश तिच्या/त्याच्या सासरच्या किंवा माहेरच्या लोकांना मिळत नाही. बऱ्याच वेळा तो आणि त्याच्या घराचे तिच्या घरच्यांचा तसेच ती व तिच्या घराचे त्याच्या घरच्यांचा अपमानही करतात. कारण कळत-नकळत त्याच्या घरच्यांनी तिला (पुरुष प्रधानसंस्कृती चे समर्थक) किंवा तिच्या घरच्यांनी त्याला (आमची मुलगी काही कमी नाही असे मिरवणारे समर्थक) छळलेले असते. त्यात माझ्या जोडीदाराने मला साथ दिली नाही असा समज होतो. मूळ मुद्दा हा कि हा समज किती टक्के खरा व किती टक्के खोटा हे मोजायला अकाऊंटंट किंवा सी.ए. बाजारात मिळत नाही . तो हिशोब आपल्यालाच करावा लागतो. वास्तविक हा अनेक वर्षांचा हिशोब सरळ-सोपा नसून तो करताना प्रामाणिक व गंभीर आत्मपरीक्षण गरजेचे असते. 

खालील प्रश्नावली हि घटस्फोट इच्छुक व्यक्तींसाठी मी बनवलेली आहे. सरळ-सोपी वाटावी म्हणून पुरुष उमेदवारासाठी देत आहे. वास्तविक ती  नवरा-बायको दोघांनीही वाचून निर्णय घेण्यास मदत होऊ शकते. 
१. का मी एक पती म्हणून सुरुवाती पासून  जोडीदाराच्या इच्छा-आकांक्षांना नेहमी जास्तीतजास्त सन्मानाने पहिले व जास्तीतजास्त पूर्ण केले  ?
२. जेवढा सन्मान, स्नेह व काळजी तिने माझा व माझ्या घरच्यांचा केला, का मीही  तेवढाच तिचा व तिच्या घरच्यांचा केला ?
३. मी तिला एक सुशिक्षित व्यक्ती म्हणून वैयक्तिक विकास करण्याची संधी दिली ?
४. का माझ्या घरच्यांनी तिचे व माझे प्रेमाचे नाते दृढ व्हावे यासाठी प्रयत्न केले?
५. का मी पैशाबाबत /व्यवहारात पारदर्शकतेने तिच्याशि बोलायचो व तिला विश्वासात घेऊन निर्णय घ्यायचो ?
६. का मी तिला माझ्याशी दर दिवसात बोलायला पुरेसा वेळ दिला?
७. जेव्हा मी ती माझ्याशी काही संवाद साधायची तेव्हा मी तिचे व्यवस्थित ऐकून तिच्या समस्या समाधानपूर्वक व वेळेच्या आत सोडवायचो?
८. का मी तिच्याकडे मला मुल म्हणून मुलगाच पाहिजे किंवा मुलगीच पाहिजे, असा हट्ट केला ?
९. का मी नैतिक दृष्ट्या पूर्ण सज्जन  होतो?
१०. का मी तिला ह्या ना त्या कारणाने घराबाहेर नेहमीच्या जबाबदाऱ्या (दर महिन्यातून एकदातरी  ) टाळून बाहेर फिरायला न्यायचो?
११. का मी ती गर्भवती असताना तिची पुरेशी काळजी घेतली ?
१२. का मी मुलांची देखभाल व्यवस्थित केली ?
१३. जेवढा वेळ, विश्वास व स्नेह मी इतर नात्याला दिला, तेवढा मी तिला दिला का ?
१४. का आजारपणात मी तिची शारीरिक व मानसिक काळजी घेतली?
१५. का तिची दागिन्यांची किंवा बाहेर फिरायची हौस मी समाधानकारक पूर्ण केली ?
१६. तिच्याशी वाद झाल्यावर जेव्हा मला उमगले कि चूक माझीच होती , का मी तिची प्रामाणिकपणे क्षमा मागितली ?
१७. तिच्याशी वाद झाल्यावर जेव्हा तिला तिची चूक उमगली व तिने माफी मागितल्यावर का मी तिला न्यायानुसार माफ केले?
१८. का ती एक बायको म्हणून सरासरी बायकांपेक्षा जास्त प्रामाणिक,  जास्त   समजुतदार ,  जास्त सुशिक्षित ,  जास्त त्यागी ,  जास्त प्रेमळ,  जास्त  कर्तबगार ,  जास्त आत्मविश्वासू, स्वयंभू  व  जास्त स्नेहपूर्ण होती ?
१९. तिच्याशी वाद झाल्यावर का मी तिच्याशी लैंगिक व शारीरिक त्रास दिला ?
२०. का मी तिला मारहाण केली?
२१. मारहाण केल्यावर का तिने माझी तक्रार पोलिसांकडे ना करता मला २-३ वेळा तरी माफ केले ?
२२. का तिच्याविरुद्ध मी कधी खोटे किंवा बेछूट आरोप केले?
२३. का आम्हा  दोघांतील भांडणे  सोडवायला आलेल्यांना मी, नेहमी सन्मान दिला व माझ्यातील गुणदोष तपासले?
२४. जर तिचे चुकले असल्यास मी इतरांना तिच्याशी बोलून मार्ग काढण्यासाठी उपाय केले ?
२५. आमच्या दोघांच्या भांडणात मी नेहमी माझ्या मुलांच्या भवितव्याची जास्त पर्वा केली ?
२६. का मी माझ्या स्वभावात नेहेमी सुधारणा व्हावी असा माझा व्यक्तिमत्व विकास कला ?
२७ . वेगळे झाल्यावरही मी स्वतः किंवा इतरांकडून तिची माहिती मिळावीत तिची सुरक्षितता व तब्येतीची विचारपूस केली ?
२८ . मी शीघ्रकोपी नसल्याने माझे नातेवाईक माझे गुणदोष माझ्याशी मोकळेपणाने बोलतात ?
२९ . मी सर्व बाजूने पती म्हणून योग्य आहे व होतो  , अशी खात्री माझ्या नातेवाईकांनी मला अनेकवेळा दिली आहे ?
३० . आम्ही दोघे मॅरेज कौन्सेलर कडे जावे व पुन्हा एकत्र यावी, का असा मी अनेकवेळा प्रयत्न केला?
३१ . का मी माझ्या मुलांची जबाबदारी कधी झटकली नाही व  त्यांना जरी वेगळे असलो तरीही स्नेह व प्रेम दिले ?
३२ . का माझ्या कुटुंबापुढे माझा मानापमान मी नेहमी बाजूला ठेवला  ?
३३ . का तिच्या घराच्या-ऑफिसच्या नात्यांचा मी नेहमी सन्मानच केला ?
३४ . का तिच्यावर मी जेवढे आरोप केले त्यांना आधार व पुरावे होते व ते सर्व मान्य झाले?
३५ . का मी तिच्यावर केलेल्या आरोपांवर, तिची बाजू सर्वां समोर मांडण्यास मी तिला पुरेसा वेळ व संधी दिली ?
३६ . का मी तिच्यावर केलेले आरोप व पुरावे तिच्या-माझ्या सर्व नातेवाईकांनी कबुल /सर्वमान्य केले ?


असेच सर्व प्रश्न स्त्रीनेही स्वतःला विचारावे व तिच्या कुटुंबानेही. ह्याच प्रश्नांची तुमच्याबद्दल उत्तरे तुमच्या जवळच्या नातेवाईकांनीही समाधानकारक दिली तर तुम्ही व्यवस्थित वागलात, नाहीतर तुम्ही दोषारोपातून मुक्त नाही.

 व जेव्हा सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळतील तेव्हा समजावे कि मी माझ्या पतीची  /पत्नीची जबाबदारीची परिपूर्ण रित्या पार पडली. 

अन्यथा कर्म नियमात नुसार ह्याच जन्मात व पुढील जन्मात अपुरे किंवा असमाधानकारक कौटुंबिक सुख मिळेल. विभक्त झाल्यावर किंवा घटस्फोट घेतल्यावर मनात कुठल्याही प्रकारचे किल्मिष, पश्चाताप किंवा खेद राहणार नाही ? 

नाहीतर एखाद्याने असा निर्णय का घ्यावा ज्यासाठी मी स्वतः व माझे नातेवाईक हि मलाच आयुष्यभर दोष किंवा निंदानालस्ती करीत राहतील?



विपश्यनाचार्य गोयंका गुरुजी म्हणतात ;
१) परोपकारही पुण्य है, पर पीडन ही पाप ।
पुण्य करें तो सुख जगे , पाप करे भवताप ।।

२) जीतनं बुरा ना कर साके , दुष्मन-बैरी कोय| 
अधिक बुरा निज मन करे, जब मन मैला होय ।।

३) जितना भला ना कर सके , माँ-बाप सब कोय ।
अधिक भला निज मन करे, जब ये उजला होय ।।
 
हे ३६ प्रश्न दोघातील ३६ चा आकडा दुर करण्यास मदत करोत!!
सर्वांचे खूप मंगल हो, खूप कल्याण होवो. 

