Tuesday, 26 May 2020

पहिल्या आर्य सत्याबद्दल प्रश्नोत्तरे

प्रिय सर,

तुमच्या प्रश्नावर/विषयावर मत  मांडत आहे. 

 प्रश्न १: पहिले आर्य सत्य 'दुःख आहे' समजण्यासाठी बौद्ध होण्याची गरज नाही. मग पहिले आर्य सत्य हे नक्की काय सांगते ?

उत्तर: भगवान बुद्धांचे कोणतेही विचार समजण्यासाठी खरेच  बौद्ध होण्याची गरज नसून, सन्मार्गावर चालण्यासाठी अंर्तमुखी होऊन स्वतःचाच स्वभाव बदलण्याची गरज आहे. ती स्वभाव बदलण्याची पद्धतही बुद्धांनी दिली आहे. 

पहिले आर्य सत्य सांगते कि जगात दुःख आहे, म्हणजे  जन्म, आजारपण, म्हातारपण, प्रिय माणसाचे/घटनेचे  दुरावणे-अप्रिय माणसाचे/घटनेचे जवळ येणे, मनातील भ्रम/चिंता आणि मृत्यु हे सर्व दुःखाचे प्रकार आहे. पण मनुष्य हे मानतच नाही. हे समजण्यासाठी एक उदाहरण देतो:

जसे एका बेटात सगळे जसे एखाद्या रोगाने(जसे देवीचा व्रणाचा रोग) अनेक पिढ्यांपासून  ग्रस्त आहेत व त्यांचा बाहेरच्या जगाशी काहीच  संबंधच नाही. तेंव्हा त्यांचा असाच भ्रम  होतो,कि हा रोग रोग  नसून,  मानवी जीवनाचाच टप्पा व भाग आहेत, जसे वयात आल्यावर मिशा येणे.  बाहेरून एक  विद्वान व निरोगी डॉक्टर येतो, तो सर्वाना बघतो व चार वाक्ये म्हणतो 


१. अरे तुम्हा सर्वाना तर हा देवीच्या व्रणाचा रोग आहे. 
२. ह्या रोगाचे कारण कारण अस्वच्छते मुळे येणारे विषाणु आहेत. 
३. ह्या रोगाचे निवारण शक्य आहे. 
४. ह्या आठ गोळ्या (आर्य अष्टांगिक मार्ग) खाऊन तुम्ही रोग मुक्त  होऊ शकता. 

पण त्या बेटावरील लोकांना त्याच्या म्हणण्यावर लक्ष देत नाही. कारण तो रोग म्हणजे जीवनाचाच हिस्सा म्हणून माणसाने तो स्वीकारलेला असतो. म्हणून माणसे विचारतात कि, पहिले आर्य सत्य विशेष असे सांगते?
कारण हे सर्व आम्हाला सर्व आहे, व आम्ही त्यासोबत जगणे शिकलो आहोत. 

जसे आपण स्वीकारतो कि खालील गोष्टी/ संकटे मानवी जीवनाचाच भाग आहेत , 
१. कुठलेही वाईट कामे करा पण पकडले जाऊ नका. 
२. मग इतरांना लाच देऊन बाहेर पडा, व काहीच न  घडल्याचा दिखावा करा 
३. विवाहबाह्य संबंध, बलात्कार -हत्या, स्त्री पुरुष असमानता

४. जातीयवाद, भ्रष्टाचारी माणसे, सांप्रदायिक दंगे, जमावाद्वारे हत्या, प्रदुषण  
५. पक्षपात,  आत्महत्या, घटस्फोट, प्रेमभंग,  अकाली मृत्यु , महामारी 
६. अनियोजित शहरे, राष्ट्रीय मालमत्तेचे खाजगीकरण, आळशीपणा, 
७. तिरस्कार-चिडचिड,  क्रोध, अज्ञानीपणा, विसरभोळेपणा, मनोविकार, अहंभाव, भीती-शंका, मोह-मुढता (इच्छांचे पारतंत्र्य )

तो बाहेरून आलेला डॉक्टर हे सांगतो अरे हे सर्व जीवनाचा भाग नाहीत, हे रोग आहेत जे कुठल्याही ईश्वराने दिलेले नाहीत. कारण / विषाणु/अविद्या नष्ठ केली कि जीवनात निर्मळ  सुख निश्चित आहे.





