Sunday, 24 August 2025

विहारातील कार्यक्रमाच्या नियोजनाची मार्गदर्शक तत्वे

 विहारातील कार्यक्रमाच्या नियोजनाची मार्गदर्शक तत्वे

विहारात जेव्हा श्रोते जमतात तेव्हा त्यांना विहारातून स्वतःच्या  जीवनात परिपुर्णता, सकारात्मकता तसेच स्वतःचे जीवन ध्येयाने, संयमाने, आनंदपूर्वक आणि सजगतेने जगण्याची मार्गदर्शन हवे असते.  श्रोत्यांना उत्साही, प्रामाणिक, चतुर, कर्तबगार, आशावादी, संयमी आणि धाडसी व्यक्तींचा सहवास हवा असतो. 

तसेच नवीन उर्जा मिळवण्याची धडपड असते,  आजच्या घडीला समस्यांचा आढावा व त्यावर उपाय हे नवीन/आधुनिक स्वरूपात सोडवण्यासाठी!! 


हे लक्षात ठेवून महामानवांच्या जीवनसंदेशांना आजच्या समस्या सोडवण्यासाठी, नवीन प्रकारची धोरणे समजण्यासाठी व प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ती माणसे विहारांमध्ये आलेली असतात. या आशेला खुप महत्व आहे; कारण माणुस आठवडाभर काम करून परिवाराला सोडुन रविवारच्या दिवशी तिथे सामाजिक (किंवा वैयक्तिक) जबाबदारीच्या भावनेतुन आलेला असतो.  त्याच्यामुळे अशा नाजुक व कठीण स्थितीत त्यांना नवचेतना व नवउर्जा देण्याचे; पवित्र पण अत्यंत महत्त्वाचे काम हे विहारातील आयोजक आणि वक्त्यांच्या खांद्यांवरती असते

दुर्दैवाने अनेक वर्षांपासुन या कामाला पुरेसं यश मिळत नसल्याने तसेच त्याच-त्याच चुका/अपराध आयोजन व वक्ते नेहमीच करीत आल्याने, मी तुम्हाला माझ्या अनुभव आणि ज्ञानाच्या द्वारे काही मार्गदर्शक तत्वे आयोजक आणि वक्त्यांसाठी देत आहे. कृपा करून त्यावर तुम्ही विचार मंथन करावे हि विनंती!



ह्या लेखाचे दोन भाग आहेत :

  • भाग १:  आयोजकांना विहारातील कार्यक्रमाच्या नियोजनाची मार्गदर्शक तत्वे
  • भाग २: प्रवचन/मार्गदर्शन करताना वक्त्यासाठी मार्गदर्शक तत्वे

 भाग १: आयोजकांना विहारातील कार्यक्रमाच्या नियोजनाची मार्गदर्शक तत्वे पुढीलप्रमाणे :

१. विहारातील कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी, सुरुवातीलाच उपस्थित मान्यवरांपैकी एका जबाबदार, निष्णात व प्रामाणिक व्यक्तीला अध्यक्ष म्हणून निवडावे

२. पालीतील वंदनाबहुतेकांना समजत नसल्याने, पालीतील वंदना जास्तीत जास्त ५-१० मिनिटेच घ्यावी

३.  पुढील वंदना मराठी/हिंदीतून घ्यावी. अशाने लोकांना बुद्ध वाणी समजून नवउर्जा व नवचेतना मिळेल. 

४. लोकांना एकाग्रता व खंबीरता मिळवण्यासाठी,  पुढे १०-३० मिनिटे आनापान साधनासत्र   जरूर घ्यावे. 

५. काही दिवसांपूर्वी कार्यक्रमाची रूपरेषा, विशिष्ट विषय, वक्त्याचे नाव व ओळख अशी माहिती घोषित करावी. अशाने श्रोते त्यांच्या आवडत्या व्यक्तीस किंवा विषयाला अनुसरून त्यादिवशी वेळ काढून विहारात येतील.