संबोधन धम्मपथी 
९७७३१००८८६

Saturday, 7 July 2018

बौद्ध भिक्क्षु कडून घेण्यात येणारा परित्राण पाठ व घेतला जाणारा पैसा :

बौद्ध भिक्क्षु कडून घेण्यात येणार परित्राण पाठ व घेतला जाणारा पैसा :

काहींनी बौद्ध भिक्षु व त्यांनी केलेली परित्राण-पाठ पूजेवरती आक्षेप घेतला आहे असे दिसले. व त्यास कर्मकांड व पैसे उकळण्याचे साधन हि म्हटलेले आहे. ह्या लेखकाने पैसे घेताना भिक्क्षुचे फोटो हि शेअर केले आहेत. त्यावर प्रश्न आला म्हणून माही माहिती देतो आहे. 

न पटल्यास जरूर कळवावे . 
 
परित्राण पाठाला बौद्ध साहित्यात काही संदर्भ आहे का?
हो आहे. परित्राण पाठ हा त्रिपिटकातील एकूण २९ (काहींच्या मते २४) गाथांचा संच आहे. (संदर्भ : नं १)  ह्या गाथा अधिकांश भगवान बुद्धांनी म्हटलेल्या आहेत. ह्या गाथा अंगुत्तर निकाय, संयुक्त निकाय, खुद्धकनिकाय  व जातक कथा ह्या महत्वाच्या त्रिपिटकातील ग्रंथातून घेतलेल्या आहेत. त्यामुळे त्याला ऐतिहासिक व (त्रिपिटक )साहित्यिक आधार नक्कीच आहे. 
तसेच ह्या सर्व गाथा विविध ऐतिहासिक घटनेद्वारे आपल्याला त्रिरत्नांमधील  उच्चतम मनुष्य सद्गुणांचे दर्शन घडवितात. ह्या गुणांद्वारे अनेक महाकठीण परिस्थिती कसे सामोरे जावे हे आठवण करून देतात. हि सारी कल्याणाकरी जीवन जगण्याचे उत्तम मार्गच आहेत. 

ह्या पाली भाषेत काहीच समजत नाही, यावर काय करता येईल?
ह्या २९ गाथेमागे एक किंवा अनेक बुद्धकालीन कथा आहेत. त्यांचा अभ्यास प्रत्येकाला (प्रत्येक भिखूला किंवा प्रत्येक उपासकाला)असणे लगभग मुश्किल आहे.  आणि एखादा व्यक्ती असा भेटला तरी ह्या धावत्या युगात एवढा वेळ उपासक देत नाही ब बहुधा वेळही नसतो . त्यामुळे फक्त गाथेचे पठण होऊन विधी पूर्ण केला जातो. त्यामुळे त्रिरत्नांचे सद्गुण श्रोत्यांपर्यंत पोहोचत नाही, व परित्राण पाठाचे मुळ उद्देश्य असफल होतो. वास्तविक भ. बुद्धांनी लोकांना सहज समजेल अशी भाषा वापरायला सांगितली होती. त्यावेळी पाली भाषा होती, आज उपासकाच्या भाषेमध्ये प्रत्येक गाथा भिक्षूंनी समजावून सांगितली तर खूप खूप कल्याण होईल. 

तो पर्यंत, अभ्यासू व जबाबदार उपासकाने/उपासिकेने स्वतः अभ्यास करावे व क्षमतेप्रमाणे आसपासच्या लोंकांचे प्रबोधन करावे.  

का परित्राण पाठ इतर धर्मियांप्रमाणे अंधविश्वास वाढवणारा धार्मिक विधी आहे? त्यांची कॉपी किंवा अनुकरण केले आहे?

नाही. नक्की कोणी कोणाचे अनुकरण किंवा कॉपी केले आहे हा मोठा संशोधनाचा विषय आहे. 

परंतु परित्राण पाठ हे मात्र कर्मकांड नक्कीच नाही. भगवंतांनी त्रिपिटकात कर्माद्वारे मनुष्याचे मृत्यूनंतर विविध ३४ विविध लोक (विविध जग) मध्ये पाठवणी होते. हि पाठवणी कर्म नियामता (कर्म-परिणाम डिपार्टमेंट) द्वारे होते. पण हे तुम्ही आम्ही कसे तपासू शकतो? खरेच नाही तपासू शकत, जोपर्यंत कमीतकमी आपण निर्वाण अवस्थेतील पहिले स्टेशन (स्रोतापन्न अवस्था ) मिळवीत नाही. यावर कोणाचा विश्वास सहज बसणार नाही  हे जरि मानले. तरी ते सत्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

उदाहरण नं १: आजही, आफ्रिकेच्या एका जंगलात तुम्ही मोबाईल वरील व्हिडियो कॉल  मोबाईल ना नेता समजावयाला जाल तर ती आदिवासी जमत तुम्हा-आम्हाला वेड्यात गिनती करेल. कारण  अशी  मोबाईल वमोबाईलवरील व्हिडियो कॉल  असण्यांची शक्यता त्यांनी कधी हि पाहिलेलीच नाही. त्यामुळे (पहिला व्यक्ती) मोबाईल व मोबाईलवरील व्हिडियो कॉल  असण्यांची शक्यता  समाजवणाराही खरे बोलतो (कारण ते त्याच्यासष्ठी प्रत्यक्ष अनुभवलेले सत्य आहे ), जंगलातील इतर लोकांनी (दुसरा प्रकारातील व्यक्ती)  मोबाईल पाहिलेला नाही, आणि तेही त्यांच्यासाठी सत्य आहे  (कारण ते त्याच्या साठी अनुभवातील सत्य आहे, व मोबाईल हि त्यांना कल्पना वाटते )   तिसऱ्या प्रकारचे व्यक्ती हि आहेत, ज्यांना पहिला प्रकारातील  व्यक्तीच्या अनेक वर्षाच्या शील- सदाचार, दीर्घकालीन सद्गुण, संयम  व  बुद्धिमत्ता  यावर पूर्ण खात्री आहे. म्हणून तिसऱ्या प्रकारची व्यक्ती पहिल्या प्रकारच्या व्यक्तीच्या बोलणे जरी काल्पनिक वाटले तरी ते झिडकारून देत नाही व त्यावर पूर्ण विश्वास हि ठेवीत नाही. 

उदाहरण नं २:  दुसऱ्या उदाहरणाने सांगतो. जर कोणी आपल्याला विचारले कि आकाशाचा रंग कोणता , तर आपण बोलू कि निळा आहे. पण जर कोणी सांगितले कि आकाशाला रंगच नाही, ते रंगहीन आहे. तर आपण त्याला वेडा ठरवू. पण ज्या व्यक्तीने पृथ्वीपासून दूर जाऊन आकाश पहिले तर, असे दिसेल कि वास्तविक आकाश रंगहीन आहे, कारण ती एक भव्य पोकळी आहे. पृथ्वीपासून दिसणारा निळा रंग हा पृथ्वीतील निळ्या पाण्यातुन परावर्तित झालेली सूर्यकिरणे आहेत. ज्यांच्यामुळे पृथ्वीवरील वायुकण निळ्या रंगात रंगले आहेत. हे आहे वास्तवातील विज्ञान, जे आपल्याला माहितीच नाही . पण जोपर्यंत आपल्याला योग्य ज्ञानदर्शन होत नाही तो पर्यंत आपण आपल्या ज्ञानमर्यादेतील सत्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. तरीही त्रिकालज्ञानी सर्वजीत भगवान बुद्धांनी मनुष्याला  ज्ञानमर्यादेच्या पलीकडील गोष्टींची कल्पना करण्यास कठोर मनाई केली आहे. परंतु, नाव-नवीन ज्ञानाच्या पायऱ्या चढायला सांगितल्या आहेत. शील- समाधी-प्रज्ञा द्वारे विपश्यनेत प्रगत होऊन ज्ञानाच्या मर्यादा वाढवता येतात. 

अश्या एकूण ३४  जगातील विविध रूप-अरुप ब्रह्मलोक व वाईट जगातील देव किंवा प्रेत प्रकारच्या व्यक्तींना बुद्ध व त्यांचे अरिहंत शिष्यानी पाहिलेले व शिकविलेले आहे. हे देवलोक मनुष्यातील त्रिरत्नांना शरण गेलेल्यांची रक्षा करतात. का करतात रक्षा? कारण जी माणसे शील-समाधी -प्रज्ञेचा अभ्यास करतात, म्हणजे वास्तविक धम्माचा(निसर्गाचा) अभ्यास व अनुकरण करतात, त्यांना धर्म/धम्म वेळोवेळी ह्या देवतांद्वारेच मदत करतो. हि पोकळ कल्पना वाटले साहजिक आहे, पण ह्याचा अनुभव आलेले अनेक धर्मवान विप्पसी साधक/साधिका ह्या अनुभवाचा दुजोरा देतात. 