तो डॉक्टर म्हणतो हे वरील सात गोष्टी/ संकटे  तुम्ही जीवनासोबत घेऊन जगत आहात, पण कायमचा सोडवण्याचा प्रयत्न नाही करत. त्या वरून लक्ष हटवण्यासाठी तुम्ही खालील गोष्टी करता :
१. खेळ खेळणे-पाहणे, टीव्ही-नाटक-चित्रपट-पॉर्न पाहणे 
२. विविध वाढदिवस-लग्न-कार्यक्रम-उत्सवात संगीत-नाच-गाणे-पार्टी-कर्मकांड  करून इतरांना दाखविणे कि बघा मी-माझे कुटुंब-माझा समाज कसा खुश आहे 
३. पुस्तकात -गप्पात -मोबाईल-कॉम्पुटर  मध्ये मन गुंतविणे 
४. शेवटी दारू-व्यसने-झोपेच्या गोळ्या-आत्महत्या 
५. सौन्दर्य प्रसाधनाद्वारे म्हातारपण/आजारपण लपविणे 


म्हणून समजून घ्या पहिले आर्य सत्य व बाह्यजगात सुखाचे-दुःखाचे कारणे शोधणे थांबवा. शाश्वत/पर्मनंट सुखासाठी स्वावलंबी-अंतर्मुखी व्हा. 


   प्रश्न १:    बाबासाहेब आंबेडकरांनी चार आर्य सत्यांवर शंका  का  घेतलेली आहे ? 

उत्तर:बाबासाहेबांनी कधीही कुठलाही ग्रंथ किंवा मत डोळे झाकून स्वीकारलेले नाही. बुद्धाचेही नाही!
तसे तुम्हीही डोळे झाकून स्वीकारू नका, असे बुद्धानेही सांगितलेलं आहे. उपस्थितअधिकृत बुद्ध वाणी  साठी आपल्याला मुळ त्रिपिटक अभ्यासावे लागते, जो गुरु-शिष्य परंपरे द्वारे अनेक भिक्षूंच्या वैयक्तिक समजेतून व आठवणींतुन बनला आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी, त्यांच्या 'बुद्ध व त्यांचा धम्म' ग्रंथांत एकूण चार विषयावर  शंका उपस्थित केली आहे व पुढील संशोधनासाठी आपल्याला आवाहन केले आहे. त्यातली दुसरी शंका, आर्य सत्यांबद्दल आहे. एक महत्वाचे म्हणजे एखाद्या विषयावर शंका उपस्थित करणे व तो विषयच नाकारणे यात खूप खूप फरक आहे. 

 त्यांच्या वरील सांगितलेल्या ग्रंथात, त्यांनी आर्य सत्यांसाठी वेगळा धडा दिलेला नाही  बाबासाहेबांनी शंका उपस्थिक केली आहे, आर्य सत्य नाकारलेले दिसत नाही. आर्य सत्याच्या मानवकल्याणाबाबत काही प्रश्न  मांडले आहेत. जर त्या प्रश्नाचे योग्य उत्तर मिळाले तर बाबासाहेबांना आर्य सत्याबद्दल काही हरकत नसावी.  

 कारण पण, त्याच ग्रंथात त्यांनी अनेक ठिकाणी चार आर्य सत्यांचा उल्लेख धम्म समजावताना केलेला दिसतो. 

१. सम्यक मार्गाचे अनुसरण : खंड ४, भाग तिसरा  
२. सदाचरणासंबंधी प्रवचन : खंड ४, भाग चौथा 
३. का बौद्ध धम्म निराशावादी आहे?  खंड ६, भाग तिसरा 

कमीत कमी  तीन संदर्भ मला बाबासाहेंबांच्या ग्रंथात दिसल्याने ,बाबासाहेबांनी आर्य सत्य नाकारली हे अजिबात म्हणता येणार नाही. 

 अजून महत्वाचे कि,  ज्या एकूण चार शंका बाबासाहेबांनी मांडल्या आहेत त्या सर्वच्यासर्व शंकाचे उत्तर बाबासाहेबांनी त्याच ग्रंथात दिलेले आहेच .  तरीही ते इतिहासतज्ञ असल्याने वाचकांना सजग राहण्यासाठी त्यांनी सर्वच्यासर्व शंकाचे उत्तर आपल्याला पुढे शोधण्याचे आवाहन केले. कारण प्रगती, शोध-प्रक्रिया व यश हे कायमचे नसते. 

आपल्या वाचनात हे मिळाले आहे कि, जरी पहिले आर्य सत्य दुःख असले तरी वरील प्रश्न १ च्या उत्तरामध्ये सांगितल्याप्रमाणे बुद्धाने फक्त दुःखच आहे हे सांगून शांत नाही बसले. त्यांनी पुढील तीन आर्य सत्यात सांगितले कि त्याचे निराकरण शक्य आहे व  निराकारणाचा खात्रीलायक उपायही सांगितला आहे. 