६.नियोजित रूपरेषा शिस्तीत व सद्भावनेसह ठरवलेल्या वेळेनुसारच घ्यावी. आयोजकांनी अधिक माणसे येण्याची वाट पाहून, वेळेत आलेल्या माणसांच्या वेळेचा दुरुपयोग करू नये किंवा त्यांचा अप्रत्यक्ष अपमानही करू नये

नोंद: काही माणसे जाणीवपूर्वक उशिरा येतात कारण त्यांना पालीतील वंदना किंवा आनापान साधनेला बसायचे नसते. त्यांना प्रवचन किंवा मनातील प्रश्न विचारायचे असतात. म्हणून कार्यक्रम उशिरा सुरू केला तर अशी माणसं प्रवचनालाही येण्याचे टाळतात. तसेच वेळेत आलेली माणसे कार्यक्रम ३०-६० मिनिटे उशिरा सुरु केल्याने विहारातच येण्याचे  टाळतात. अशाने वंदना/प्रवचन आवडणारी किंवा  ना आवडणारी; कुठलीच माणसं विहारातच येत नाही.  

७. नियोजित अध्यक्ष्यांनी अभ्यासू व विचारवंत वक्त्याची निवड करावी.  अध्यक्षांनी जर वक्ता हितकर/उपयोगी व  पूर्व-नियोजित विषय करत नसून दिशाहीन व्यर्थ बडबड करत असेल; तर त्याला  ५-१० मिनिटात सन्मानपूर्वक थांबवावे किंवा इशारा द्व्यावा. अशाने श्रोत्यांना विहारातील कार्यक्रमाच्या दर्जाची खात्री होते व ते एका फालतु प्रवचनाच्या विहारात येण्याचे थांबवत नाहीत.

८. आयोजकांनी असे विषय निवडावे जेणेकरून श्रोत्यांचे पुढे पैकी दिलेल्या कुठलेही एखाद्या तरी विषयाचे (जसे वैयक्तिक, कौटुंबिक, व्यावसायिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक, बौद्धिक, नैतिक, शैक्षणिक, धार्मिक किंवा अध्यात्मिक)  ज्ञान वाढेल किंवा समस्या सोडविण्यास मदत होईल. जो वक्ता आजच्या समस्या सोडवण्यासाठी, योग्य दिशा, मूलभूत कारणे,  स्पष्टीकरण किंवा मार्गदर्शन करीत नाही असा वक्ता निरुपयोगी/अपरिपक्व ठरवुन  करून त्याला योग्यमार्गदर्शन करावे. 

९. विहारातील सुज्ञ, प्रगल्भ व जबाबदार लोकांनी अभ्यासू, मुद्देसूद मांडणी करणाऱ्या, संदर्भासह बोलणाऱ्या, आवाजात नम्रता असणाऱ्या व छान शब्दप्रभुत्व असणाऱ्या वक्त्यांचा शोध घेऊन; त्यांची महिन्याला ठराविक दिवशी (नियोजित उपयोगी विषयाच्या) प्रवचनासाठी ऍडव्हान्स बुकिंग करावी.

१०.कार्यकारी मंडळातील अध्यक्ष/सेक्रेटरीने त्यांच्या दर भाषणात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने श्रोत्यांना दान देण्याचे आवाहन करू नये. अशाने श्रोत्यांच्या मनातील अशांती वाढते. त्यापेक्षा कमीत कमी पैशात जनतेत अधिकाधिक नवचेतना व जगण्याची जिद्द कशी तयार होईल अशा प्रकारचं दर्जेदार प्रबोधन कसे होईल हे पहावे!!

११. मंत्रिमंडळातील कमिटीद्वारे समाजावर आर्थिक ताण किंवा कर्जाचा बोजा वाढत असल्यास अशा मंडळींना/कमिटीला उचित समज/मार्गदर्शन द्यावे. हे चालुच राहिल्यास उठाव करुन अशा मनमानी-निस्तेज-अपयशी कमिटी जनतेच्या हितासाठी तात्काळ बरखास्त करावी.अशा कमिटीला पैसे देण्याचे थांबवून समाजातील बेफिकिरी, व्यवहारातील अपारदर्शिता,  बेजबाबदारी आणि भ्रष्टाचाराला बळ देऊ नये

नोंद : आपल्या मुलुंड (पुर्व) मध्ये साधारण साडेतीन लाख रुपयांचा कर्ज/परतफेडीची स्थिती एका बौद्ध मंडळावर आलेली आहे. त्यावरून बोध न घेता, तेच मंडळ नियमितपणे खर्च करीत असुन, रविवारी ती माणसे जनतेकडुन आणखी पैसे मागत आहेत. ही अध्यात्माच्या नावावर आर्थिक अवनती आहे. 