तसेच विपश्यना आचार्य गोयन्काजींनी एक महत्वाची गोष्ठ सांगितली आहे. ते म्हणतात जेव्हा बुद्धकाळात एखादा साधक आजारी (मानसिक/शारीरिक आजारी) पडतो. दुर्बलतेमुळे स्वतः विपश्यना करीत स्वतःला प्रेरणा देऊ शकत नाही धैर्य देऊ शकत नाही. अशा वेळेस, वरिष्ठ/सिनियर विपशयी साधकाला बोलावून , त्याच्याकडून पांढरा कच्चा धागा सुरु करून आस पासचे लोकात तो फिरवीत आजारी व्यक्तींच्या ही हातातून फिरवितात व अशा स्थितीतच विपश्यना साधना करतात. वरिष्ठ/सिनियर विपशयी साधकासोबत साधना केल्याने आजारी माणसाला मंगल मैत्री मिळते व स्वविकासाची गुरुकिल्ली असलेली विपश्यना साधना करण्यास त्यास धैर्य व प्रेरणा मिळते. आपणास हि माहिती देणारे विपश्यनाचार्य गोयन्काजीं हे महासद्धम्मज्योतिध्वज व त्रिपिटकाचार्य हे (व असे जगभरातील अनेक) जागतिक पुरस्कार प्राप्त बुध्दवाणीचे महान आचार्य होऊन गेले आहेत. (संदर्भ २)

मग का सर्व भन्तेजींनी परित्राण पाठात घेतल्यावर आपली रक्षा होते?
जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा बाहेरील औषधे घेतो. तसेच जेव्हा आठ लोकधर्मा (सुख-दुःख, मान -अपमान, निंदा-स्तुती , यश-अपयश ) पासून बैचेन होतो, व मानसिक बळ हवे असते, तेव्हा दुसरी कडून बळ, प्रेरणा व आशावाद मिळवतो. तसेच बळ आपल्याला भन्तेजींच्या सहवासाने व बुद्धगुणांचे स्मरण केल्याने मिळते. 

केवढ्या प्रमाणात रक्षा  होते? 
जेवढ्या प्रमाणात आपण सत्कर्म केलेले आहे, दहा पारमितांचे अनुकरण केले आहे तेवढ्या प्रमाणात रक्षा  होते. पण आपण सत्कर्म करीत नाही,   दहा पारमितांचे अनुकरण केले नाही पण तरीही माझी रक्षा धर्माने किंवा भन्तेजींनी करावी, हि झाली अंधश्रद्धा!! पण माझ्या सद्गुणांचे फळ मिळेपर्यंत माझ्यातील संयम टिकून राहावा व वाढावा तसेच सद्गुणी लोंकाचे आशीर्वाद घेऊन मी आणखीन सद्गुण करीत लवकरात लवकर निर्वाण (शुद्धतेच्या) मार्गावर प्रगती करावी, हि झाली परित्राण पाठ घेण्याची बुद्धांच्या संघाची शिकवण. 

कारण श्रद्धा व अंधश्रद्धेतही तुमच्या मनात 'चमत्काराची अपेक्षा' आहे कि 'सदगुणाद्वारे ( व सदगुणी लोंकाच्या आशीर्वाद व प्रेरणेद्वारे)  निर्वाण (शुद्धतेच्या) मार्गावर चित्त निर्मळ करीत प्रगती करावी'    अशी अपेक्षा आहे. ह्या दोन अपेक्षाच आपल्याला अंधश्रद्धा किंवा श्रद्धे कडे नेतात . कारण मन हेच सर्व इंद्रियात प्रमुख आहे. 

म्हणजे सर्व भंतेजी ह्या  आशीर्वाद व प्रेरणेद्वारे  आपल्याला धैर्यवान बनवण्यास योग्य असतात?
असे नाही. एखाद्या भंतेजी कडे शील-समाधि-प्रज्ञे द्वारे विपश्यना करीत जेवढी  निर्वाण (शुद्धतेच्या) मार्गावर प्रगती केली (चित्त निर्मळ केले),  तेवढेच आपल्याला धैर्य व प्रेरणा देऊ शकतात. काहींनी जास्त प्रगती केलेली असू शकते तर काहींनी थोडी प्रगति केलेलीअसते.  

म्हणजे आपल्याला योग्य भन्तेजींची नेहमी गरज असते. हो ना?
हो  खरे  आहे . तसेच निर्वाण (शुद्धतेच्या) मार्गावर प्रगती हि महत्वाची आहे, मग तो व्यक्ती भंतेजी आहे कि उपासक आहे हे महत्वाचे नाही. जसे तहानलेल्याला शुद्ध भांड्यातील शुद्ध पाणी महत्वाचे आहे, ते भांडे सोन्याचे आहे कि मातीचे आहे, ते महत्वाचे नाही. 

भगवंतांनी भिक्षु संघ निर्माण करण्याचे मला हेच कारण समोर दिसते; मनुष्याला जिवंत उदाहरणाद्वारे असा विश्वास देता आला पाहिजे, कि मनुष्याकडे  जीवनातील अनित्य-अनात्म-दुःख यांना  धैर्य-समाधानाने सामोरे जात  निर्वाण (शुद्धतेच्या) मार्गावर प्रगती करता येते व  चित्त सदा दुःखमुक्त ठेवता  येते. हे संघाने स्वतःची  कशावरही मालकी नसताना प्रसन्नतेचे(दुःख मुक्तीचे)  उदाहरण बनून मनुष्य समाजास समजावून सांगावे. 

असे असताना भिक्षु पैसे का मागतात ?
माझ्या माफक अभ्यासावर पैसे मागणे किंवा स्वीकारणे बुद्धकालीन भिक्षु नियमात बसत नाही. पण आज भिक्षु खूप कमी असून, त्यांना सजग-कनवाळू-मदतनीस उपासक हि खूप कमी आहेत.  त्यामुळे औषधपाणी, जेवण व राहण्याची सोय होण्यासाठी आवश्यक तेवढे पैसे मागण्याशिवाय मला अजून तरी पर्याय दिसत नाही. तसेच काही भिक्षुनी जास्तीत-जास्त पैसे स्वीकारीत स्वतःचे विहार बनवून, मालकी स्थापन करीत विलासी जीवन जगतात असेही दिसून येते. पण त्यामुळे कोणीही सर्व भिक्षु संघाला दोष देणे व अमान्य करणे चुकीचे होईल . 

मग आपण भिक्षु ला किती पैसे द्यावेत?
बहुतेक भिक्षु स्वतःहून पैसे मागत नाहीत. पण आपण आपली आर्थिक स्थिती, भिक्षु हि शारीरिक अवस्थ-,येण्या-जाण्याचंही भाडे , जेवणाची व्यवस्था-फोन व इतर बिलाची व्यवस्था  कोण व कशी करते याचा चांगला अंदाज घेऊन भिक्षु ला आपण पुन्हा दान देऊ पर्यंत त्यांची अडचण होणार नाही ना,  तसेच ज्यादाच्या पैशामुळे कळत-नकळत अहंकार हि वाढणार नाही हे हि पाहावे.  

यावर काही निश्चित उपाय ?
यावर दिवंगत विपश्यना आचार्य गोयंकाजी म्हणाले होते (संदर्भ ३), जेव्हा  स्वतः उपासक अभ्यासू, विद्वान, प्रज्ञावान, परोपकारी व धर्यवान बनतील त्यानुसार त्यांच्याच कुटुंबातून गुणी, योग्य  व प्रामाणिक कुलपुत्र तयार होतील. व त्या कुलपत्रातून काही भिक्षु हि होतील. ह्या कामाला वेळ निश्चित लागेल पण जेवढे प्रज्ञावान विप्पसी साधक-साधिका तयार होतील, तेवढे हे काम लवकर होईल. पण जरूर होईल, असा विश्वास हि त्यांनी व्यक्त केला होता. तरीही हे खूप मह्त्वाचचे कि गोयन्काजींनी आजच्या सर्व भिक्षुंचा सदैव आदरच केला, त्यांनि भिक्षूला कधी पैसे दिल्याचंस ऐकिवात नाही, पण औषध-पाणी, चप्पल, भोजनदान, विपश्यना  केंद्रात कायम सुविधा, अंथरुण व पुस्तके हि दिली आहेत. व आपल्या सर्वांसमोर भिक्षु -उपासक संबंधाचे सर्वोत्तम उदाहरण ठेवले आहे

तसेच सध्या उपासकाने धम्मात  पुस्तकी (ग्रंथ वाचन) व प्रॅक्टिकल (विपश्यना साधने) चा अभ्यास करीत, भिक्षुंची काळजी व विपश्यना संवर्धनाची जबाबदारी  घ्यावी. 

आता शेवटी एक सांगतो, चिकित्सा करीत प्रश्न विचाराने ठीक आहे, चांगले आहे पण सत्य न समजता एखाद्यावर (किंवा संघटनेवर) आरोप करणे तेही फेसबुक सारख्या उघडउघड इलेकट्रोनिक मीडिया वर हे जरा आततायीपणाचे होते. कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आणणे शहाण्या माणसाला शोभत नाही. आपण बौद्ध कुटुंबाचा भाग आहोत हे विसरू नये, हि कळकळीची विनंती!!