त्यामुळे चार आर्य सत्यांबद्दल मनात शंका ठेवणे हे योग्य नाही. बाबासाहेंबांनीही त्यांच्या ग्रंथात धम्म समजावताना उद्घृत केलेली व समजावून सांगितलेली आहेत. 

संभ्रमात/विवादात पडून मनुष्य जन्म वाया घालवू नये, व्यवस्थितरीत्या वाचन करावे.

 मंगल व्हावे !!


संबोधन धम्मपथी 

Thursday, 7 May 2020

अग्निवेश सच्चक पुण्य वितरणाची ची छोटी कथा (मज्झिम निकाय )


सच्चकाची पुण्य वितरणाची कथा

 ही कथा बुद्ध व सच्चकाची असून तिची सुरुवात ही सच्चकाने बुद्धाला वादविवादात पराभूत व अपमानित करण्याची दवंडी पिटत केली होती. त्या वेळी बुद्धाने मनाच्या कर्माचे महत्व, शारीरिक कर्माच्या महत्वापेक्षा जास्त आहे हे स्वानुभवाने समजावून सांगत सच्चकला अनित्यबोध व कर्मसिद्धांत समजावून सांगितला .  सच्चकाने संपूर्ण घामाघूम होत त्याचा पराभव स्वीकार केला, तसेच बुद्धाच्या अगणित गुणांचा हि जयघोष केला. हि कथा जयमंगल अट्ठगाथेत आली आहे.

ह्या कथेच्या शेवटी, सच्चक परिव्राजक (संन्याशी ) याने आदरासहित बुद्ध-प्रमुख संघाला  दुसऱ्या दिवशी भोजनदानाला बोलावले. संन्याशी असल्यामुळे त्याची एवढी तयारी व सामग्रीही नव्हती. तरीही श्रद्धेने त्यांना बोलावले पण नंतर, ५०० लिच्छवींना (त्यावेळेचे तिथले स्थानिक नागरिक) विनंती केली कि, उद्या बुद्ध-प्रमुख संघाला भोजनदान  आहे त्यामुळे तुम्ही योग्य ते समजून -उमजून कार्य करावे!! त्या  लिच्छवीं नी  योग्य दान केले. भोजनानंतर सच्चकाने बुद्धांना विनंती केली कि भोजनदानाचे पुण्य दायकांना ( लिच्छवींना ) मिळावे. त्यावर भगवान म्हणाले कि, "निर्वाणप्राप्त (म्हणजे वीतराग- वीतमोह- वीत दोष) भिक्षूंना  भोजनदान दिल्याचे पुण्य सच्चकाला मिळेल, आणि इतर दायकांना अजून निर्वाण न मिळालेल्या   (म्हणजे अ-वीतराग,अ-वीतमोह, अ-वीत दोष) भिक्षूंना  भोजनदान दिल्याचे पुण्य मिळेल!!"

हि कथा पूर्णपणे  इथे हिंदीत दिलेली आहे: https://suttacentral.net/mn35/hi/sankrityayan


प्रश्न : सच्चकाने बुद्धांकडे  दायकांसाठी पुण्यवितरणाची विनंती केल्यावर भगवंतांनी पुण्याचे विभाजन दोन प्रकारे का केले ?

संबोधन धम्मपथींचे उत्तर: 

असे नक्की भगवंतांनी का केले असे सांगणे कठीण आहे कारण असे पुण्याचे विभाजनाची कथा वाचनात आलेली नाही. तसेच असे पुण्य विभाजनाचे स्पष्टीकरण हि वाचनात किंवा ह्या कथेत आलेले नाही. पण बुद्धाच्या तत्वज्ञानातून व कर्मसिद्धांताच्या आधारे उत्तर देत आहे. तर्काद्वारे तपासून घ्यावे