१२. कार्यकारी कमिटीच्या कामावर करडी नजर ठेवण्यासाठी बाबासाहेब प्रणित संसदीय लोकशाहीतील विरोधी पक्ष व न्यायालयाप्रमाणेच; साधारण कार्यकारी कमिटीच्या समोर आवर्जून एक विरोधीपक्ष कमिटी आणि (निष्पक्ष व्यक्तींची) न्यायाधीश म्हणुन नेमणूक करावी! हीच खरी संविधानाची जनमानसात अंमलबजावणी होईल!! 

१३. कार्यकारी कमिटीने  वक्त्यांची प्रवचनाची रेटिंग व श्रोत्यांचा अनामिक प्रतिसाद घेऊन पुढील वेळेस त्या व्यक्तीला प्रवचनासाठी बोलवावे. 

१४. बुद्ध विहारातील कमिटीने "तरुण-वर्ग आणि स्त्री-वर्गाची धम्मात रुची वाढवणे",  ही आपली एक मोठी जबाबदारी समजावी.  अनुषंगाने त्यांनी सुज्ञ, विचारवंत आणि प्रगल्भ उपासक/उपसिकांना ह्या कामासाठी संशोधन करण्यासाठी आग्रहपुर्वक आवाहन करावे. 

भाग २: प्रवचन/मार्गदर्शन करताना वक्त्यासाठी मार्गदर्शक तत्वे

१. वक्त्याने दिलेल्या वेळेच्या पाच ते दहा मिनिटे अगोदर बुद्ध विहारात यावे. 

२. वक्त्याने नेहमीच पूर्वनियोजित विषयाला अनुसरून प्रवचन करावे

३. आपण प्रवचन देण्याचे कारण स्वतःचा अभ्यास व मेहनतीचे (अहंकारारूपी) प्रदर्शन नसून बहुजनांचे हित व बहुजनांचे सुख हाच मुख्य उद्देश्य आहे हे नेहमी ध्यानात ठेवावे. 

४. अनेक ग्रंथांचा अभ्यास करून त्यांनी नियोजित विषयाला न्याय द्यावा व श्रोत्यांची ज्ञानाची भूक भागवावी. 

५. प्रवचनानंतर प्रश्न-उत्तराच्या सत्रा सठी पाच ते दहा मिनिटे वेळ श्रोत्यांना जरूर द्यावा. 

६. प्रवचनाचे मुद्दे मुख्य उद्देश खालील प्रमाणे असावेत:

  • श्रोत्यांतील सद्गुणांची वाढ व्हावी. 
  • श्रोत्यांतील दिवसभरात ती कामांमधील दक्षता( माईंड फुलनेस) व एकाग्रता वाढवावी.
  • दोन जाती धर्मातील सलोखा कसा वाढेल याच्याबद्दल मार्गदर्शन करावे. 
  • प्रवचनातील प्रत्येक मुद्दा श्रोत्यांना किंवा त्यांच्या परिवारातील सदस्यांना उपयोगी व लाभदायक असेल हे पाहावे. 
  • प्रवचन हे केवळ ऐतिहासिक घटनांचा पाढा नसून सध्याच्या जीवनातील उपयोगात असले उपयोगी असले पाहिजेत. आजचे कुठला तरी प्रश्न सुटला पाहिजे. 
  • मी काय वाचले हे सांगण्यापेक्षा, जे वाचले त्याची श्रोत्यांना गरज आहे का हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. 

७. श्रोत्यांचे शिक्षण, त्यांचा अभ्यास, त्यांचे हावभाव आणि त्यांचा आर्थिक स्थर, त्यांची बोलीभाषा  या आधारे विषयाला अनुसरून सोप्या उदाहरणांची निवड करून विषय समजावून सांगावा. 

८. इतरांनी स्वतःचे  प्रवचन थांबवण्याऐवजी; श्रोत्यांचे इशारे आलेले झोप कंटाळा यावरून प्रवचन स्वतःच आवरते घ्यावे/संपवावे.

९. अध्यक्षांनी प्रवचन थांबवण्याचा इशारा केल्यास वाईट न वाटता प्रवचन थांबवावे किंवा अध्यक्षांकडे जास्तीत जास्त ५ मिनिटे मागावीत. 