धन्यवाद! मंगल होवो!

संदर्भ :
१. https://en.wikipedia.org/wiki/Paritta
२. विपश्यना रिसर्च इन्स्टिटयूट, न्युज लेटर 
३. विपश्यना आचार्य गोयंकाजी यांची भाषणे 


संबोधन धम्मपथी 
मोबा: ९७७३१००८८६

http://sambodhandr.blogspot.com/


Wednesday, 27 January 2016

दस पारमितायें

🌞१ : उपेक्षा (समता) पारमिता: अंदर व बाहर कि स्थितियों के अनित्य रुप को जानते हुये उनके प्रति ना आसक्ति व ना द्वेष जगाना।
सुख आये नीचे नही, दुख आये नही रोय||
दोनों मे समता रहें, उत्तम मंगल होय॥


🌞२: दान पारमिता: निस्वार्थ और औरों के कल्याण के लिये अपने उत्पन्न या संपत्ती का सम-विभाग करना। ये समझना कि ये संपत्ति तो मैने समाज से ही प्रप्त कि है, तो समाज के प्रति अपने कर्तव्य हेतु से दान करना। ये भी स्मरण रहे कि, दान तोलमखोल कर नही, अपनी उस समय कि क्षमता के अनुसार ही हो। एक बात ओर, दान का पुण्य तभी मिलता है, जब दान कर्ता का चित्त अहंकार रहित हो, और दान का पात्र व्यक्ति /संस्था वास्तव मे लोककल्याण के कामों मे रत हो।

🌞३: निष्क्रमण: लोककल्याण  के लिये गृहत्याग कर के अपने आप को अनिकेत, मलकियतरहित एवं मुक्त  अवस्था से परिचित करवाना। नह जीवन जो संन्यासी जीते है, प्रगति के लिये ध्यान करते हुये चित्त को जड़ों तक शुद्ध  करते है। पैसे व घर-महल के स्वामित्व के अहंकार से दुर करने के लिये दुसरो के दिये दान पर आधारित  भोजन  एवं आश्रम को अस्थायी  रुप मे (क्यो कि ये मै नही मेरा नही) स्वीकार  करते है। गृहस्थ  भी एसा करते है, भले ही थोडे से समय के लिये ही सही. जैसे १०.दिवसीय विपश्यना शिबीर साधक-साधिकाये किसी लाभान्वित साधक के मंगल दान द्वारा पुरा करते है।

🌞४: अधिष्ठान : दृढ़ संकल्प । अपने या किसी मित्र-पारिवारिक कों लाभ  या द्वेष हेतु नही। अपितु अपने वैयक्तिक एवं अपने सामाजिक कर्तव्य यों विरक्ति रुप से ( यानी यदि सफल हुआ तो भी समता व विफल हुआ तो भी समता) पुरा करने के लिये अपने आप को कटिबद्ध करना, मंगल  संकल्प पुर्ण करने कि प्रतिज्ञा करना, अडिग रहना।

🌞४: क्षांति पारमी: शुद्ध  धर्म का पालन करते हुये अपने आप (चित्त को) को आस पास कि कठीन-महाकठीन परिस्थितियों से व्याकुल न होने देना। आकुल-व्याकुल  बनानेवाले व्यक्ति-स्थिती-व्यवस्था को क्षमा करते हुये चित्त को आकुल-व्याकुल  न बनाना।

🌞५: प्रज्ञा पारमी: माने शरीर व चित्त कि मिलीजुली जीवनधारा ते अनित्य स्वभाव को देखना।  कैसे देखना? क्षण प्रतिक्षण रुप तथा मनविषयोंको के उत्पाद-व्यय व उसकी अनित्य कि अवधि को भी समझना। समझ कर स्वयं को समता मे बनाये रखना।
(सुधार हेतु आवश्यक सुचना ओंका स्वागत है)

६.🌞शील: शील तो धर्म (शील, समाधि, प्रज्ञा) का पहला प्रमुख  अंग है। उसे तीन रास्तो स्वच्छ रखा जाता है। देह कर्म, वाणी कर्म व विचारोंसे (मन कर्म ).
एसा कोइ कर्म जिससें अपनी तथा औरों कि शांती भंग हो, तो समझें कि शील भंग हुआ।
यदि कोई पुलिसवाला चोर को पकडता है। तो ये ना समझे कि चोर कि शांती भंग हुयी। औरों कि शांति  भंग कर के चोर ने जो स्वयं व्याकुलता कमाई है, उसे धर्मानुसार  दंड दे कर न्यायव्यवस्था ने तो समाज कि व चोर कि भी शांति  सुनिश्चित की है। तो इस प्रकार विचार परिपुर्ण हो।
समझें कि पिता ने पुत्र को परिक्षा के कारण डांटा। तो अगर पुत्र कि शांती नही बढी व विपरीत परिणाम से उसकी उद्धतता-क्रोध बढा तो समझे कि शील भंग हुआ। भले उद्देश्य कितना भी मंगल क्यो न हो, मन मे करुणा-उपेक्षा-मैत्री न हो तो उनके दुश्मन द्वेष-व्याकुलता-वैरभाव जगह ले लेते है। तो मन के रास्ते ये दुश्मन वाणी या शरीर के रास्ते प्रकट हो कर काम बिगाड़ देते है। तो शील पहले मन का टुटता है, पश्चात वाणी का व पश्चात शरीर का।
बुद्ध कहते है: मनो पुबंगमा धम्मपाल, मनोसेट्ठा मनोमया...



🌞सत्य: जो सत्य है उसे ही वाणी, लेख व आचारोंसे प्रकट करे। जैसे कोई आदमी अंधेपन का स्वांग करता हें तो नही असत्य लिखता या बोलता है यद्यपि आचार तो असत्य ही है। तो शील भंग ही हुआ ।
लेकिन फिर भी केवल सत्य ही कल्याणकारी नही होता। वह तभी कल्याणकारी होता है कि सुननेवाला औरसजिस के बारे मे बोल रहे हो उस का भी मंगल समायोजित है। यदि किसी चोर ने पुछा कि बताओ तुम्हारे मित्र की संपत्ति कहा छुपी हो, तो सत्य नही कहना चाहिये। सत्य तभी लाभदायक होगा जब उसमें  मंगलकामना निहित हो।


🌞 वीर्य : पुरातन भाषा में  इसका अर्थ है पुरुषार्थ माने तब तक कडी, प्रामाणिक, जागृति व विचारपुर्वक कष्ट करे। किस के लिये करें ? जो  ( मंगल ) अधिष्ठान (पारमिता ) किया है ना, उस के लिये।
दृढ़ संकल्प करना एक बात। कार्य को आरंभ करना दुसरी बात। परंतु कार्य को उत्साहपुर्वक संपन्न करना इसे कहते है वीर्य/पुरुषार्थ । जो पारमी पुरुष ही नही, स्त्रियों मे भी विकसित करने कि क्षमता होती है।


🌞. करुणा: सहानुभूति। के ये तो अपने मनसंस्कारोंके परिणामों से अज्ञ है। इनका आचरण तर्कसंगत, बुद्धिसंगत, कल्याणकारी, क्रोध, ईर्ष्या , वासना तथा भ्रम सेे भरा है।
नियती, निसर्ग तो उन्हे इसका दंड देगी ही। पर एसा ना हो रे!! अबोध है, अन्जान व भ्रमित है। प्रकृती करे एसा हो कि इन्हें दंड ना मिले। ये भाव सारे प्राणीमात्र (पक्षी, प्राणी-सरीसृप, जलचर, दृश्य-अदृश्य ) मन मे जागा ते समझो कि करुणा विकसित हुयी है।

१०🌞मैत्री : समस्त प्राणीयों के प्रति करुणा आने पर आगे कि पारमिता है। कि चलो कैसे इन्हे मै कुशल-अकुशल कर्मों के कारणों से, उनके (वर्तमान एवं भविष्य) के परिणामों से, उन्हे जडों सहित निर्मुक्त के लिये सद्धर्म सिखाऊ। चित्त विशोधिनी विपश्यना विद्या सिखाऊ(यदि मैं प्रमाणित विपश्यना  आचार्य हो तो ही) या ऊससे परिचित करवाऊ. तो वें सन्मार्ग पर चले सद्धर्म के सारे लाभोंसे  परिपुर्ण हो। सारे वर्तमान व भविष्य के भ्रम, दुर्गुणों व अकुशल कर्मोंसे सुदुर हो। इतना ही नही, भुतकाल के संस्कारोंसे भी समतापुर्वक मुक्त हो।
इसके लिये प्रयास करुंगा क्योकि मैत्री जागी है। अपने वैयक्तिक कामकाज व कारोबार को छोडकर (निष्क्रमण पारमिता ) थोडा ही सही अपनी क्षमता नुसार लोककल्याण करु!! ये यह मैत्री पारमिता

(सुधार हेतु सुचनाओं का स्वागत है।)
क्रमशः प्रत्येक पारमिता कि तीन उप-पारमिताये.अर्थात कुलमिलाके १०*३=३० पारमितायें।
शब्दांकन, लेखन: संबोधन धम्मपथी 