ह्या कथेचे वैशिष्टयं म्हणजे पुण्यवितरणाचे विभाजन भगवंतांनी सांगितले आहे. सच्चकाचे भ्रम दूर झाल्यावर त्याला भगवंतांना संघासहित भोजनदान व गौरव द्यायची प्रबळ इच्छा झाली. पण स्वतः संन्याशी असल्याने मोठ्या भिक्षुसंघासाठी आवश्यक सामान नव्हते. पण तरीही मागेपुढे न पाहता त्याने भगवंतांना भिक्षु संघासहित भोजनदानासाठी येण्याची विनंती केली. भगवंतांनी मौन राहून स्वीकृती दिल्यावर, त्याने उपस्थित लिच्छवींना विनम्र आवाहन केले कि, उद्या बुद्ध-प्रमुख संघ भोजनदानासाठी येत आहे, तरी आपण सर्वांनी असे काही करावे कि ते ह्या परिस्थितीला योग्य आहे. वैशाली नगरीचे स्थानिक (लिच्छवी) तर अगोदर पासून त्रिरत्नांबद्दल श्रद्धावान होते. सच्चकाच्या आवाहन व योजने प्रमाणे त्यांची पहाटेच ५०० स्वयंपाक सहकारी व योग्य व्यवस्था केली. 


भोजनानंतर सच्चकाने कृतज्ञ राहत, लिच्छवींचे उपकार समजून भगवंतांना विनंती केली भोजनदानाचे पुण्य दायकांना ( लिच्छवींना) मिळावे. त्याने स्वतः साठी काहीही मागितले नाही. तो वास्तविक समाधानी झाला  होता. माझ्या मते दोन कारणांमुळे सच्चकाने स्वतःसाठी काही मागितले नसावे. पहिले कारण कि त्याला त्याच्या आयुष्यात (बुद्धांपुर्वी) शारीरिक कर्माला मानसिक कर्मां पेक्षा जास्त महत्व द्यायची शिकावण मिळाली होती. आणि त्याला  वाटले कि हे भोजनदानाचे पुण्य  शक्य झाले ते लिच्छवींनी  केलेल्या दानामुळे, जे होते प्रामुख्याने शारीरिक (व द्वितीय मानसिक) कर्म. बुद्ध प्रमुख संघाला श्रद्धा व गौरव पूर्वक बोलावण्याची संकल्पना-योजना (प्रमुख मानसिक कर्म) जरी  सच्चकाने मांडली असली तरी त्याच्या आतापर्यंतच्या शिकवणी प्रमाणे हि योजना (आयडिया) मानसिक कर्म असल्याने व तो मानसिक कर्माला शारीरिक कर्माच्या  पुढे तुच्छ मनात असल्यामुळे त्याने स्वतः ला पुण्याचा हकदार मानले नाही. 


दुसरे कारण असे, कि प्रामाणिकपणामुळे खऱ्या दायकांचे/दानकर्त्यांचे नाव तथागतांना सांगून त्यांनाच भोजनदानाचे पुण्य मिळावे एवढा मनाचा मोठेपणा त्याने अध्यात्मिक आनंद (प्रमुदित/बोध) त्याने तथागतासोबतच्या पहिल्या भेटीतच कमविला. 


तथागतांना अनेक ऋद्धी अर्जित केल्या होत्या.  त्यातील एक छोटीसी ऋद्धी म्हणजे परिचित्त ज्ञान; म्हणजे दुसऱ्याच्या मनाची स्थिती/विचार ओळखणे. त्यांनी  सच्चकाच्यामनाची स्थिती अगोदरच ओळखली होती.  

कर्मांचे वर्गीकरण :
तथागतांच्या कर्म सिद्धांतानुसार इथे भोजनदानासाठी मुख्यतः दोन कर्मे केलेली आहेत:

१. बुद्ध प्रमुख संघाला श्रद्धा व गौरव पूर्वक बोलावण्याची संकल्पना-योजना (प्रमुख मानसिक कर्म)  सच्चकाने मांडली व लिच्छवींना दानासाठी विनम्र आवाहन केले. 

२. लिच्छवींना विनम्र आवाहनाला प्रतिसाद देत (सच्चकाच्या आवाहनानंतर दान देण्याचा विचार करून)  उचित दान केले

त्यामुळे पहिले कर्म हे आद्य कर्म असून ते प्रमुख मानसिक आहे, तसेच दुसरे कर्म हे आद्य नसून लिच्छवींद्वारे किती तत्परतेने केले गेले  हे तथागतच ओळखू शकतात. पण एवढे मात्र नक्की आहे कि, जर पहिलेच कर्म नसते झाले तर दुसरे कर्म कसे झाले असते? त्यामुळे पहिले कर्म (निर्मळ मानसिक कर्म ) हे दुसऱ्या (निर्मळ मानसिक व शारीरिक)  कर्माच्या तुलनेत अधिक बलवान आहे, प्रबळ आहे. 