१०. प्रवचन करताना एखादा दुसरा स्वतःपेक्षा श्रेष्ठ, अभ्यासू व विचारवंत वक्ता विहारात आल्यास स्व-विवेक जागवत, विनम्रतेने त्या वक्त्यास अध्यक्षांच्या अनुमतीने आमंत्रण प्रवचनासाठी आमंत्रण द्यावे. जास्तीत जास्त लोकांच्या हितासुखासाठी त्यांना श्रेष्ठ वक्त्याचे प्रवचन मिळणे खुप आवश्यक आहे. 

१०. प्रवचनानंतर श्रोत्यांकडून त्यांच्या अनामिक प्रतिक्रिया जरूर घ्याव्यात. अशाने स्वतःतील सुधारणेसाठी दिशा स्पष्ट होईल.

११. प्रवचन करताना श्रोत्यांनी हे लक्षात घ्यावे की सर्वोत्कृष्ट प्रवचन हे ते असेल जिथे ब्राह्मण-क्षत्रिय-वाणी- शूद्राति-शूद्र तसेच मुस्लिम किंवा ख्रिश्चन सुद्धा प्रवचनाला ऐकायला येतील; तेव्हा त्यासर्वांची बुद्ध बाबासाहेबांबद्दल श्रद्धा वाढली पाहिजे.  असा दर्जेदार प्रवचन देण्याचा प्रयत्न करावा, तेवढी सिद्धी प्राप्त करण्यासाठी जमल्यास दर दिवशी  सद्धर्म वाचन, तज्ञांशी चर्चा, उच्चाराचा सराव, विपश्यना सत्र आणि सध्या लोकांची मानसिक अवस्था/जीवनशैली यांचा सर्वावांगिण अभ्यास करावा. 

१२. अत्यंत महत्वाच्या दिवशीच्या प्रवचनाच्या तयारीसाठी, एक महिन्यापुर्वी त्या नियोजित वक्त्याकडुन, भाषणाची लेखी प्रत मागवुन घ्यावी. त्यावर सुज्ञ विचारवंतांना अभ्यास करून भाषणाची आजची उपयुक्तता आणि सत्यता तपासावी. काही सुचवायचे असल्यास तात्काळ सुचवावे. त्यानंतरच त्या वक्त्याला ते भाषण करण्याची परवानगी द्यावी. नाहीतर महत्वच्या दिवशी सर्वात जास्त फालतु भाषण देण्याची आपल्या वक्त्यांना व आयोजकांना घाणेरडी सवय आहे. 

मला आशा आहे, अशा प्रकारच्या स्पष्ट, सुचक, कल्याणकारी व समयोचीत मुद्द्यांशी तुम्ही सहमत व्हाल. आणि आपल्या जवळच्या विहारात महामानवाने अपेक्षित असलेली अनेक कल्याणकारी प्रवचने आणि योजना जनतेस (कमीत कमी पैसे मागत) जनतेला भीम-बुद्धाच्या उपकारांची जाण ठेवीत वास्तवात आणाल. धम्म सर्वाना बळ देवो!


आपला ऋणी,
संबोधन धम्मपथी ( ९७७३१००८८६)
कॉम्पुटर इंजिनियर, त्रिपिटक वाचक, धम्मसेवक
मुंबई, महाराष्ट्र

ईतर संबंधीत लेख : अजाण बौद्ध वक्ते व आयोजक   ।   तिसरा बुद्ध विहार अधिवेशन   ।  सामाजिक सलोखा व बंधुत्व राखुन प्रबोधन


Tuesday, 12 August 2025

अजाण बौद्ध वक्ते व आयोजक (संविधान दिन २०१७, डोंबिवली)

 बांधवहो जयभीम !
 
मी जरी बौद्ध असलो तरी दर रविवारी विहारात जाणे प्रकृती व व्यग्रतेमुळे शक्य होत नाही. त्याहूनही महत्वाचे कारण म्हणजे विहारात जाऊन नेहमीच तणाव, समस्या (खासकरून सामाजिक)  व व्याकुळतेवर जे उपाय मी  शोधण्याचा प्रयत्न करतो, ते मिळत नाही किंवा कुठे उपाय  मिळेल याची माहितीही मिळत नाही. त्यामुळे मी विहारात नेहमी न जाता, दोन महिन्यातून एकदा जात असतो. पण इतरांना "तुम्ही विहारात जा",  असा  सल्ला देऊ शकत नाही, कारण तिथे जाताना पहिल्या प्रथम मला काही प्रगती दिसायला हवी ना! तरी परिस्थितीतील  सुधार तपासण्यासाठी दोन महिन्यातून एकदा जाण्याचा प्रयत्न करतो. असे असले तरी बुद्ध पौर्णिमा, भीम जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन व संविधान दिनानिमित्त मी विहारात  अवश्य जातो. 