Thursday, 26 November 2015

जातिवाद का उपाय तथा एकसंघ भारत

जयभिम बंधुओ,

खुद्शहजी के लेख एवं विशय दॊनो उचित हि है. आरक्षण  लाभार्थी आरक्षण के लाभ  उपरांत अपनी अपने समाज के प्रति जिम्मेदारियों को आसानीसे दुर्लक्षित  कर देते है. परमपूज्य डॉ. बाबासाहेब का आरक्षण से उद्देश्य था  की, लाभार्थी अपने समाज को प्रगति सन्मुख करे, उन्हें प्रगति और अधोगति के कारणों से अवगत कराये. उनको उनके मानवी अधिकारोसे परिचित कराकर उन्हें प्रगतिपथ पर चलने के लिए एवं मानवी अधिकार पाने के लिए निरंतर प्रेरित करते रहे. इससे वे अपने जीवन को भलीभांति प्रगति की और ले जा सकेंगे।  तथा छुआछूत मिटाके विकासभिन्मुख समाज का निर्माण कर अपने भारत देश की भी सेवा करेंगे. क्योंकि सर्वअहितकारिणी चार्तुवर्णी व्यवस्था भारत को अनेको प्रकार से विकसाभिमुख होने से अनेको शतकों से  रोकती आ रही से.  परंतु आरक्षण से लाभान्वित पिछड़ा वर्ग अपने कर्तव्य  रहा है. ये एक समस्या है, पर अभी तक हम ने समस्या के जड तक नहीं पोहोंचे है। आरक्षण के लाभार्थी तो बुद्धिमान मनुष्य ही है. हमारी तरह उनका शरीर भी मन के हिसाब से ही चलता है.
तो समस्या तो मानसिक ही होगी।

 तुलना के तोर पर देखे कि, किसी व्यक्ती को बाजार से सामान लाना है. और बाजार में दो प्रमुख दुकाने है. एक पर तो भारी भीड़ उमड़ पड़ी है. पर दूसरी तो बिलकुल ही सुनसान है. तो साधारण मनुष्य तो पहिली वालीपे है जायेगा, भले भीड़ में अनेक कष्ट क्यों न उठाने पड़े. ठीक वैसे है, बुद्धिमान परंतु पथभ्रष्ट आरक्षण के लाभार्थी तथा वंचित दोनों की विचारसरणी समान है. भीड़ जहा वहा का सामान ताजा एवं किफायती ही होगा; क्योंकि अनेक लोग लाभ उठा रहे है ना !!. ये तो सामान्य मानवी स्वभाव है, क्योंकि मनुष्य तो सामाजिक प्राणि है, उसे समाज में रहना पसंद  है। उस में भी वो उसी समाज का चयन करेगा, जो शक्तिशाली हो और उसको सुरक्षा-सन्मान दे सके.

ठीक वैसे ही, पथभ्रष्ट-कृतघ्न लाभार्थी दलितों की स्थिति है. उन्हें जहा भीड़ दिखती है वहा दौड़ते है. और तो और इस ज़माने में कोन अपने आप को दलित-अछूत कहना या कहलवाना पसंद करेगा. जब की दलित शब्द द्योतक है अपमान, अशुभमुलक, गुलाम लायक, छू-अछूत लायक , उच्च-नीच भेदभाव का स्मरणरूप!!! अगर कोई  कहे की में दलित हुँ, निश्चित ही उसी क्षण से ही औरों की दॄष्टि में सन्मान खोने की संभावना अधिक है. इसके साथ दलितों के न्यूनगंड कारण तो उन्हें को फिर से गुलाम बनाना बड़ा सहज होता है.   शक्तिशाली समाज में तो जात छुपाने पर सन्मान भी तो मिलता है. कोन साहेब कहेगा की में दलित हु? साहब की तो छोडो, प्यून तक नहीं कहेगा की में दलित हु. क्योंकि की इससे सुरक्षितता एवं सन्मान नहीं मिलेगा. खास कर कि तब, जब की आज आधुनिक वर्ग में  भी आरक्षण एवं जातीयवाद के कारण उठाव हो कर दलितों पर अनेको आतंकी अत्याचार हो रहे हो।  पथभ्रष्ट दलित लाभार्थीयोंकि सोच जिनसे वो अपनी सही जाती/वर्ग,  उनका सही तारणहार, उनकी कर्तव्यवृत्ति छुपाये हुए है उसका कारण यही है, की जाती/तारणहार/कर्तव्यवृत्ति क उजागर करने पर लोग उन्हें निकम्मा,  समाज का बोझ,  सिर  उठाके चलनेवाला गुलाम समझेंगे। उनसे नौकरी-व्यवसाय में समानता-बढ़ोत्री  नहीं देंगे, न उन्हें किसी काम का लायक मानेंगे, उसे उस की मनपसंद ऊँचे जात की रुपसुन्दरी कन्या नहीं मिलेगी और अपने बहेना  विवाह  चिंता भी सतायेगी. और हो सकता है की सामाजिक बहिष्कार का भी सामना करना पड़ेगा. तो कैसे इस बहिष्कार एवं अपमानजनक  दुर्व्यवहार से बचे? तो सुरक्षितता के कारण जात छिपाते है और अपने सामाजिक कर्तव्यों  से मुख मोड़ लेते है .इसीलिए सुरक्षितता व सन्मान पाने के लिए अपने को दलित न कहना एवं दलित प्रगति अभियान से दूर रेहना भले ही कृतघ्नता है, पर इसके बिना उनके लिए कोई विकल्प उपलब्ध ही नहीं है!  क्योंकि गावों में दिनदहाड़े और शहरों में कूटनीति से अन्याय और अत्याचार बिखरे हुए दलितों पर हो है.

इसके बचाव एवं मनुष्य-समानता जागृति पर काम धीमी गति से हो रहा है. इसीलिए कृतज्ञ, प्रगतिशुर एवं इतिहास जाननेवाले दलित तो प्रगति और जातपात नष्ट करनेवाली व्यवस्था बनाने के लिए अन्य दलितोंकी (खास कर के पथभ्रष्ट दलित लाभार्थीयों की) मदत एवं जागृति चाहते है।  जो पूर्ण रूप से उचित भी है. पर ऊपर बताने वाले कारणों के कारण नहीं हो पा  रहा है. क्यों की जैसे ही दलित शब्द आता  है, व्यक्ति  असुरक्षितता (सामाजिक एवं आर्थिक जैसे नौकरी-व्यवसाय ) व अपमानजन्य बर्ताव से कमजोर बन जाता है. तो पथभ्रष्ट, जाट छुपानेवाले लाभार्थी दलित और प्रगतिशुर-कृतज्ञ दलित दोनों की स्थितियां भिन्न है. पर हमें तो उत्तर खोजना है की क्या करे जिससे दोनों ही बाबासाहब की अपेक्षा को पूरा करके समस्त समाज से ऊचनीच का विष को नष्ट करे.



तो सही उपाय क्या है, यह सोचना चाहिए. पर इस लिए अधिक मेहनत की जरूरत  नहीं है. परमपूज्य बाबासाहब ने तो इस परिपूर्ण तथा परिशुद्ध उपाय हमें पहले से ही दे चुके है. हमें दलित शब्द ही हमारे जीवन से निकालना होगा।  उदहारण स्वरूप, अंधेरा शब्द ये बताता है, की वह एक अनचाही स्थिति है, जो उजाले के आभाव से ही होती। उजाला प्रगति का स्वरूप है, अंधेरा नही. जब प्रत्येक जगह प्रकाश होगा, अंधेरा हि नही है, तो अंधेरा शब्द ही लोगो की स्मरण से मिट जाएगा.

ठीक वही भावना सवर्ण-अवर्ण(दलित) के बारे में है.  जैसे ही ये नकारार्थी/गुलामीदर्शक  शब्द प्रगति योजना से दूर होगा, लोगो का अपमान/प्रतारणा नहीं होगी, और सामाजिक सन्मान बढ़ेगा और असुरक्षितता दूर होगी, क्योंकि अब एक समाज प्रगति कर रहा है, दलित समाज नही. क्योंकि 'दलित समाज प्रगति कर रहा है, याने मेरा गुलाम प्रगति कर रहा है' ये भावना ही क्रोध को जन्म नहीं देगी. तो होगा यु की जिन जातीयवादी व्यक्तियोंसे हानि होने वाली थी, उनका अहंकार जगाने वाले कारण को हमने दूर कर दिया है. 'पिछड़ा समाज प्रगति कर रहा है.' तो पिछड़े वर्ग को हानि न होने की संभवतः अधिक होगी की, क्योंकि जिस शब्द से मल्कियत एवं गुलामी का संभव है, उस घृणास्पद एवं अहंकार जगानेवाले 'दलित' शब्द को हमने प्रगतियोजना के शब्दकोश से अपनी और से मिटा दिया है.