हे हि महत्वाचे कि इथे दोन्ही गटांचे (सच्चक व लिच्छवींचे) मन निर्मळ  होते, जर ते निर्मळ  नसते तर पुण्य त्या संवेगाने मिळाले नसते. दान/कर्म करताना मनाची निर्मळता व  दान/कर्माचा परिणाम ठरवतो कि कर्म कुशल झाले कि अकुशल!!

संघातील भिक्षूंचे निर्वाणमार्गातील प्रगतीनुसार वर्गीकरण :

संघात प्रत्येक भिक्षूं ची अवस्था सारखी नसते. निर्मळतेच्या/ चित्त विशुद्धीच्या वेगवेगळ्या आठ पातळीचे भिक्षु असतात. त्या अवस्था खालील प्रमाणे आहेत . पहिली अवस्था तुलनेने कमी फलदायी तर आठवी तुलनेने सर्वात जास्त मंगलमय व जास्त फलदायी आहे:

१. स्रोतापन्न अवस्था (बुद्ध होण्यासाठीची पहिली पायरी) प्राप्त करण्याचा प्रयत्न करणारे 


२. स्रोतापन्न  अवस्था प्राप्त केलेले 


३. सकदागामी (बुद्ध होण्यासाठीची दुसरी पायरी) अवस्था प्राप्त करण्याचा प्रयत्न करणारे  आणि स्रोतापन्न  अवस्था प्राप्त केलेले 


४. सकदागामी (व स्रोतापन्न) अवस्था प्राप्त केलेले 


५. अनागामी  (बुद्ध होण्यासाठीची तिसरी/शेवटची  पायरी) अवस्था प्राप्त करण्याचा प्रयत्न करणारे णि सकदागामी  अवस्था प्राप्त केलेले 


६. अनागामी (व  सकदागामी) अवस्था प्राप्त केलेले 


७. अरहंत/बुद्धत्व  (निर्वाणीक/अंतिम/सर्वोच्च ) अवस्था प्राप्त करण्याचा प्रयत्न करणारे 


८. अरहंत/बुद्धत्व  ( निर्वाणीक/अंतिम/सर्वोच्च) अवस्था प्राप्त केलेले 



सम्यक संबुद्ध संशोधित(शोधलेली)  विपश्यना साधना करीत, मनुष्य ह्या निर्मळतेच्या उच्चतम अवस्था प्राप्त करत अरहंत/बुद्ध बनतो. पुढच्या अवस्थेतील मनुष्याला दिलेल्या दानाचे पुण्य मागच्या अवस्थेतील मनुष्याला दिलेल्या दानाच्या  पुण्यापेक्षा अधिक मोठे असते. 
सच्चकाने सम्यक संबुद्ध प्रमुख संघाला भोजन दानासाठी बोलावून (निष्कपट व सकल ) आद्यकर्म केले व त्याद्वारे तो प्रमुख संयोजक झाला. त्यामुळे सर्वाधिक महापुण्याचा प्रमुख दावेदार झाला. 


सच्चकाच्या ह्या ऐतिहासिक सत्य कथेत, संयोजनेद्वारे आद्य कर्म सच्चकाने केल्यामुळे व तथागत मानसिक कर्माला शारीरिक कर्माचे बीज मानतात त्यामुळे तथागत सच्चकाला  म्हणाले कि, "निर्वाणप्राप्त (म्हणजे वीतराग, वीतमोह, वीतदोष अर्थात आठवी अवस्था ) भिक्षूंना  भोजनदान दिल्याचे पुण्य सच्चकाला मिळेल, आणि इतर दायकांना अजून निर्वाण न मिळालेल्या   (म्हणजे अ-वीतराग,अ-वीतमोह, अ-वीत दोष अर्थात पहिली ते सातवी अवस्था प्राप्त ) भिक्षूंना  भोजनदान दिल्याचे पुण्य मिळेल!!" . 


ह्या विशेष सत्यकथेत तथागतांनी 
सच्चकाला  मानसिक कर्माचे महत्व तसेच निर्मळ मनाच्या अवस्थेतील मनुष्याला (भिक्षु/भिक्षुणी/साधक/साधिका) दिलेल्या दानातुन मिळालेल्या पुण्याच्या दर्जाचे महत्त्व समजावून सांगितले आहे. 


ह्या कथेनुसार हुशार मनुष्याने योग्य (निर्मळ व लोककल्याणमार्गी) मनुष्याला वेळोवेळी उचित दान करीत मंगल साधावे, ही आज बुद्ध पौर्णिमेच्या मंगल दिनी सदिच्छा !!  


मंगल हो!

संबोधन धम्मपथी