कारण सरळ व सोपी असते, मला विद्वानांकडून समाजाची स्थिती, प्रगतीतील अडचणी/मुद्दे व बुद्ध-भीम विचार समजावेत. पण तिथेही बऱ्याच वेळा (जवळपास ९०% वेळा ) निराशाच हाती येते. ह्या संविधान दिनानिमित्त २६ नोव्हेंबर २०१७ रोजी डोंबिवलीतील कार्यक्रमात गेलो असता असेच झाले . तिथेही दुर्दैवाने नवीन दिशा व मुद्दे हाती ना लागता तोच तोच रटाळपणा  जाणवला. कुठे  तरी व्यक्त होता यावे व सुधार हेतू लिहीत आहे. 

डोंबिवलीतील त्या कार्यक्रमात एका निवृत्त प्राध्यापकांना बोलावण्यात  आलेले होते.  इथे या आयोजकांची चूक हि झाली कि वक्त्यांना एक निश्चित  विषय त्यांनी  दिला नव्हता व ना हि पत्रिकेत छापला होता . पण तरीही संविधान दिनानिमित्त, संविधानाच्या दृष्टिकोनातून सामाजिक व राजकीय विश्लेषण करीत सामाजिक समस्या सोडवण्याचा 
प्रयत्न करणे किंवा संविधानाच्या बद्दल लोकमत पूजेची भावना न देता उपयोगाची भावना समजावणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही. एका अनुभवी व निवृत्त प्राध्यापकाला याचे भान ना राहणे हे तर दुर्दैवीच म्हणावे लागेल . त्यांच्याकडून संविधानाद्वारे सामाजिक प्रगतीची व क्रान्तिमय दिशेची अपेक्षा आयोजकांनी व.  श्रोत्यांनी करणे हे चुकीचे म्हणता  येणार  नाही. 

त्या  वक्त्याची  मराठी भाषेवर पकड, उच्चार व आत्मविश्वास नक्कीच चांगला होता. अनुभवी व निवृत्त प्राध्यापकाला हे  गुण  असणे अपेक्षित हि  असते . पण  फक्त हे च  गुण  दिशा देऊ शकत नाही. एकूणच त्या दिशाहीन प्रबोधनाचे काही अकल्याणकारी व अप्रस्तुत मुद्दे खाली देत  आहे . याची 

वक्त्यांचा मुद्दा नं १: ..... मी त्या आईचा मुलगा आहे जिने देव पाण्यात बुडविले .... (यावर  लोकांच्या टाळ्या  पडल्या )
माझे विचार नं  १: ठीक आहे . पण इथे अनेकांच्या पूर्वजांनी तसे केले आहे. मग आम्ही सगळे येऊन व्यासपीठावर  ग्वाही द्यायची का ?आज  इथे आत्मकथनाचा विषय नसून आजच्या देवभोळ्या पिढीला विज्ञानवादी कसे बनवावे हे सांगितले तर समस्या सोडवण्यास मदत झाली असती . लोक काय जुने देव फेकले कि काम झाले असे समजतात, यामुळे टाळ्या  वाजवतात . पण विद्वान वक्ता  मात्र त्यांना गुदगुल्या न करता समस्या व जबाबदारीचे भान देतो . समस्या सोडवण्यास मदत  करतो ,कारण  त्याला माहिती  असते कि  जुने-पुराणे किस्से गिरवून समस्या सोडवता येत नाहीत 