क्या होगा इस शब्द मिटाने से? आज की मनोविज्ञान के आधार पर आप जो सोचते हो, वैसे ही आपका बर्ताव, आचरण एवं समाज में प्रतिमा बनती रहती है. 'में एक दलित/अछूत हुँ, और में दलित/अछूतों की लिए काम करता हूँ.' तो इस वाक्य से मेने मान ही लिया है की में समाज की एक कमजोर कड़ी हू।  ये कमजोरी अपने आचरण, विचार, आपसी संबध एवं योजनाओं में सहज चली आती है. न्यूनगंड बनता रहता है. और कौन चाहेगा की इस दुनिया मे  में कमजोर बनु? कोई नहीं न, तो क्यों न मिटाये इसी अंधकार को? इस गुलामीदर्शक एवं अहंकारकारक शब्द को?

इस स्पष्टीकरण से दलित शब्द का प्रयोग कर के, हम स्वयं ही प्रगति से जुड़े हुए लोगो की प्रतारणा कर रहे है, अपमान कर रहे है. क्या ऐसा हो सकता है, पिछडे वर्ग एकजुट हो पर बिना दलित शब्द का प्रयोग किये? हो सकता है!!

ये हाल तो है अधिकांश लोगो का! समाज में ऐसे भी है, जो ये सोचते है की अगर मेने बाबासाहब के आरक्षण ला लाभ उठाने पर जो  हुआ है उसके बदले बाबासाहेब की लाभर्थियोंसे परोपकार की अपेक्षा है, उसे पूरा नहीं करूंगा  तो मेरा क्या  बिगड़ेगा? कौन  पकड़ेगा मुझे या कौन  दोष देगा? तो ऐसे लोगो की बीमारी को कोसने से गाली  देने से क्या दूर होगी? उन्हें आत्मज्ञान/आत्मपरीक्षण ही करना होगा न? तो उसके लिए प्रेम से अकुशल कुशल कर्मो के परिणामों  से अवगत करने की लिए आईना  दिखाना होगा।  मन का आईना, विपश्यना विद्या सीखकर दूसरों के प्रति अपने कर्तव्यों से अवगत व उत्साही बनाना होगा. 



बाबासाहब ने जीवन के अंतिम चरण में, दलित शब्द मिटाने की, मनुष्य को आत्मनिर्भर एवं विज्ञानंप्रेमी बनाने की एवं भारत को एकसंघ बनाने के लिए १४ अक्टूबर १९५६ में प्रगति योेजना की नीव रखी थी. मेरे विचार से इसी से ही सन्मान, स्फूर्ति, आत्मबल, सुरक्षितता, मनोविकार, एकता, विज्ञानप्रेम एवं दलित/अछूत शब्दों से मुक्ति मिलेगी. इसीसे आरक्षण लाभार्थी पुनः अपने प्रगतिशुर बंधुओ का भार ढाने में मदत कर पायेँगे.

इस यशस्वी संकल्पना पर पुर्नविचार हो ये सबको आवाहन है.


भवतु सब्ब मंगलं!

संबोधन धम्मपथी















Saturday, 5 September 2015

शोले चित्रपटातून शील वृध्दी

शोले चित्रपटातून शील वृध्दी 

मनुष्याच्या स्वभावावरती इतर बाह्य गोष्टीसोबत  चित्रपटांचा फार प्रभाव आहे. चित्रपट त्या त्या प्रेक्षकवर्गाच्या संस्कृती, चालीरीती, आचारविचार, व वेशभूषा खूप परिणाम करतात. त्यातला समाज मनावर खूप प्रभाव असलेला चित्रपटातून मी काय धम्म शिकलो, ते मांडत आहे. बुद्धाशिष्याने मनोरंजनाशीच काय कुठल्याही घटक/घटनेशी संपर्क आला कि स्मृतीमान राहुन त्यास्थितीची तुलना धर्माच्या विविध मुल्यांशी केली पाहिजे. अशाप्रकारे स्वता:तील असलेले गुण टिकवले व नवीन गुण मिळवले पाहिजे. तसेच स्वतःतील असलेले दुर्गुण ओळखून ते दूर करण्याचा व नसलेले दुर्गुण कधीही स्वभावात न येण्याचा निरंतर प्रयत्न केला पाहिजे. हाच तर सम्यक व्यायाम आहे.

ह्या चित्रपटात भलेबुरे पात्र आहेत. बोधिपथावर शीलपालन हे पहिले पाउल आहे; त्या नंतर समाधि व प्रज्ञा हि स्टेशने येतात. पण बऱ्याचदा गाडी  पहिल्या स्टेशनावरच फसते. तेव्हा शील पालनाचा धडा पुन्हा गिरवावा लागतो. 

शोलेच्या एका घटनेवरून शील पालनाचा काही संयम व युक्ती कमवुया. कथेतील पात्र जय-वीरु हे बेवारस व जगात कुणीच नातेवाइक नसलेले चोर व जीवाभावाचे मित्र असतात. वीरु जयकडे बसंतीसोबत लग्नाचा विचार मांडतो. त्यावर जय न कचरता (मुसावादा वेरमणी सिखापदं समादियामी - स्पष्ट बोलणे ) वीरुने आत्तापर्यंत अनेक मुलींसोबत लग्नाच्या आणाभाका घेतल्याची आठवण करून देतो. खऱ्या  मित्राने अशाच  प्रकारे संयमाने आपल्या मित्राचे दुर्गुण त्याला योग्य समयी व योग्य वेळी दाखवुन दिले पाहिजे. मैत्री टिकवण्यासाठी खोटे बोले नये व मित्रासाठी इतरांचे नुकसान करू नये. 

यावर वीरु जयला सध्याचा विचार गंभीर व अंतिम आहे असे सांगतो. असे आश्वासन देवून देखील जय त्याच्यासाठी लग्नाची बोलणी करण्यास नकार देतो. कारण जयला  वीरूचा स्वभाव माहिती असल्याने स्वताच्या मित्राची (आसक्ती/मोह/पुरुषसुलभ भावना किंवा प्रेम ) यांची तमा न बाळगता त्याच्याकडे चांगल्या वराकडे आवश्यक असणाऱ्या  गोष्टीची पाहणी करतो. ह्या पाहणीत त्याला असमाधानकारक उत्तर मिळते. तेव्हा तो वीरुला नकार देतो. आपल्याकडे हे असे होत नाही, कारण माझ्या मुलगा/मुलीला तिच्या/त्याच्या पेक्शा जास्त चांगला व लायक वर मिळावा  अशी आपली अपेक्षा असते. त्यासाठी स्वतःच्या मुलगा/मुलीचे  काही गुणही लपविले जातात; तसेच काही गुण वाढवून सांगितले जातात. का? कारण चांगले स्थळ हातातून जावू नये म्हणुन. तसेच स्पष्ट व्यक्त्या व खरे बोलणाऱ्या  माणसाला अशा प्रसंगी सोबतही नेत नाहीत उगाच गडबड नको म्हणुन. 

काही जण म्हणतात प्रेमात व युद्धात सर्व काही माफ असते; पण बुद्ध म्हणतात प्रेमात व युद्धातच माणसातील खरे सद्गुण व नैतिकतेची खरी परीक्षा असते. त्यामुळे अशावेळी जर तुम्ही शील पालन नाही केले तर समजावे कि तुमचे शील अजून खूप कच्चे आहे. त्यामुळे चोर असूनही आपल्या जगातील एकमेव सहकाऱ्यासाठी तो एका कर्तबगार व मेहनती मुलीच्या आयुष्याशी न खेळण्याचा योग्य निर्णय घेतो. येथे शीलाचा विजय होतो. पण वीरुनेही खूप आग्रह केल्यावर जयची  अडचण होते. कि याचे नाते घेवून जायचे तर तिच्या पालकाला (मावशीला) सांगायचे काय? याचे गाव कुठले? कुटुंब ? पगार? स्वभाव? घर? व्यसन? गुण? एकही तर बाजु सकारात्मक नाही. अशाच कात्रीत बऱ्याचदा पंचशीलाचे पालन करणारा सापडतो. त्यावर त्यास शील व बुद्धिमत्ता वापरुन परिस्थिती नेसर योग्य निर्णय घ्यावा लागतो. येथे जरी जय वास्तवात चोर असला तरीही, त्याने जेवढे जमेल तेव्हढे शील पालन केले आहे. कारण त्याला एका चांगल्या मुलीचे आयुष्य हि वाया घालवायचे नाही व स्वतःच्या प्रेमासक्त तसेच व्यसनी मित्राला चांगले गृहस्थ जीवन जगण्याच्या अधिकाराविषयीही बोलायचे आहे. 

अशा कठीण प्रसंगी समाधि आपल्याला मन एकाग्र करीत समस्या समजून घेण्यास मदत करते. व प्रज्ञा निर्णय घेतेवेळी दुर्गुणांना सद्गुणांवर विजय न मिळवायची क्षमता प्रदान करते. मी काही चुकीचे तर करीत नाही ना? मी मित्रा खातर किंवा स्वतःसाठी कोणाला फसवीत तर नाही ना? जयने समाधि  व प्रज्ञेचा  अभ्यास केलेला चित्रपटात दाखविलेला नाही. पण आपल्या जीवनात आसपास काही साधारण व्यक्ती ही समाधि  व प्रज्ञेचा  अभ्यास केलेला नसताना  उत्तम धैर्य व बुद्धिमत्ता दखवितात.जय मावशीकडे मित्राचा हात मागायला जातो. कदाचित मागील एखाद्या जन्मात (आत्म्याशिवाय पुर्नजन्म) समाधि  व प्रज्ञेचा  अभ्यास केलेला असण्याची शक्याता नाकारता येत नाही,  कारण तेव्हाच तर अशी संयमीनिर्णय घेण्याची क्षमता येते. आणि ज्यांनी विपश्यना करीत समाधि व प्रज्ञेचा अभ्यास व्यवस्थित केला त्यांना तर धैर्य उत्तमच साधता येते.

जय मावशीकडे मित्रासाठी बसंतीचा हात मागायला जातो. स्वाभाविकच त्या अनोळखी तरुणाशी मावशी चौकशी करते. धर्म चर्चेसाठी सविस्तर देत आहे. कुशल-मंगल विचारल्यावर पुढील संवाद असा:

मावशी: किती कमावतो मुलगा?
जय: आता काय बोलू मावशी, एकदा का बायको मुलांची जबाबदारी अंगावर पडली कि कमवायला ही लागेल.

(असे बोलून जयने  खऱ्याने सुरुवात केली. वीरूचा कामचुकार पणा सांगितला; पण सोबत वीरूच्या प्रेमळ मनाचीही खात्री दिली. )
मावशी: मग आता काहीच कमवित नाही?
जय : नाही. मीअसे कधी म्हणालो? पण काय करणार जुगार हा प्रकारच असा आहे, रोज रोज तर जिंकत नाही ना माणुस! कधी कधी हरतो सुद्धा.
(आता इथे जय जरी वीरूचे नाते घेवून आला असला तरी टप्प्याटप्प्याने वीरूच्या स्वभावातील गुण-दोष मावशीला झेपू शकेल एवढ्या शांत व सहज रीत्या सांगण्याचा प्रयत्न आहे. कारण मित्राचे घर व्हावे हे त्यालाही वाटत असणार.)

मावशी: हं… म्हणजे मुलगा जुगारी आहे?
जय : छे छे तो तर खुपच चांगला व गुणी मुलगा आहे. हो पण एकदा का दारु पिला तर चांगल्या वाईटाचे काही कळत नाही. (इथेही मनोरंजनाच्या एक सहज सामाजिक व मंगल संदेश मिळला आहे. कि दारु पिल्यावर त्यालाच काय कोणालाही काही कळत नाही) आता त्यांनंतर बसविले कोणी जुगार खेळायला तर त्यात बिचाऱ्या  वीरूचा काय दोष? (दोन वाईट गोष्टींचा संबंध बघा, जुगाराचा नाद हा  बेहोषीत असताना लागतो. दारु प्पिल्याने नशा येते. जसे थेंबे थेंबे पाणी साचते तसेच थोडेसे ही कुकर्म, नवीन कुकर्माला प्रोत्साहन देते, जन्म देते, बळ देते.  आता इथे जयने तोंडाने तर बाजु घेतली आहे, पण त्याचा उद्देश्य तर मावशीपासुन सत्य न लपविण्याचा आहे. मित्राची बाजु मांडणे  व त्याचवेळी एका होतकरु, कर्तबगार मुलीच्या आयुष्याशी  ही त्याला खेळायचे नाही आहे. अशा धर्म संकटात त्याने अशा प्रकारे चलाखीने सामना केला आहे. आपल्यालाही जीवनात अशा चलाखीने सामना करायला शिकायला हवे.)
मावशी : खरे बोलतो रे तू बाबा. दारुडा तो व जुगारी तो पण त्यात त्याचा काही दोष नाही.

(भ. बुद्ध म्हणतात, "अत्त ही अत्तनो  नाथो, अत्त हि अत्तनो गती" स्वताच्या दशेला व प्रगतीच्या (धार्मिक व व्य्यावहारिक) गतीला मनुष्य स्वतःच जबाबदार असतो. त्यांमुळे तुझ्या वर्तमानकाळाचा व भविष्यकाळाचा तूच विधाता आहेस. कारण कर्म (शारीरिक, मानसिक व वाचिक) तर कळत-नकळत किंवा मजबुरीने तूच करीत असतोस. तथागत हि कर्मे निर्दोष राहावीत  तुला  मार्गदर्शन नक्की करू शकतात. पण त्यावर चालावे तर तुलाच लागेल. जसे ज्याला तहान लागते, पाणीही त्यालाच प्यावे लागते. )

जय : मावशी तुम्ही माझ्या म्नित्राबद्दल गैरसमज करीत आहात. एकदा का त्याचे लग्न बसंतीशी झाले, तर हि जुगारीचि सवय तर दोन दिवसातच सुटून जाईल.
(हा महान व मोठा गैरसमज किंवा भाबडा आशावाद लग्न जुळवताना असतो. त्यामुळे मुलाची काही त्याज्य  दुर्लक्षित केली जातात. आणि त्या समज किंवा भाबडा आशावादाचा फटका आयुष्यभर त्या मुलीला भोगावा लागतो. कारण लग्न करताना जीवनसाथी किती निर्दोष, व्यवहारी व कर्तबगार आहे हे न बघता तो किती पैसेवाला, जात/धर्म वगैरे, किती गोरा/गोरी, किती शिकलेला, जमीन/बंगला किती? यावर जास्त लक्ष असते. ह्यात वडिलधाऱ्या  मंडळींचा अडाणीपणा, सदचराला कमी महत्व देण्याचा स्वभाव व अधार्मिकपणा असतो.)

मावशी: अरे बाळा, मला म्ह्तारीला सागतोस? ही दारु व जुगारीची सवय कधी सुटली आहे कोणाची आतापर्यंत?
(जग बघितलेली व भाबडा आशावाद न ठेवणारी माणसे चांगली जाणतात कि असे व्यसन लागले कि ते मरेपर्यंत माणसाच्या पिच्छा सोडत नाही. ते सोडण्यासाठी मनची खंबीरता व दृढनिश्चय खूप महत्वाचा. जो विपश्याने ने साजः मिळवता येतो.)

जय : मावशी तुम्ही जायला ओळखत नाही, विश्वास करा तो अशा प्रकारचा माणूस नाही. एकदा का लग्न झाले कि तो गाण्याऱ्या  स्त्री कडे जाणे सोडून देईल. मग दारु काय आपोआपच सुटेल!! (इथेही वाईट व्यसन एकमेकांवर अवलंबुन आहेत. एक लागलीकि दुसरी लागलीच म्हणुन समजा। शील पालनात कामेसु-मिच्छाचारालाही खूप महत्व आहे. शरीराने, बोलण्याने व विचारानेही मनुष्य व्यभिचार/परस्त्रीगमन करू शकतो. अशा स्थळी चावट -आचरट व वासनेने बरबटलेले लोक जात-येत असतात.)
मावशी : अरे देवा एवढेच काय ते बाकी होते? म्हणजे त्याचे गाणाऱ्या  स्त्री कडे ही येणेजाणे आहे तर?

जय: मग त्यात काय गैर आहे? अहो गाणे-ऐकायला मोठ-मोठ्या घराणातले खानदानी राजे-राजवाडेही जात असतात. खरे सांगतो!!

(नीतीमत्ता ही इतर राजे-महाराजांच्या वागण्यावरून कशी काय ठरवावी? ज्या-ज्या कर्मांनी शारीरिक-वाची-मानसिक सदाचार वाढतो ते-ते कुशल कर्म!! व ज्या-ज्या कर्मांनी माझ्यातले दुर्गुण वाढतात ते ते अकुशल कर्म!  त्यामुळे अत्त-दीप  भव: स्वतःच स्वतःचे द्वीप व्हा! जसे जीवन्याच्या महासागरात जशी अनेक वादळे येतात, तेव्हा एक द्वीप हवा असतो जहाजाला आसऱ्या साठी! तो द्वीप बाहेर कुठे शोधावा? आंतरिक शांतीच आपल्याला आपला द्वीप मिळवुन देईल )

मावशी: मग आता  एवढे ही समः कि कुठले असे घराणे आहे तुझ्या गुणवान  मित्राचे?

(घराणे हे पैसे व प्रोपर्टी साठी न पाहता त्या घराण्याची सामाजिक भान, हुशारी नव विवाहित व तरूण जोडप्याला जीवनाच्या विविध टप्प्यावर मार्गदर्शन करण्याचीहातोटी /कसब कितीआहे यासाठी पाहावे. )

जय: बस मावशी कुळाचा पत्ता लागला कि लागलीच तुम्हाला कळवतो!
(जयची मावशीला खात्री द्यायची व्यवहार कुशलता बघा. खरे तर सांगितले पण कळल्यावर सांगु हे ही कबुल केले. )

मावशी: एका गोष्टीची दाद द्यावी लागेल,शंभर दुर्गुण असोत तुझ्या मित्रात; पण तुझ्या तोंडुन त्याची स्तुती च येत असते.