वक्त्यांचा मुद्दा नं २:.....मी पुस्तके वाचीत  नाही. कारण पुस्तकात जी माहिती असते ती जुनी  असते . मी माणसांना भेटून विचार बनवतो ...... 
माझे विचार नं  १: महाशय तुम्ही  नक्की  काय सुचवीत  आहात हे कळत नाही . जेव्हा एखादा प्राध्यापक व प्रिंसिपल सत्कारमूर्ती बनून  स्वतःची सवय सांगतो तेव्हा ती  सवय चांगली आहे असे लोकांना वाटते. तसे नसते तर आयोजकांनी  तुम्हाला आमच्या समोर कशाला उभे केले  असते ? म्हणजे तुम्ही आम्हाला, " पुस्तके वाचू नका, कारण पुस्तकात जी माहिती असते ती जुनी  असते" हे सांगता तेव्हा तुम्ही इतरांना ज्ञान घेण्यापासून परावृत्त करता  असे मी मानतो . या हे फुले -शाहु -बाबासाहेबांना अभिप्रेत नव्हते , किंबहुना हे वाकय त्यांच्या विचारांच्या विरोधीच आहे.. बाबासाहेबांनी तर प्राध्यापकाची स्वतंत्र  लायब्ररी  असावी  व अवांतर  वाचन करावे असा सल्लाच दिला आहे . असे असल्याने मला तुमचा सल्ला प्रचंड अहितकारी वाटतो. ह्या एकाच  मुद्द्यामुळे मी हि समीक्षा लिहीत आहे असे म्हणणें बरोबर होईल . 

वक्त्यांचा मुद्दा नं ३:.....माझ्या खिशात संविधानाची प्रत आहे. ........ (यावर  लोकांच्या टाळ्या  पडल्या ).. 
माझे विचार नं  ३: ठीक आहे . पण त्याने समाजाचा नक्की काय फायदा  झाला  हे सांगणे अधिक महत्वाचे ..संविधान नक्की काय  आहे व ते कसे सर्व जाती-धर्मासाठी महत्वाचे हे श्रोत्यांना आजचे उदाहरणे देऊन ज्ञानी बनविणे महत्वाचे नाही का  वाटत ? तुम्ही  ते सांगितले नाही म्हणून तुम्ही ते समाजासाठी कसे वापरता हे कळतच नाही. जर हेच नाही सांगितले तर खिशातील संविधानाची गिणती मागासवर्गियांची अंधभक्ती वाढवणारी पुस्तक म्हणून होणार नाही का ? 
उदाहरण देऊन सांगायचे म्हणजे एखादा डॉक्टर २४ तास एक पुस्तक सोबत ठेवतो, पण ते वापरून एखाद्याला बरे केले असे कोणालाच दिसले नाही ; मग माणसे त्या डॉक्टर ला विद्वान व कल्याणकारी बोलूच शकत नाहीत. 

दुसरा डॉक्टर कोणतेही पुस्तक २४ तास जवळ न  ठेवता, एखाद्याचा रोग ओळखतो , त्याचे कारण सांगतो व रोगमुक्त करतो. तसेच मी पुस्तकाचा ( जसे संविधान )  वापर करीत रोगी कसे बरे करतो हे सांगू शकतो, तो डॉक्टर  नक्कीच विद्वान व कल्याणकारी आहे असे सांगता येईल . म्हणून केवळ पुस्तक / संविधान जवळ ठेवून कोणी विद्वान व हितकारी ठरत नाहीं. 

त्या निवृत्त प्राध्यापकाने हे मांडलेले मुद्दे व ते कसे निरुपयोगी आहेत हे मी मांडले आहे. तसेच त्यांनी समाजसेवक दाभोळकर, कुलबुर्गी व गौरी लंकेश यांच्या हत्येबद्दल सांगुन पंतप्रधानांबद्दल  विनोदही केला  कि 
त्यांनी सर्वाम्च्या हातात झाडू  दिला. पण समस्या ह्या विनोदाने सोडविल्या जात नाहीत, नाहीतर सर्व कार्यक्रमाला विचारवंता ऐवजी  राजू श्रीवास्तव दिसला असता . 




हि तर झाली त्यांच्या भाषणावर समीक्षा . पण मग संविधान दीना निमित्त भाषण हे कसे असावे हे हि सांगणे महत्वाचे आहे. 

भाषण करताना समोर बसलेल्या माणसांची सरासरी वय , सरासरी  हुशारी व सरासरी  शिक्षण पाहून मुद्दयांचे गांभीर्य व मुद्दयांची संख्या ठरविणे गरजेचे असते . संविधान दिनानिमित्त अधिकांशी लोक पन्नाशी पार केलेले होते व सरासरी शिक्षण १२ वि पर्यंतच होते. त्यामुळे खालील मुद्दे वेळेचे भान ठेवून बोलणे महत्वाचे होते. 
१. संविधानातील आता पर्यंत झालेले बदल व त्यांची वर्गवारी/रुपरेषा. 
२. संविधानातील बदलासाठीची आवश्यक प्रक्रिया 
३. गेल्या २-३ वर्षांत तीन हितकारी व अहितकारी बदल व त्याचे परिणाम 