जय: काय करू मावशीमाझे मनच असे आहे.

अशा प्रकारे एका लघु कथे द्वारे जावेद अख्तर व सलीम खान यांनी समाजाला दिशा द्यायचा प्रयत्न केला आहे. तो मला पटला म्हणुन मी इथे मांडला, कारण्तिथुन मला सद्धर्माची काही मुल्ये हि दिसली.

कल्याण होवो!

संबोधन धम्मपथी 




















Wednesday, 26 August 2015

 आदि  मे कल्याण है, मध्य में कल्याण ।
अन्त में  कल्याण  है , प्रगती पथ निर्वाण ।।
- आचार्य सत्य नारायण गोयंका 

मानवी जीवनात माणसाची  निरनिराळी लक्ष जीवनाच्या वेगवेगळ्या टप्यावर  असतात. आणि माणसाचे लक्ष सहसा दूर असतें व त्यासाठी निरंतर प्रयत्न करावे लागतात. जो पर्यंत लक्ष भेटत नाही तो पर्यंत सुख-शांती बहुधा मिळत नाही. पण सद्धर्माच्या राजरस्त्याची गोष्ट  वेगळी आहे. कारण मनुष्य जसजसा चालायला लागतो तसातसा सुख शांतीचा स्वानुभव प्रत्येक पदोपदी घेत राहतो. जर धर्म खरा असेल तर त्या क्षणी सुख शांती मिळायला हवी. म्रुत्युनंतर मिळणारी शांतीतर  तपासता येत  नाही, मग ती बाजुला ठेवुया. 

सद्धर्माचा रस्त्यात तर फक्त तीनच गोष्टी करायच्या असतात, फक्त तीनच!!  शील,समाधि  व प्रज्ञा . जसे एखादाप्रवास करताना पहिल्यांदा प्रत्येकाला टीकिट काढावेच लागते व तेव्हाच प्रवासाला सुरुवात करता येते. त्याच प्रमाणे सद्धर्माच्या राजमार्गावर पहिले व सुरुवातीचे पाऊल म्हणजे शील-सदाचाराचा स्वीकार. कुशल काम करणार्या व्यक्ती धम्माच्या राजमार्गावर खुप लवकर प्रगती करतात. अकुशल कर्म करणार्या व्यक्तीस स्वताला शील-सदाचाराचे जीवन स्वीकारावे लागते, पंचशीलाचे काटेकोर पणे  करण्याची प्रतिद्न्याच घ्यावी लागते। पण साधक अशी प्रतिज्ञा   इतरांना दाखविण्यासाठी नाही, तर स्वताला धम्माच्या मार्गावर काही काळ तरी तपासुन व चालून पाहण्यासाठी घेतो. अकुशल कर्म करीत बैचेन झालेले मन, आचार्यांची माफी मागुन पश्चातापातुन काही (काळ का होइना) मुक्त होऊन, निर्दोष व शांत जीवनासाठी  नवी सुरुवात करते.   आता मी पांच शील नव्याने घेवून नवीन प्रयत्न करीत आहे.  नव्या जोमाने व उत्साहाने ध्यान करण्यास किंवा जीवन जगण्यास सुरुवात करते. ह्या नवीन उत्साह व जोम व अकुशल कर्माबाबत क्षमा मिळाल्यावर शांती मिळते. पंचशील पालन करीत असल्याने आता अकुशल कर्मांपासुन मनुष्य दूर गेलेला असतो. आणि त्यामुळे आता मी वाईट कर्मे करीत नाही हे जाणुन मनातील अनामिक भीतीची जागा आनंद घेतो. असे धर्मात सुरुवातीलाच कल्याण साधले जाते. 


पण मनाचा जुना  स्वभाव हा सहजा सहजी बदलत नाही. बैचेन व्हायचा व अकुशल कर्म करायचा जुना स्वभाव आपणास  नेहमी व्याकुळ करतो, खास करून शील पालन करते वेळी. मनात जसे विचारांचे वादळ नेहमीच सुरु असते. आपण काम एक करतो आणी मनात विचार दुसरा सुरु असतो. अशा वेळी साधकाला धर्माचे पूढील  पाउल शिकवितात: समाधि . जसे कधी पाण्यातील माती पाहण्यासाठी पाण्याला शांत होऊ द्यावे लागते, तसेच मनातील विविध अकुशल विचार दूर करण्यासाठी त्याला शांत  खूप गरजेचे असते. कारण आपल्या  मनाचे ओपरेशन आपल्या मनालाच करायचे असते. त्यामुळे मन जे दिशा दाखविल त्या दिशेकडे दुर्लक्ष करून, आपले लक्ष फक्त आपल्या स्वताच्या शुद्ध व नैसर्गिक श्वासकडे ठेवायला सांगितले जाते (आनापान सति   विद्या). नेहमीच विविध दिशेत भटकणार्या मनाला लगाम घालुन स्वताच्या श्वासावर  राहण्याचे शिकविले जाते. त्यामुळे विविध प्रिय-अप्रिय आणि वर्तमान व भुतकाळातील घटनांच्यामागे मागे पळणार्या मनाला शांत राहत वर्तमानकाळात म्हणजेच ह्या क्षणाचा परिपूर्ण विचार करण्यासाठी शिकविले जाते. अशाने श्वासाद्वारे केंद्रित झालेले मन खुप मानसिक शांती देते. अशा प्रकारे धर्माचे दुसरे पाउल सुद्धा खूप कल्याणकारी असते. 

पण तरी सुद्धा ही शांती कायमची नसते. कारण ध्यान करून उठले कि इतरांशी वागताना जुना क्रोधी, अहंकारी, लोभी व पश्चाताप करणारा स्वभाव कायम असतो. अशा स्वभावाची मुळे अंर्तमानात खोल खूप खोल रुजलेली असतात. त्यामूळे ती दूर करण्यासाठी साधकाला प्रज्ञा शिकविली जाते. प्रज्ञा म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान, शरीर व मनाच्या क्रियाप्रक्रियांचे प्रत्यक्ष ज्ञान. तेव्हाच साधक  मुळ स्वभावाला सामोरे जातो. काय आहे माझा स्वभाव? साधकाला हे कळू लागते कि, कुठले ही अकुशल कर्म करण्यापुर्वी मला मनात  लोभ,वासना, ईर्ष्या व मत्सर किंवा क्रोध उत्पन्न करावाच लागतो, त्याशिवाय अकुशल कर्म वाणी किंवा शरीराद्वारे होत नाही. आणि ते अकुशल कर्म केल्यावर इतरांना माझ्यापासून त्रास तर  नंतर होतो, पहिल्यांदा मलाच जबरदस्त त्रास होतो. मी अत्यंत व्याकुळ व धडधडत  असतो. असे जाणल्यावर नवीन दुष्कर्म होत नाही, व जुन्या दुष्कर्माची सवय/आठवण उफाळुन आली कि मी शरीर व मनाच्या संवेदनांकडे सजगतेने व साक्षीभावाने (तटस्थपणे) व समता ठेवून (ना लोभ जागविता व ना द्वेष/क्रोध जागविता) पाहत जुन्या अकुशल आठवणींचा शरीर व मनावरचा दुष्परिणाम दूर करतो. आता अविचारांच्या आगीला नवीन जळण मिळत नाही, व जुने दुष्कर्मे साक्षी भावाने पाहत दूर होतात. हा शरीर व मनाचा खेळ दर सेकंदाला सुरु होतो व संपतो. हे उत्पन्न व नष्ट  होण्याचे ज्ञान साधकाला विपश्याने द्वारे  स्वकष्टानेच मिळते. अशा प्रकारे जुने संस्कार जे व्याकुळ बनवितात दूर झाल्याने महान व मंगल शांती मिळते. म्हणुन धर्माचे हे अंतिम पाउल ही खुप कल्याणकारी आहे याची प्रचिती साधकाला येते. कष्ट मात्र त्यालाच घ्यावे लागतात, इतर कोणी माझ्या मनाची सफाई करेल हे केवळ अशक्य आहे. 

अशा प्रकारे धर्माचे  पाउल (शील-सदाचार ), मधले पाउल (समाधि - कुशल मनाची एकाग्रता) व अंतिम पाऊल प्रज्ञा हे तिन्ही महत्वाचे व कल्याणाकडे नेणारी पाऊले आहेत. हाच तर खरा प्रगतीचा एकमेव राजपथ/राजमार्ग आहे. साधकाने ही पाऊले वाचुन व ऐकूनच समाधान न मानता स्वतः तपासून पहावी, कि खरच असे होते का? तेव्हाच तर विश्वास होईल व त्यानंतर गंभीर रीत्या साधना केल्यावर आपण खरे तर मुक्तीपथ/प्रगतीपथ  निर्वाण (कायम स्वरुपी निर्दोष जीवनाचे सुख) आपणास मिळु शकेल. 

स्पष्टीकरण : संबोधन धम्मपथी