वेळेसआयोजकां साठी सल्ला : 
१. येणार वक्ता फक्त प्राध्यापक किंवा मोठ्या हुद्द्यावर आहे म्हणून त्यावर तात्काळ विश्वास ठेवू नये. 
२. त्याने आता पर्यंत किती योगदान दिले त्यावरून त्याचे नियोजित विषयाचे ज्ञान ठरवू नये . 
३. १-२ आठवडयांपूर्वी त्याचे भाषण लेखी स्वरूपात मागवून घ्यावे व त्या नंतर त्याची सिद्धता ठरवावी 
४. एखादा वक्ता पैसेच घेत नाही म्हणून तो नक्कीच चांगली दिशा देईन, हा भ्रम आहे. 
५. प्रश्नोत्तराचा वेळ व जेवणाची वेळ सांभाळावी 
६. वक्त्याला विषय व त्या तुन अपेक्षित ज्ञानाची कल्पना लेखी स्वरूपात द्यावी 
७. लोकां कडून प्रबोधन झाल्यावर अभिप्राय जरूर घ्यावेत व वक्त्याला कळवावेत
प्रस्नउत्तरे 

उदाहरणासाठी संविधानातील बदला बद्दलचे काही मुद्दे मांडीत आहे:

१. इंटरनेट सूरक्षा कायदा : याची तरतूद करणे स्वाभाविक होते व ती टेक्नॉलॉजी बाबासाहेबांच्या काळातही नव्हती. 
२. न्यायाधीशामचे निवृत्ती वयात दोन वयात दोन वर्षे वाढविणे : हा बदल का आवश्यक होता ? यात का काही सरकार व न्यायाधिषांचे काही साटंलोटं आहे ? सरकारी बॅकलॉग ना भरण्याची सरकारची धूर्त खेळी आहे ? याचा समाजाला व देशाला कसा व कुठला फायदा होईल?
३. एससी/एसटी  जातीच्या यादीतुन काही जातिंना वगळले व काही नवीन जातींना टाकले :  कुठल्या आधारावर जुन्या जातींना काढले व कुठल्या आधारावर नवीन जातींना काढले. का हि प्रक्रिया न्यायी व सत्याच्या आधारावर होती कि द्वेष/खोटेपणावर ? का ह्या प्रक्रियेत बाबासाहेबांच्या विचारांना धुडकावण्यात आले का? 

संविधानातील बदला बद्दलची प्रक्रिया :
माझ्या मर्यादित माहिती नुसार संविधानात बदल करण्यासाठी विधेयक लोकांची मत /सल्ला मागण्यासाठी वर्तमानपत्रात एक महिन्यापूर्वी टाकण्यात येतो . व पत्र किंवा इ-मेल द्वारे मत /सल्ला मागवण्यात येतो. 

तुम्ही अशा वेळेस अनुचित किंवा हितकारी विधेयक समोर येण्यापूर्वीयावर  (किंवा आल्यावर)  काय  करावे: 
१. अशा वेळेस  तुमच्या कडे ह्या विषया साठी विद्वानांची यादी असायला हवी.
२. त्या यादीतून लोकांची निवड  करून त्यांच्याकडून सर्व बाबिंचा विचार करीत बरे - वाईट  मुददयांचा अहवाल लिहावा
३. तो अहवाल वर्तमान पेपर , मासिकात पैसे देऊन छापावा 
४. इतर बुद्ध विहारांत तो वाटावा व विचार विमर्श करून समाजास सचेत ठेवावे 
५. मग अंतिम  मुदतीच्या आत सरकारला योग्य स्थळी पाठवावा 


असे कुठलेच मुद्दे त्या संविधान दिनाच्या कार्यक्रमात न दिसल्याने पूर्ण निराशा पदरी पडली. असे इतर ठिकाणी होऊ नये व त्या वक्त्याने (व आयोजकांनी ) योग्य दखल घ्यावी म्हणून हा स्वानुभव लिहीत आहे. 


आपला ऋणी ,
सम्बोधन धम्मपथी (९७७३१००८८६)
कॉम्पुटर इंजीनियर, आयटी क्षेत्र में २२ साल का अनुभव,
सर्टिफाइड आयएसटीक्युबी मैनेजर, Certified SCRUM Master,
त्रिपिटक वाचक, धम्मसेवक,
मुंबई, महाराष्ट्र